बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग ६)
आर्टिलरीचे काम नेमके कसे चालते? तोफखान्यात काम करताना
तिथल्या जबाबदाऱ्या काय असतात? सैनिकांना तोफांबद्द्ल खास असे काय आणि कधी शिकवले
जाते?
एकतर युद्धाच्या प्रसंगी सर्वात बेसिक पण महत्त्वाची गोष्ट
म्हणजे तोफा कुठेकुठे ठेवायच्या, त्यांच्या पोझिशन्स नेमक्या काय असाव्यात, किती
स्थिर तोफा वापरायच्या, किती मोबाइल तोफा वापरायच्या आणि कधी (ज्या एखाद्या
वाहनातून गरज पडल्यास ऐनवेळी चटकन दुसरीकडे नेता येतील) हे ठरवणं. कुठून तोफगोळे
टाकले तर जास्तीत जास्त एरिया कव्हर करता येईल हे आर्टिलरी टीमला आधी ठरवून घ्यावे
लागते.
तोफांचे मार्किंग, आणि ते
गोळे किती लांबवर पडू शकतील त्याचा अंदाज (गोळ्याचे वजन, वेग, अँगल, ट्रॅजेक्टरी
या सगळ्याचा विचार करून) घेऊन ते शत्रूच्या हद्दीत पडून कितपत डॅमेज करतील हे
सांगणं. मिलिटरी भाषेत ‘एस्टिमेटेड डेंजर झोन’ ठरवून सांगणं. परिस्थितीचा अभ्यास
करून काही कॅल्क्युलेशन मांडणं, आणि मग वेग, वेळ, विध्वंसक क्षमता वगैरे त्रैराशिक
मांडून पाहणं कोणती तोफ कुठे सुटेबल ठरेल, त्यानुसार डिप्लॉयमेंट ठरलेले.
![]() |
डिरेक्टर थिओडोलाइट |
खरंतर तसा डेटा उपलब्ध असतोही, की कोणत्या कॅटेगरीतला गोळा
किती अंतरावर किती सेकंदांत जाऊन पडेल आणि कितपत डिस्ट्रक्शन करू शकेल. पण जर
एखादेवेळेस अशी तयार माहिती उपलब्ध नसेल तर मात्र प्रॉपर trigonometry कॅल्क्युलेशन
वापरून ते Sin, Cos, Tan वगैरे मित्रांच्या मदतीने अँगल्स आकडेमोड करून शोधून
काढणे आणि सांगणे, हे काम असायचे.
![]() |
डिरेक्टर थिओडोलाइटचा वापर (फोटो प्रातिनिधिक) |
![]() |
देवळाली आर्टिलरी सेंटर - तोफ |
तर नंतर हैद्राबाद हे सेंटर होते जिथे ‘स्कूल ऑफ आर्टिलरी’ मध्ये वेगवेगळे कोर्सेस शिकवले गेले. अर्थात त्यासाठीही एक्झाम्स असायच्याच. म्हणजे नाशिक सेंटरमधून पास झाल्यावर इकडे विशिष्ट कोर्ससाठी एडमिशन घेताना पुन्हा एखादी एक्झाम वगैरे. पूर्ण युनिटमध्ये तीसच विद्यार्थी असायचे. हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला की त्या सैनिकाचे पुन्हा आर्मीत जाताना Instructor म्हणून प्रमोशन व्हायचे, कारण नाशिक कोर्सपेक्षा ही अजून एक हायर ग्रेड आता अचिव्ह केलेली असायची. थोडक्यात पोस्ट ग्रॅज्युएशन. पण हैद्राबाद सेंटरमधून कोर्स पूर्ण केल्यावर तिथून पुन्हा मिलिटरीत जावे लागायचे, कारण आता हे सैनिक कोर्स क्वालिफाइड झालेले असायचे. आणि Counter Bombardment म्हणजे ऑलरेडी आधीच शत्रूच्या तोफखान्याकडून हल्ला झाला तर कसे प्रत्त्युत्तर द्यायचे याचेही ट्रेनिंग झालेले असायचे, म्हणजेच लगेच उद्या जरी हल्ला झाला, युद्ध छेडले गेले तरी हे सैनिक काउंटर अटॅक करायला सज्ज आहेत असे समजले जायचे.
या कोर्सेसमध्ये तोफा, त्यांचे काम कसे चालते, त्यांची निगा
कशी राखावी, तोफगोळे नि त्यांची माहिती, प्रत्येकाची वजनानुसार destruction power, गोळे बनवतानाचे त्यातील ingredients, वाऱ्याचा किंवा एकूणच हवामानाचा गोळ्याच्या गतीवर आणि गोळा
लँड होताना अंतिम विध्वंसक शक्तीवर होणारा परिणाम वगैरे माहिती आणि इतर काही पूरक
अभ्यासक्रम म्हणजे मॅप मार्किंग करताना तोफांची strategic locations, युद्धाच्या वेळी आवश्यक त्या मानसिकतेचा अभ्यास, शत्रूच्या
हल्ल्यांचा अंदाज घेणे, आपल्याकडे पडू शकणाऱ्या गोळ्यांची फ्रिक्वन्सी, एकूणच
विध्वंस पाहून लगेच पुढच्या ऐनवेळी बदलाव्या लागू शकणाऱ्या उपाययोजना, अचानक दिशा
किंवा वजनी गोळे बदलून शत्रूचा अंदाज चुकवणे वगैरे अनेक गोष्टी शिकवल्या जायच्या.
![]() |
देवळाली आर्टिलरी सेंटर - सराव |
आता हे कौशल्य आत्मसात करून आल्यावर या सैनिकांची
जबाबदारीही तेवढीच वाढलेली असायची. म्हणजे गोळा सांगितलेल्या ठिकाणापेक्षा दुसऱ्या
point वर पडला तर ती चूक अर्थात यांची. गोळा त्याच ठिकाणी पडला
पाहिजे. मॅप मार्किंग करताना झालेली बॉर्डर मार्किंग आणि एक्च्युअल मार्किंग यांचा proportion नुसार अंदाज घेऊन आणि ग्रीड रेफरन्स तयार करून कमांडरला
देणे हे एक काम असायचे.
गोळा नेमका कुठे आणि किती वेळात पडेल याचीही एक सेट एक्युरसी
असते. ते प्रिसाईजली ठरवण्यासाठी आधी सर्व्हे टीमलाही जावे लागायचे. म्हणजे
सर्व्हे करून मॅप्स अपडेट करणे, रूट चार्ट तयार करणे इत्यादी. हे सारे काम
त्यावेळी जास्तीत जास्त मॅन्युअली करावे लागायचे, पण आता ते टेक्नॉलॉजीमुळे खूप
सोपे झाले आहे आणि त्यामुळे अर्थातच बहुमूल्य मानवी श्रम आणि वेळ वाचतो आहे असं
बाबा म्हणतात. ही वाचलेली एनर्जी सैनिकांना पुढे युद्धासाठी राखून ठेवता येते.
आता हे सगळे झाले जमिनीवरून जमिनीवर होणाऱ्या हल्ल्यांसाठी,
त्या युद्धांसाठी जिथे दोन्ही बाजूंनी
इन्फंट्री (पायदळ) आणि आर्टिलरी (तोफखाना) याच मुख्य घटकांत युद्ध होत असतं.
पण मग एअर अटॅक झाला तर काय करायचे? हा भाग पुढच्या भागात पाहू…
(क्रमश:)
No comments:
Post a Comment