Monday, 20 June 2016
बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन - भाग १)
माझे बाबा लष्करात होते. कित्येक दिवस त्यांच्या लष्करी जीवनावर त्यांच्याकडून ऐकलेल्या थोड्याफार माहितीवर लिहीन लिहीन म्हणत होतो, पण होत नव्हते, यंदा बाबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लिखाणाचा प्रयत्न सुरु केला. एक्च्युअली ही लेखमाला फेसबुकवर आधी सहज लिहायला सुरुवात केली, आणि अल्पावधीत मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून जाणवलं की लोकांनाही या विषयाबद्दल जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे. मग अर्थातच ते सर्व लेख एकत्र असावेत, ऑल अंडर वन रूफ.. जेणेकरून वाचकांनाही ते सोयीचे जाईल, या हेतूने इथे ब्लॉगवरही यावेत असं वाटलं, म्हणून आता इथेही शेअर करतोय. अर्थात या लेखमालेचा हा एक महत्त्वाचा हेतू आहेच की लोकांना कळावे की सैनिक आणि त्यांचे संघर्षमय जीवन म्हणजे काय चीज असते, जे कव्हर करायला कुणी मीडिया तिकडे जात नाही.
सदर लेखमालेतील पहिला भाग...
![]() |
श्री. प्रकाश पुजारी बाबा: द डॅशिंग-ए-रुबाबदार . |
माझे बाबा श्री. प्रकाश लक्ष्मण पुजारी हे आर्मीत १८ वर्षे होते. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी त्यांनी मिलिटरी जॉईन केली (१९६५ च्या युद्धावेळी आणि ते झाल्यावरही प्रचंड प्रमाणात सैनिक भरती सुरु होती त्या सुमारास) १९६५ चे युद्ध संपताना भरती झालेले असल्याने त्या युद्धात तितकेसे सहभागी नसले तरी १९७१ च्या भारत – पाकिस्तान युद्धात ते होते, त्यात त्यांचा सेक्शन कोणता तर – ‘आर्टिलरी’.. म्हणजे तोफखाना. फ्रंटवर थेट गोळीबार करणारी पहिली फळी, त्यामागे सज्ज आणि गरज पडल्यास त्याही फळीत जायला तत्पर असणारी फळी.. इतक्या जवळून युद्धात सहभागी असल्यामुळे बाबांकडे युद्धाचे आणि एकूणच लष्करी जीवन कसे असते याचे बरेच किस्से, आठवणी आहेत. ते त्यावर बोलायला लागले की ऐकत रहावेसे वाटते. (‘बॉर्डर’ त्यावेळी आम्हाला आवडला पण त्यात बाबांनी किमान १५-२० चुका काढल्या होत्या आणि हसत सुटले होते.. विशेषत: सनी देओलचा रोल. पण बाबांना ‘प्रहार’ आवडला होता, नाना पाटेकरांनी त्यासाठी स्वत: प्रत्यक्ष जाऊन ट्रेनिंग घेतले होते, हे काहींना माहीत असेलही.)
१८ वर्षांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेत बाबांचा जवळपास संपूर्ण उत्तर आणि ईशान्यपूर्व भारत फिरून झाला होता. डेहराडूननंतर कुपवाडासारख्या ठिकाणी दोन वर्षे सर्व्हिस होती तेव्हा तिथे बर्फाळ भागात तात्पुरती घरे बांधण्यासाठी तिथल्या उंच सूचीपर्णी वृक्षांच्या लाकडी फळ्या वगैरे सैनिकांना वापराव्या लागायच्या. ‘जोरदार बर्फवृष्टी सुरु झाली’ असे बातम्यात आपण ज्या भागाविषयी अधूनमधून पाहतो त्या राजौरी भागातही ते दोन वर्षे होते, तसंच पूंछ, लेह, लदाख, सिलीगुडी वगैरे पोस्टिंग्ज. आणि बाकी झाशी, मथुरा, भरतपूर याही ठिकाणी काही इतर जबाबदारीच्या कामांनिमित्त. यापैकी भरतपूर येथे एका किल्ल्यात त्यांच्या अख्ख्या रेजिमेंटची व्यवस्था करण्यात आली होती.
![]() |
बाबांची मेडल्स |
त्या काळात काही वर्षे सर्व्हिस झालेले बाबा सिनियर या नात्याने तिथे Map Reading Instructor म्हणून काम करत होते. त्यासाठी २० सैनिकांच्या बॅचचे रोज क्लासेस घेणे हे काम, पण तेही कसे तर.. म्हणजे वाचताना वाटेल की त्यात काय एवढे, नकाशा असतो तो फक्त समजावून तर सांगायचा अमीर खान सरफरोशमध्ये बाहीद नेमकं कुठेय हे दाखवतो तसं.. तर मित्र हो.. इथे लक्षात घेतले पाहिजे की तो एक सिनेमा असतो..त्यात हिंदी.नकाशा तयार असेल तर कशाला कष्ट पडले असते हो एवढे. आता कसले कष्ट.. तर मुळात.. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो की तिथे ६-७ किलोमीटर पट्ट्यातले काही मार्किंगच अव्हेलेबल नव्हते, म्हणजेच ती ठिकाणे नीट पाहून त्यानुसार नकाशा तयार करणे भाग असते. हे करणारा एक चमू असतो, होय प्रसंगी सैनिक अशी महत्त्वाची जबाबदारीची कामेही करतात. अहो आपल्या देशात शिक्षक नाही का जनगणनेच्या कामाला किंवा पोलिओ डोस शिबीराची पत्रके वाटायला जात! तर बाबा आणि ते इनचार्ज असलेली २० जणांची त्यांची टीम रोज जीपमधून त्यासाठी वेळीअवेळी फिरायचे.. हळूहळू जास्तीत जास्त प्रिसाईज माहिती घेत नकाशा तयार व्हायचा. या दरम्यान फतेहपुर सिक्री, वृंदावन, आग्रा, मथुरा वगैरे भागही त्या निमित्ताने फिरून झाला. मार्किंग अव्हेलेबल नसणारे असे बरेच भाग असायचे, (दहशतवादी अशाच भागात रेकी करण्यासाठी आधी घुसतात.. कारण स्पष्ट आहे..) ते जास्तीत जास्त निर्दोष मार्किंग करून योग्य करण्याचे काम असतेच अशा टीम्सचे. ते झाले की होणारा आनंद वेगळाच. आपण नाही का गुगल अर्थ मॅपवर आपल्या बिल्डींगचे नाव टाकून किंवा पाहून खुश होत? सलग दोन वाक्यात सूर्य आणि काजवा कसा येऊ शकतो बघा.
![]() |
आर्टिलरीत इतकी वर्षे सर्व्हिस करणाऱ्याच्या घरी असे एखादे मॉडेल असायचेच. लहानपणापासून मग आम्हालाही इतर खेळण्यांचे नाही तितके याचे अप्रूप आणि कौतुक आहे |
कुपवाडा, सिकंदराबाद इथे दोन वर्षे आणि मग बिकानेरला वर्षभर झाल्यावर बाबा १९८३ साली रिटायर झाले. उत्तरेकडे जोधपूर, गंगापूर, जयपूर, जैसलमेर या प्रदेशातही त्यांची सर्व्हिस झाली होती. बाबा सांगतात त्याप्रमाणे, जैसलमेर भागातले रस्ते तेव्हा खूप कन्फ्युजिंग असायचे (सत्तरचे दशक).. म्हणजे तुम्ही पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे पाहिले तर तुम्हाला वाळू दिसेल, पण दक्षिण उत्तर पाहिले तर मात्र तुम्हाला वाळू दिसणार. हां पण समजा तुम्ही जर आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य धुंडाळले तर मात्र तुम्हाला वाळू दिसेल बरं का. थोडक्यात त्यातून इच्छित रस्ता शोधणे महामुश्किल. ड्रायव्हर शहाणा, तिथला माहीतगार असेल तर मुक्कामी पोहोचता यायचे, अन्यथा सतत कंट्रोल रूमशी वायरलेसने संपर्क साधून दिशा, सूचना मिळेल तसे जायचे. कंट्रोल रूममधून कॉऑर्डीनेटस सांगितले जायचे, ते फॉलो करायचे.. अगदीच गोंधळ असेल, तर रडार ऑब्झरव्हेशन सुरु केले जायचे.. मग पुन्हा कंट्रोल रूम सांगायचे‘हे असे इकडून या, लेफ्ट घ्या’ वगैरे. आजकाल मोबाईलमध्ये जीपीएस असतं तरी आपण कूलकॅबला अड्रेस सांगताना चुकतो किंवा तो ड्रायव्हर तरी रस्ता कन्फर्म करून घेऊन अगदी ठरल्याप्रमाणे दुसऱ्याच रस्त्याला भरकटून आपल्याला चौकात ताटकळत ठेवतो.
अलीकडेच सियाचीनच्या बर्फात हिमस्खलनातही जिवंत राहिलेल्या लान्स नायक हनुमंतअप्पा यांची केस आपल्याला माहीतच आहे. (दुर्दैवाने नंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्याचवेळी जेएनयूत देशद्रोही देशभक्त ठरत होते.. काय योगायोग) पण ‘हाऊ डीड ही सर्वाइव्ह’ टायटलखाली काही सचित्र लेख होते नेटवर ते वाचले होते. अशा धोकादायक भागात काम करणाऱ्या सैनिकांना अर्थात पोस्टिंगच्या त्या कालावधीसाठी पगार भले जास्त असतो, पण त्या कंडीशन्सचं काय? तरीही देशासाठी एवढा धोका पत्करतात हे जांबाज सैनिक.
त्या भागातील सैनिकांना आधी काय वेगळे प्रशिक्षण दिले जाते याविषयी कुतूहल म्हणून नेटवर सर्च केले आणि सांगलीला घरी गेलो तेव्हा बाबांनाही याबाबत विचारले होते.प्रमोशन होण्याआधी बाबाही काही काळ लान्स नायक होते आणि सियाचीन भागात हनुमंतअप्पा होते तितक्या उंचीवर नसले तरी त्या खोऱ्यात बाबांचंही काही काळ पोस्टिंग होतंच.. मायनस टेम्परेचर आणि बर्फाळ प्रदेशातलीकाही खतरनाक हिंस्र श्वापदं एखाद्या माणसाचं काय करू शकतात हे कळायला आपल्याला लिओचा ‘द रेव्हनंट’ बघावा लागतो, आपले सैनिक रोज ते प्रत्यक्ष जगत असतात. तर अशा ठिकाणी असताना सैनिकांना बंदुकीच्या दस्त्याने बर्फ खोदणे (खरंतर ताकद लावून तो कायच्या काय घट्ट बर्फ फोडणे), त्यातून जमल्यास काही भुयारे, बंकर्स, छुपे मार्ग तयार करणे नि त्यात राहणे वगैरे करावे लागते. काही करून थंडीपासून बचाव करणे हे पहिले ध्येय असते, त्यासाठी या ना त्या मार्गाने शरीरात उर्जा उष्णता निर्माण करून स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठीही हाल हाल होतात. रेव्हनंटमध्ये लिओ घोड्याला फाडून त्याच्या पोटात झोपतो ती अतिशयोक्ती वाटत नाही ती म्हणूनच, प्राण्यांचे रक्त उष्ण!
ग्लेशियर होऊन बर्फाखाली दबले गेल्यास रायफल वा जी कोणती साधने, हत्यारे असतील त्यांच्या सहाय्याने अशाच पद्धतीने आपल्याभोवती एक ऑक्सिजन स्पियर तयार करावा लागतो. तो प्रत्येकवेळी जमतोच असंही नाही, हनुमंतअप्पाना हे महाकठीण काम जमलं होतं. त्या गोलात अंगाचं मुटकुळं करून बसावं लागतं, किती काळ ते सांगता येत नाही. अशा परिस्थितीत श्वसन कसे करावे हेही सैनिकांना शिकवले जाते. तिथे रामदेवबाबांचे स्मरण करून उपयोग नसतो. हातापायाची बोटे वळलेली असतात, त्यावर बर्फ.. त्यात ते हँड्ग्लोव्जही वेगळे असतात, म्हणजे लास्ट बॉलआधी धोनी सेकंदात डाव्या हातातला ग्लोव्ह काढू शकतो तसे नसतात.
हे झाले बर्फातले, बाकी कित्येक वेळी जंगलातही जेव्हा सैनिकांना झाडाझुडपांशी अगदी साधर्म्य साधणारे हिरव्या रंगाचे कपडे घालून,जणू सरडा होऊन, शत्रूचा माग घेत बराच वेळ बसावे लागते, तेव्हा काय? सांगतो पुढच्या भागात…
(क्रमश:)
Monday, 20 June 2016
बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन - भाग २)

‘न सांगण्यासारखी गोष्ट’ हे त्यावरचे सध्या नवीन गाजत असलेले पुस्तक. शिवाय शिव कुणाल वर्मा यांचे The War That Wasn’t हे पुस्तकही आहे. बाबा म्हणतात की कोल्हापूरचे तेव्हाचे सेनेतएक्टीव्ह लेफ्टनंट जनरल थोरात यांनीहीचीनपासून भारताला धोका असल्याचे त्यायुद्धापूर्वीच सांगितले होते. पण याइशाऱ्याकडे 'हिंदी चिनी भाई भाई' म्हणतभारतीय सरकारने साफ दुर्लक्ष केले आणि त्याचेच पुढे परिणाम भोगले. यावर लेफ्टनंट जनरल बी एम कौल यांचे‘द अनटोल्ड स्टोरी’ हे १९६७ साली प्रकाशित झालेले पुस्तकही तेव्हा प्रचंड गाजले होते. थोरातसरांसारख्या बऱ्याच सेनाधिकाऱ्यांचे तेव्हा म्हणणे होते की चीनने ज्या जबर ताकदीने हल्ला केलाय ते पाहता आपण आत्ता युद्धासाठी तयार नाही आहोत. नाऊ हियर कम्स इन पिक्चर मिस्टर पंडित नेहरू.
इंदिरा गांधींवरून आठवले.. बाबा नेहमी म्हणतात की माझ्या खरंतर तीन आया – एक माझी आई, दुसरी भारतमाता आणि तिसरी इंदिरा गांधी. म्हणजे झाले असे की ७१च्या युद्धावेळी जखमी सैनिकांना भेटायला पंतप्रधान या नात्याने त्या गेल्या होत्या, जसे अलीकडे नरेंद्र मोदी हनुमंतअप्पांना भेटले होते. सर्वाना पुरून उरणाऱ्या त्या खमक्या बाईने सैनिकांशी केलेला शेकहॅंड, खांद्यावर ठेवलेला हात सैनिकांचे बळ निश्चितच वाढवणारा होता. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त जी परेड असते त्यातही बाबा इंदिरा काळात १९७१/७२/७३ अशी तीन वर्षे सहभागी होते. तीन-तीन वर्षांचं रोटेशन असतं म्हणे रेजिमेंट्सना याचं.. तेव्हा तरी असायचं.
बरं फक्त हेच नाही, तर बाबांचे बरेचदा दिल्लीत इंदिरा सरकारच्या ऑफिसातही जाणे व्हायचे. सिसफायर मॅप मार्किंग घेऊन दिल्लीत साउथ ब्लॉक हेडक्वार्टरमध्ये जावं लागायचं. इंदिरा गांधी, जनरल, विंगकमांडर अशा मोठ्या अधिकाऱ्यांच्या तिथे मीटींग्ज व्हायच्या. काही सिक्रेट/ कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्सच्या फाईल्स, अपडेटेड नकाशे असलेल्या फाईल्स वगैरे तिथे नेऊन देणे हे जबाबदारीचे काम.. सिनियर सर्व्हेयर म्हणून ते एकदा बाबांकडे आलं, नीट केलं, आणि मग पुढे बरेचदा ते त्यांच्याच गळ्यात पडलं. ती फाईल एकदा सबमिट केली की हाशहुश व्हायचं असं बाबा म्हणतात.
इतक्या फास्ट रनरेटने शिकलेली ही फळीही अर्थातच तितकीच टफतयार होणार होती आणि झालीही. त्या प्रचंड खडतर ट्रेनिंगच्याकाळात वैतागून आणि हार मानून पळून जाणारेही काही कमीनसतात.. कमकुवत असाल तर गुडघे टेकायला लावायला तेवढीपिळवणूकच इनफ असते.‘लक्ष्य’मध्ये हृतिक हे आपल्या पिढीलानीट दाखवतो. रोज पहाटे चारला उठून अमुक वेळेतच आवरून अमुककिलोमीटर रनिंग, मग त्या कठोर शारीरिक कसरती (आठवा:प्रहार), तो सहकाऱ्यांसोबत सराव, ते वेपन ट्रेनिंग, स्विमिंग,नेमबाजी वगैरे सेशन्स. फिजिकल फटिग प्रचंड असायचा, पणअर्थात फुटबॉल, पोलो, हॉकी वगैरे खेळही खेळायलाही मिळायचे.ट्रेनी सैनिकांना रांगडे मैदानी खेळ खेळवून दमवणे म्हणजेमिलिटरीच्या दृष्टीने एक प्रकारचा व्यायाम असला तरी ते खेळअसायचे आणि उस्ताद, सिनियर्सकडून काहीशी सूट असायची. (याकसरती करून घेणाऱ्या मास्तरांना खरंच उस्ताद म्हणतात.. मलावाटायचं ‘भाग मिल्खा भाग’मध्ये उगाच प्रकाशराजला रिस्पेक्टम्हणून फरहान तसं म्हणत होता की काय)
बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग ४)
उदाहरणार्थ पाठीवर एक फार नाही, पण चाळीस किलो वजन असलेलं ओझं.. तेही काट्यावर वजन करून. ती बॅग/ सॅक जास्तीत जास्त जड कशी होईल आणि सैनिक मध्येच थकून बसला तर पुन्हा उठणं जास्तीत जास्त कठीण कसं होईल याची काळजी घेतली जाऊन भरली जाणारी बॅग.. म्हणजे त्या बॅगेत रेती, वाळू, दगड, जड रायफल्स आणि इतर काही जड गोष्टी वगैरे असायचेच. आणि मग सुटायच्या ऑर्डरी – ‘याला वन पॅक ड्रिल द्या’. हे ओझे पाठीवर घेऊन सांगितलेले अमुक अंतर धावत जाणे, राउंड मारणे किंवा रांगत जाणे- क्रॉलिंग करणे म्हणजे मिलिटरीच्या भाषेत पॅक ड्रिल.. वन, टू जितके सांगितले असतील तितके पॅक ड्रिल्स करणे म्हणजे तितक्यावेळा तसे तेवढे अंतर धावणे, राउंड मारणे किंवा क्रॉलिंग करणे. बरं हे क्रॉलिंग तरी साधं सरळ जरा माणसातलं ठेवावं, तर तेही नाही.. म्हणजे सक्तीने मुद्दाम शर्टच्या बाह्या वर घेऊनच जायचं, जेणेकरून ढोपरं फुटलीच पाहिजेत, रक्ताळलीच पाहिजेत, मग भले दुसऱ्या दिवशी आर्मी डॉक्टरकडे ड्रेसिंग करून घ्यायला जा, पण तेव्हा ते पॅक ड्रिल विदाउट फेल परफॉर्म झालं पाहिजे म्हणजे पाहिजेच. (या ‘च’चं महत्त्व सैनिकांना कधीच वेगळ्याने शिकवावं लागत नाही.) कधीकधी त्यासाठीही टाईम लिमिट.. एवढ्या वेळात हे करून पुन्हा पुढच्या सेशनला जायचं वगैरे छान शारीरिक लाड.
या शिक्षाही शक्यतो भर उन्हात.. तितकंसं ऊन त्यावेळी नसेल तर जेव्हा ऊन पडेल तेव्हा ‘स्टार्ट’ म्हणायचं. हे जरा क्रूर किंवा कठोर वाटेल, पण सैन्यात सगळ्यांच्याच हातात रायफल असते, काहीही करू शकतील ना.. मग म्हणूनच अशा काही गोष्टींतून शिकाऊ सैनिकांच्या अंगी शिस्त बाणवण्याचा प्रयत्न केला जातो आणि हाच हेतूही असतो. हां आता इथेही तो जात मुद्दा असू शकतोच, कसा ते आता पुन्हा सांगत बसण्याची गरज नाही. पण जरब हवीच हे सगळं कंट्रोल करायला म्हणून मग हे असं. अंगठे धरून उभं केलं म्हणून पालकांना फोन करता येत नाही तिथं. ‘च्यायला पाठवा सरळ बॉर्डरवर.. गोळ्या घालून आणि खाऊन युद्धात तरी मरतो एकदाचा, पण हे असं रोज मरण नको’ असं सैनिकांना या काळात वाटतंच. आणि यातूनच ते कायच्या काय सॉलिड टफ होत जातात. कधी शत्रूच्या तावडीत सापडल्यावर युद्धकैदी त्यांचे कितीही हाल झाले तरी तोंड उघडत नाहीत नि काही माहिती फोडत नाहीत ती सहनशक्ती येते कुठून तर इथून. देते कोण देते कोण देते कोण देते ही सहनशक्ती? तर आर्मी आणि तिथलं खडतर ट्रेनिंगच!

सैन्यात एखाद्या ज्युनियरने सिनियरला किंवा सहकाऱ्याला गोळी घातली अशी कधीतरी बातमी, अगदी क्वचित का होईना, पण आपण वाचतो. हे शक्यतो टाळण्यासाठीही ही शिस्त, आदरयुक्त भीती उपयोगी पडते. मुळात सिनियर्सविषयी मनात आदर असला की असं काही घडायची शक्यता कमीच. पण जर शारीरिक क्षमता आणि मनोबल कमी पडत असेल तर मात्र मग ते शिकाऊ सैनिक सरळ पळून येतात तिथून. (तिथून पळून येणंही सोपं नसतं. उगाच शाळा/कॉलेजात आपली प्रेझेंटी देऊन मागच्या दाराने वर्गाबाहेर पळून जाण्याचे वैयक्तिक अनुभव आठवू नये. पण मला तरी हे वाक्य नेमकं इथंच का सुचावं.. छे, भूतकाळ काही पिच्छा सोडत नाही)
कुठेही कॅम्प लागला की तंबू जे तयार करावे लागायचे ते काम तर सैनिकांना असायचेच. पण पहिले काम म्हणजे तिथे बंकर्ससाठी योग्य जागा शोधून ते आधी तयार करणे. अर्थात त्याचीही मोजमापे ठरली असतात. साधारण साडेचार फूट खोल आणि अडीच फूट रूंद.. म्हणजेच दोन-तीन सैनिक बसू शकतील आणि रायफलचे टोक खड्ड्याच्या एजवर जमिनीला समांतर येईल असे. शिवाय भोवती किंवा आवश्यक त्या दिशेला हिरवी झाडीझुडपे आणून लावणं.
खड्डा खोदणं ही डोकेदुखी असते खरी, पण ते गरजेचंही असतं. शिवाय जंगलात किंवा दुर्गम डोंगराळ भागात तंबू लागले की अजून एक काम वाढतं. म्हणजे अजून एक खड्डा खणावा लागतो, पण तो आपल्यासाठी नाही तर सापासाठी. त्याला ‘स्नेक स्ट्रेच’ म्हणतात. विशिष्ट आर्क करत तीन फूट खोल आणि दीड फूट रूंद आणि लांबी अख्ख्या तंबूला कव्हर करेल एवढी.अशा काही भागातले साप म्हणे त्यांच्या शरीररचनेमुळे त्या खड्ड्यात पडले तर तिथून चढून वर येऊ शकत नाहीत, पर्यायाने तंबूपर्यंत पोहचू शकत नाहीत. हां प्रत्येकवेळी हे वर्क होईलच असं नाही, कारण मग तो सापांच्या बुद्धिमत्तेचा अपमान ठरेल. पण अशा मेथड्स वापरून कधी दुसऱ्या दिवशी खड्ड्यात पडलेले वळवळणारे साप दिसायचेही.
ट्रेनिंगच्या काळात कुठेही कॅम्प गेला की ट्रेनी सैनिकांना शक्यतो पहिले काम म्हणजे तिथे तंबू उभारणं, स्नेक स्ट्रेचिंगसाठी खड्डा खोदणं वगैरे. कधी शत्रूची चाहूल लागली किंवा काही टीप मिळाली की तिथे जवळपासच्या भागात जाऊन तळ ठोकणं.. टिल फर्दर ऑर्डर.. मग हे कॅम्प लागले की खुदाईकाम आलेच. तिकडून पाकिस्तानची काही चुळबूळ, हेरगिरी वगैरे सुरु असली की वायरलेसहून येणारे मेसेजेस कॅच करणं हे टेक्निकल टीमचं पहिलं काम.. आणि त्याबरहुकूम इकडची आपली लाइन ऑफ एक्शन ठरवणं. त्यांची भाषा अर्थात उर्दू, हिंदी.. ते मेसेजेस इकडे डिकोड करता यायचे, तेव्हा पंजाबी, यूपीमधल्या उत्तर भारतीय वगैरे सैनिकांना फायदा कारण त्यांचे हिंदी चांगले, मग त्यांना खुदाईकामातून मोकळीक मिळून या कामात गुंतवून ठेवले जायचे. येणारे मेसेजेस किंवा जितके कॅच करता येतील ते डिकोड करून सांगणे, मग इकडे पुढची हालचाल करता यायची.
या कामी काही उपकरणं वापरावी लागायची. उदाहरणार्थ, तोफेचा अँगल नेमका मिळवण्यासाठी ‘डिरेक्टर थिओडोलाइट’ हे साधन वापरणे, तर अंतर ठरवण्यासाठी ‘रेंज फाईंडर’ हे उपकरण वापरणे. याशिवाय बाकी‘मेटॅलिक टेप’ वगैरे असायचेच, ज्याच्या सहाय्याने ३०-३० मीटर अंतर मोजत जायचे. तोफगोळ्याची ट्रॅजेक्टरी ठरवणे.. गोळा रिलीज करताना जास्त हाईटवरून जाणार असेल तर तो फार दूरवर पडणार नाही, तोकमी पल्ल्याचा असेल.. आणि व्हाइसव्हर्सा, म्हणजे कमी उंचीवरून सोडला जाणार असेल तर तो बराच लांब पडून विध्वंस करू शकेल. अर्थात हे गोळ्याच्या वजनावरही ठरते, गोळे हेवी वेट, मीडियम वेट, लाईट वेट असू शकतात.. एकेक गोळा ४० किलोपर्यंत वजनाचाही असतो (अशाच हेवी वेट गोळ्यांचे लोडिंग अनलोडिंग करताना एकदामेजर इंज्युरी होऊन मेडिकल रिझन्समुळे बाबांना पुढे रिटायरमेंट घ्यावी लागली, पण तो भाग नंतर).
आता साहजिक प्रश्न येतो की हे गणिती ट्रेनिंग सैनिकांना कधी दिले जाते. इंजिनियरिंगला नाही का पहिल्या वर्षी सगळ्यांना सारखाच सिलॅबस देऊन सारखेच सामूहिक हाल करतात, पण मग सेकंड इयरपासून त्या त्या ब्रँचला त्या त्या ब्रँचचाच छळवाद अलॉट केला जातो, तसेच १९६५ ला जॉईन झाल्यावर तिथले बेसिक ट्रेनिंग झाल्यावर बाबांना आणि एकूणच आर्टिलरी टीमला नंतर तीन महिन्यांचा एक कोर्स करण्यासाठी पाठवले गेले. या कोर्सचे नाव‘Counter Bombardment CB52’ आणि हा कोर्स नाशिकजवळच्या देवळाली या ठिकाणी असणाऱ्या आर्टिलरी सेंटरमध्ये पार पडला होता. हे सेंटर ब्रिटिश काळापासून आहे, तेव्हा अशा सेंटर्सची बेळगाव, पुणे, नाशिक, डेहराडून अशी strategic placements होती.
तर नंतर हैद्राबाद हे सेंटर होते जिथे ‘स्कूल ऑफ आर्टिलरी’ मध्ये वेगवेगळे कोर्सेस शिकवले गेले. अर्थात त्यासाठीही एक्झाम्स असायच्याच. म्हणजे नाशिक सेंटरमधून पास झाल्यावर इकडे विशिष्ट कोर्ससाठी एडमिशन घेताना पुन्हा एखादी एक्झाम वगैरे. पूर्ण युनिटमध्ये तीसच विद्यार्थी असायचे. हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला की त्या सैनिकाचे पुन्हा आर्मीत जाताना Instructor म्हणून प्रमोशन व्हायचे, कारण नाशिक कोर्सपेक्षा ही अजून एक हायर ग्रेड आता अचिव्ह केलेली असायची. थोडक्यात पोस्ट ग्रॅज्युएशन. पण हैद्राबाद सेंटरमधून कोर्स पूर्ण केल्यावर तिथून पुन्हा मिलिटरीत जावे लागायचे, कारण आता हे सैनिक कोर्स क्वालिफाइड झालेले असायचे. आणि Counter Bombardment म्हणजे ऑलरेडी आधीच शत्रूच्या तोफखान्याकडून हल्ला झाला तर कसे प्रत्त्युत्तर द्यायचे याचेही ट्रेनिंग झालेले असायचे, म्हणजेच लगेच उद्या जरी हल्ला झाला, युद्ध छेडले गेले तरी हे सैनिक काउंटर अटॅक करायला सज्ज आहेत असे समजले जायचे.
बाबा म्हणतात की १९७१ च्या भारत – पाकिस्तान युद्धात मजा आली. ३ ते १६ डिसेंबर या कालावधीत लढलं गेलेलं आणि जिंकलं गेलेलं हे जगातलं आजपर्यंतचं सर्वात जलद निकाली लागलेलं मोठं युध्द आहे. शत्रूची फायटर प्लेन्स हवेत बागडतात तेव्हा खाली लोक दिसले की ती प्लेन्स सहज खाली येऊन नुसता एक फर्राटा मारून जातात, हे तर घडलंच. अगदी एक एक इंचावरूनही गोळ्यांचा वर्षाव व्हायचा, अशी प्लेन्स सगळी बंकर्स झटक्यात उद्ध्वस्त करू शकतात. मग सिनियर्स काही अतिउत्साही सैनिकांना वेळीच मागेही खेचायचे, ‘सालों तुमभी मरोगे हमे भी मारोगे.. याद रहे दस दस को मारे बिना हमे मरना नही है’ वगैरे सूचना मिळायच्याच मग. (बॉर्डरमध्ये सुनील शेट्टी हातात ग्रेनेड घेऊन डायरेक्ट त्यांच्या हद्दीत घुसून गोळा टाकतो, तो सीन पाहून बाबा हसत सुटले होते. आणि चेहऱ्यावर ‘अरे कोण आहे हा, काय करतोय’ टाइप भाव.)
अशावेळी इथला एक डावपेच म्हणजे शत्रूच्या टप्प्यात ती तुकडी असली तरी त्यांना ती दिसत नाही आणि इकडून आपली दुसरीच तुकडी फायरिंग करून त्याना छळते, मग आधीच बिथरलेला शत्रू चूक करून दोन पावलं पुढे आला की अचानक ती संधी साधून तिथली तुकडी उठून त्यांना मारते. कधी उठायचं त्याचेहीसिग्नल त्यांना मिळत असतात. ते तिकडून थेट इकडे गोळीबार करतायत म्हणजे मध्ये कुणीच नाही, रस्ता क्लियर आहे अशी आधी त्यांची रीतसर गैरसमजूत करून द्यावी लागते. हीपण वॉर स्ट्रेटेजीच.
म्हणजे असं बघा, भाग मिल्खा भाग मध्ये ‘..और मेरी फटिग ड्युटी भी माफ है जी’ असं मिल्खासिंग झालेला फरहान म्हणतो तेव्हा आपण तो ‘कुणाचं काय तर कुणाचं काय’ टाइप कॅटेगरीतला विनोद समजून हसतो, पण त्यामागे ‘मी फटिग ड्युटी मारली तर मला आणखी भूक लागेल, प्लस मला धावायची प्रॅक्टिस तर करायची आहेच, आणि हे सगळं इतक्याशा तुटपुंज्या आहारात कसं होणार उस्ताद.. रनिंग किंवा फटिग ड्युटी एकच काहीतरी जमेल ना’ हा एक मनात म्हणलेला डायलॉगही असतो. पण ही पार्श्वभूमी लक्षात घ्यायला वेळ नसतो आपल्याला. उस्तादकडूनही त्याला विचारले जाते, "तुला दिवसा सराव करायला वेळ मिळत नाही ना?" शिवाय क्रॉस कंट्री दौडमध्ये टॉप टेन सैनिकांना फटिंग माफ आणि स्पेशल डाएट म्हणजे काय तर एक ग्लास दूध आणि दोन कच्ची अंडी हे उस्ताद प्रकाशराज सांगतो तेव्हाही सैनिकांचे चेहरे फुलतात हे आपण त्यात पाहिलंच आहे.
(क्रमशः)
बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग १०)
आपण पाहिले की बर्फाळ प्रदेशात सैनिकांचे जीवन कसे खडतर असते. सियाचीनमध्ये दैनिक पुढारीने काही वर्षांपूर्वी निधी गोळा करून सैनिकांसाठी सुसज्ज हॉस्पिटल बांधले, त्यावरही बाबांची प्रतिक्रिया ‘बरे झाले’ फॉलोड बाय दीर्घ मौन अशी कमी शब्दात बरेच काही सांगून जाणारी होती. पण बाकी कित्येक वेळी जंगलातही जेव्हा सैनिकांना झाडाझुडपांशी अगदी साधर्म्य साधणारे हिरव्या रंगाचे कपडे घालून, जणू सरडा होऊन, शत्रूचा माग घेत बराच वेळ बसावे लागते, (आठवा: द लोन सर्वायव्हर, लक्ष्य किंवा गेलाबाजार टँगो चार्ली तरी) तेव्हा काय? दुश्मन येईल तेव्हा मारूच, चकमक होणारच.. पण खाण्याचे काय?
![]() |
जंगलात मिशनवर असलेले सैनिक |
तर अशा वेळी हेलिकॉप्टर्समधून अन्नाची पाकिटे सैनिकांसाठी टाकण्यात येतात हे माहीत असेलच. शक्यतो टिकाऊ पदार्थ, म्हणजे सुका मेवा–बदाम, अक्रोड, चीज, लोणी, अंड्याचे पदार्थ, चिकन पिसेस वगैरे हाय कॅलरीजचे पॅक्ड आयटेम्स असतात ते. पण कित्येकदा प्रचंड भूक लागूनही त्या वातावरणामुळे ते सैनिकांना खावेसे वाटत नाहीत, किंवा कधीकधी आधीच कुणा जंगली जनावराच्या तावडीत ती पाकिटे पडून फस्त होतात. मग सैनिक काय करणार? पुढच्या हेलिकॉप्टरची वाट पाहणार? लोकांना काय जातंय इथे व्हेज नॉनव्हेजवर पौष्टिक वाद घालायला किंवा नॉनव्हेज खाणाऱ्याना नाके मुरडायला. मुद्दा असा की तिथे काहीही खाण्याची तयारी असावी लागते. फळे मिळून मिळून किती मिळणार? मग काही छोटे प्राणी, प्रसंगी सापही मारून त्याचे विष काढून तो कसा खावा याचे ट्रेनिंग सैनिकांना दिलेले असते. डिस्कव्हरीवर ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ बघताना माझं नुसत म्हणायला काय जातंय की, “ईss, तो असा कोणताही प्राणी पकडून कच्चा भाजून कसा काय खाऊ शकतो?”, पण त्यावर बाबा म्हणतात, “का नाही खाणार?” आणि हे म्हणताना त्यांचे तेव्हा काहीच गेलेले नसते असे नाहीच नाही.. किमान तशी काही अन्नाची पाकिटे तरी नक्कीच.
![]() |
ओळखा पाहू किती आहेत? झाडाझुडपाशी साधर्म्य साधणाऱ्या पोशाखातील सैनिक |
सैन्यातले ट्रेनिंग, तिथल्या शिक्षा, प्रत्येक ठिकाणी गेल्यावर राहायची करावी लागणारी तयारी, युद्ध किंवा सराव सेशन असताना तोफखान्याचे नेमके काम, सैनिकांची एकमेकांत चालणारी चेष्टामस्करी वगैरे गोष्टींवर लिहीनच. पण त्याआधी.. भरती झाल्यावर अधूनमधून आधी झालेल्या युद्धांच्या काही गोष्टी, आठवणी सहकारी, सिनियर्सकडून नव्या सैनिकांना कळत असतातच. युद्धस्य कथा रम्य: म्हणतात ते उगीच नाही. तर बाबा ऑगस्ट १९६५ मध्ये भरती होण्याआधीच १९६२चे जे युद्ध झाले होते, ते १९६२ इंडो-चायना वॉर आपण हरलो होतो.लाजिरवाणा पराभव म्हणून इतिहासात नोंद झाली, त्याची कारणे सांगणारी अनेक पुस्तकेही आज मिळतात.

‘न सांगण्यासारखी गोष्ट’ हे त्यावरचे सध्या नवीन गाजत असलेले पुस्तक. शिवाय शिव कुणाल वर्मा यांचे The War That Wasn’t हे पुस्तकही आहे. बाबा म्हणतात की कोल्हापूरचे तेव्हाचे सेनेतएक्टीव्ह लेफ्टनंट जनरल थोरात यांनीहीचीनपासून भारताला धोका असल्याचे त्यायुद्धापूर्वीच सांगितले होते. पण याइशाऱ्याकडे 'हिंदी चिनी भाई भाई' म्हणतभारतीय सरकारने साफ दुर्लक्ष केले आणि त्याचेच पुढे परिणाम भोगले. यावर लेफ्टनंट जनरल बी एम कौल यांचे‘द अनटोल्ड स्टोरी’ हे १९६७ साली प्रकाशित झालेले पुस्तकही तेव्हा प्रचंड गाजले होते. थोरातसरांसारख्या बऱ्याच सेनाधिकाऱ्यांचे तेव्हा म्हणणे होते की चीनने ज्या जबर ताकदीने हल्ला केलाय ते पाहता आपण आत्ता युद्धासाठी तयार नाही आहोत. नाऊ हियर कम्स इन पिक्चर मिस्टर पंडित नेहरू.
अहिंसा पक्षातून पुढे मोठे झालेले हे नेते.. सक्तीने हिंसा करावी लागणाऱ्या युद्धासारख्या प्रसंगी प्लानिंग करताना दूरदृष्टीचा कायच्या काय अभाव कसा जास्तीत जास्त असावा आणि अशा प्रतिष्ठेच्या मोठ्या लढाईसाठी नियोजन कसे अजिबात नसावे याचे उत्तम आदर्श उदाहरण तेव्हा नेहरूंनी घालून दिले. सैन्याच्या कोणत्या भागातल्या तुकड्या कितपत आणि कुठे जाऊन लढण्यासाठी सक्षम आहेत हे तरी बेसिकली पाहावे लागते. त्या ट्रूप्सचे प्लेसमेंट कसे असू नये हे दाखवत नि मिलिटरी ऑफिसर्सना न जुमानता हट्टी नेहरूंनी दक्षिण भारतीय सैनिकांच्या तुकड्यांना (मद्रास रेजिमेंट, मराठा बटालियन रेजिमेंट वगैरे) त्या फ्रंटवर पाठवलेज्यांना अशा थंडीचा अनुभव नव्हता. १९६२च्या या डिसेंबर थंडीतल्या युद्धासाठीच्या भारताच्या अतिगचाळढिसाळ नियोजनावर जग हसले. छी थू भारतीय लष्कराची झाली, पण सैनिकांना त्या खाईत लोटणारी मागची डोकी राजकारणी होती ज्यांनी काही गोष्टी करायला तेव्हा सेनाधिकाऱ्याना भाग पाडले.
जगात कित्येक देशांमध्ये लष्कराने उठाव केला की काय काय होऊ शकते हे आपण पाहिलेय, मग लष्करी राजवटच! (इराक, पाकिस्तान वगैरे). आपले सैन्य संस्कारी, पण ६२ साली मात्र गोष्टच जरा वेगळी होती. कित्येक सैनिक लढून नव्हे तर त्या जीवघेण्या थंडीनेच मेले. हो, दुर्दैवाने मेले हाच शब्द. म्हणजे साधी ब्लँकेट्सच ती काय फक्त होती, पण किमान साधी चांगल्या प्रतीची स्नो क्लोथ्सही सैनिकांकडे नव्हती.. सरकारी उदासीनता जिंदाबाद.. मरायचे तेवढे मेले. (‘सैनिकच तर आहेत ते, मरणारच की, ते मरण्यासाठीच असतात’ हा बेबीतला मुरली शर्माचा डायलॉग मध्येही एका कोंग्रेसी नेत्याने मारला होताच कुठेतरी त्यांची सत्ता असताना) त्यावेळी ब्लँकेट्स, की वेपन्स, की थंडी, की शत्रू, की अपुरे जेवण, की एकूणच खडतर हवामान, की असलेली तोकडी कुमक आणि अपुरी रसद, की मिळणाऱ्या आणि फॉलो कराव्या लागणाऱ्या ऑर्डर्स असे अजिबातच कन्फ्युजन नव्हते सैनिकांचे. परिणाम व्हायचा तोच झाला.. आपली प्रचंड मनुष्यहानी (सैनिकहानी शब्द कसा वाटतो) आणि अरुणाचलचा काही भाग चीनकडे.
अर्थात १९६५ युद्धावेळी इतकी खराब अवस्था नव्हती. गुलझारीलाल नंदा, आणि मगलालबहादूर शास्त्रींकडे सूत्रे असण्याचा तो काळ. मग ताश्कंद करार काय होतो, तो होताच लालबहादूरांचे नैसर्गिक (की घातपाती?) निधन काय होते, मग संशयाची सुई तेव्हाचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यावर काय येते आणि इन्फॉर्मेशन मिनिस्ट्रीसारख्या तेव्हाच्या फुटकळ खात्याच्या मंत्री इंदिरा गांधी थेट पंतप्रधान काय होतात.. सारेच अनाकलनीय. नाही का?
इंदिरा गांधींवरून आठवले.. बाबा नेहमी म्हणतात की माझ्या खरंतर तीन आया – एक माझी आई, दुसरी भारतमाता आणि तिसरी इंदिरा गांधी. म्हणजे झाले असे की ७१च्या युद्धावेळी जखमी सैनिकांना भेटायला पंतप्रधान या नात्याने त्या गेल्या होत्या, जसे अलीकडे नरेंद्र मोदी हनुमंतअप्पांना भेटले होते. सर्वाना पुरून उरणाऱ्या त्या खमक्या बाईने सैनिकांशी केलेला शेकहॅंड, खांद्यावर ठेवलेला हात सैनिकांचे बळ निश्चितच वाढवणारा होता. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त जी परेड असते त्यातही बाबा इंदिरा काळात १९७१/७२/७३ अशी तीन वर्षे सहभागी होते. तीन-तीन वर्षांचं रोटेशन असतं म्हणे रेजिमेंट्सना याचं.. तेव्हा तरी असायचं.
बरं फक्त हेच नाही, तर बाबांचे बरेचदा दिल्लीत इंदिरा सरकारच्या ऑफिसातही जाणे व्हायचे. सिसफायर मॅप मार्किंग घेऊन दिल्लीत साउथ ब्लॉक हेडक्वार्टरमध्ये जावं लागायचं. इंदिरा गांधी, जनरल, विंगकमांडर अशा मोठ्या अधिकाऱ्यांच्या तिथे मीटींग्ज व्हायच्या. काही सिक्रेट/ कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्सच्या फाईल्स, अपडेटेड नकाशे असलेल्या फाईल्स वगैरे तिथे नेऊन देणे हे जबाबदारीचे काम.. सिनियर सर्व्हेयर म्हणून ते एकदा बाबांकडे आलं, नीट केलं, आणि मग पुढे बरेचदा ते त्यांच्याच गळ्यात पडलं. ती फाईल एकदा सबमिट केली की हाशहुश व्हायचं असं बाबा म्हणतात.
दिल्लीत गेल्यावर बाबा बहुतेकदा त्यांच्या आत्येबहिणीकडे जेवायला जायचे. तिचे मिस्टर सिव्हील आर्मीत सिनियर कॅमेरामन म्हणून काही लष्करी डॉक्युमेंटरीज, इतर फोटोज, व्हिडिओज वगैरे कामे करायचे. जेवण तिथे झाले तरी, किंवा दिवसभर बाहेर असलात तरी रात्री झोपायला मात्र सक्तीने हेडक्वार्टर्समध्येच यावे लागायचे. आता ही आत्येबहीण कोण? (थोडेसे इंटरेस्टिंग विषयांतर) तर तिची आई म्हणजेच बाबांची सख्खी आत्या ही सुप्रसिद्ध संगीतकार शंकरराव व्यासांची पत्नी. हे व्यास म्हणजे रामराज्य, भरतभेट, इंद्रासन, सुदाम्याचे पोहे यासारख्या सुरुवातीच्या काळातील अनेक बोलपटांचे संगीतकार. मराठी, हिंदी, गुजराती अशा भाषांमधील अनेकचित्रपटांना त्यांनी संगीत दिले. त्या काळात सुधीर फडके आणि गदिमांसोबत त्यांचे बरेचदा येणे व्हायचे सांगलीला, तेव्हा आमच्या वाड्यात उतरायचे आणि आवरून मग नृसिंहवाडीला जाणे, (आम्ही मूळचे नृसिंहवाडीचेश्री दत्तगुरूंचे पुजारी/वाडीकर) तिथे ठरला असल्यास दत्तचरणी संगीत कार्यक्रम वगैरे प्लान्स.. १९५६-५७ पर्यंत गीतरामायणामुळे बाबूजी-गदिमा जोडी चांगलीच फेमस झाली होती नि त्यांच्यासोबत काही प्रोजेक्ट्समध्ये शंकरराव व्यास असल्याने ते सांगलीत घरी उतरले की तोबा गर्दी व्हायची. तेव्हा बालपणी या त्रयीचा थोडाफार सहवास बाबांना मिळाला.
मग अधूनमधून का होईना पण असे कल्चरल वातावरण असतानाबाबांना अचानक लष्करात जावेसे नेमके कधी आणि का वाटले? काय पाहिले त्यांनी १९६१ साली?आणि कुठे? जाणून घेऊ पुढच्या भागात..
(क्रमश:)
Monday, 20 June 2016
बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग ३)
बाबांना का वाटले मिलिटरी जॉईन करावेसे? तेव्हा घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. बाबांना चार भाऊ आणिदोन बहिणी.. नानांना (आजोबा) आपला आणि खर्च नको म्हणून साधारण सातवीनंतर पुढच्या शिक्षणासाठी बाबाकर्नाटकात त्यांच्या मामाकडे राहायला गेले.. केरूर येथे. तेव्हा अशी पद्धत अनेक घरांत होती की कुणी काम करतशिकण्यासाठी वा थेट आपल्या पायावर उभं राहून कुटुंबाला आधार देण्यासाठी, बाकी भावंडांची शिक्षणेनिभावण्यासाठी लहान वयातच बाहेर पडत. बाबांचे थोरले भाऊ विलासकाकाही वयाच्या चौदाव्या वर्षीच लेथमशीनवर उभे राहिले ते म्हणूनच. तर बाबा जेव्हा केरुरला होते, त्या काळात म्हणजे साधारण १९६१-६२ च्यादरम्यान गोवा एक्शन सुरु होती, अर्थात गोवा मुक्तीसंग्रामच.. ज्यात लष्कराचा सक्रीय सहभाग होता. तर तिथूनमिलिटरीच्या अनेक गाड्या जायच्या. त्या लष्करी गाड्या, त्या तोफा, ते सैनिक, त्यांची ऐट नि ते रुबाबदारपोषाख पाहून बाबा आणि त्यांची मित्रमंडळी कुतूहल म्हणून त्यांच्या मागे मागे पळत जायची. तेव्हा बाबाआठवी-नववीत असतील. त्या परिसरातून लष्करी विमानेही अगदी जवळून जाताना त्यांना दिसायची. मग तरआकर्षण आणखीनच वाढले.
अर्थातच ती विमाने सातत्याने पाहून बाबांचाही कल आर्मी किंवा नेव्हीपेक्षा एअरफोर्सकडे जास्त होता. आणि तोकाळ असा होता की तेव्हा तरुणांना देशभक्ती शिकवायला लागायची नाही, ताजं ताजं स्वातंत्र्य मिळालं होतं,त्याची लोकांना किंमत होती, ग्लोबलायझेशनच्या नावाखाली विदेशी आक्रमण व्हायला १९९२ अजून खूप लांबहोतं सो विदेशी वस्तूंचं आकर्षण तितकंसं नसायचं. त्यात बाबा म्हणजे कट्टर सावरकर आणि टिळकभक्त.. टिळकज्यांनी विदेशी वस्तूंची होळी केली. काहीही बरळण्यासाठीच आपला जन्म झाला असून आपले हे जीवितकार्यआपण (ते कितीही चुकीचे असले तरी) पार पाडलेच पाहिजे अशी काही नेते नि विद्यार्थ्यांची तेव्हा समजूत नव्हती.समाज अजून तितकासा बनचुका झाला नव्हता आणि महत्त्वाचं म्हणजे ‘भारत माता की जय’ म्हणण्यावरूनतेव्हा वाद होत नसत. वपुर्झात वपु म्हणतात त्याप्रमाणे देशभक्ती आणि प्रामाणिकपणा या गोष्टी टक्केवारीतनसतात, त्या एकतर तुमच्यात मुरलेल्याच असतात किंवा अजिबातच नसतात.
शिवाय गांधीवध झाल्यावर देशभरात ठिकठिकाणी ज्या ब्राह्मणविरोधी दंगली उसळल्या, त्यांचा फटकाहीत्यांना (ते आजीच्या पोटात असताना) बसला होताच.. म्हणजे सांगलीत आमच्या वाड्यावरही हल्ला झाला होता(सशस्त्रच असावा, किमान काठ्या तरी असतातच अशावेळी), जबरदस्तीने घरातून हुसकावून लावणे वगैरे आणितुरळक जाळपोळ प्रकार. तेव्हा कृष्णा नदीच्या तीराने अनेकांना, ते जीव मुठीत धरून बसण्याचे काही दिवस,आश्रय दिला होता.
तर अशी काहीशी पार्श्वभूमी नि ‘गर्भसंस्कार’ असल्याने ते कसलेसे ‘नेशन फर्स्ट’वाले बाळकडू उपजतच असावे. पणएकूणच त्या गोष्टींनी भारावले असल्याने ड्रिव्हन बाय दॅट जुनून, केरुरची ती चार मुलं चक्क एकदा थेट बेंगलोरलापळून गेली.
आता बेंगलोरच का.. तर तिथे येळहांका एअरफोर्स स्टेशन आहे. (फोटो पहा) तिथल्या ऑफिसरला कसंतरी गाठूनया पोरांनी सांगितलं की ‘आम्हालापण एअरफोर्स जॉईन करायचंय’. त्या कंपूत बाबाच वयाने आणि शिक्षणानेइतरांपेक्षा मोठे आणि तब्येतीनेही मजबूत.बाकी तिघे कम शिकलेले असल्याने आणि बाबा मॅट्रिकच्या उंबरठ्यावरअसल्याने त्या भल्या माणसाने नीट समजावून सांगितलं की ‘ एअरफोर्स जॉईन करायचं तर किमान मॅट्रिक तरीपाहिजे, ते आधी पूर्ण करून या मग विचार करू.’ तेवढं शिक्षण नसेल तर तिथं काम मिळत नाही असं नाही, पणमग कूक, स्वीपर, हेल्पर वगैरे कामे असतात.
![]() |
येळहांका एअरफोर्स स्टेशन |
बाबा परत आले, काही काळ गेला. पण स्वस्थ बसू देईल ती देशभक्ती कसली. (आजकालही देशभक्त लोक स्वस्थबसत नाहीत, निष्पाप अतिरेक्यांसाठी “बाबा रे, हम शरमिदा है, तेरे कातील जिंदा है वगैरे घोषणा देतात एवढंच)जायचं तर लष्करातच हे ठरलं होतं, मग एवढी कळ कुठली निघायला. शेवटी एअरफोर्स नाहीतर नाही, पण काहीकरून मिलिटरीत जायचेच आणि आत्ताच जायचे म्हणून बाबांनी आर्मी निवडली आणि जॉईन करूनच लवकरातलवकर मॅट्रिक (जुनी अकरावी) पूर्ण केली. ते होऊपर्यंत ते तिथे टेक्निकल असिस्टंट म्हणून कार्यरत होते, मॅट्रिकझाल्यावर सर्व्हेयर झाले.
![]() |
येळहांका एअरफोर्स स्टेशन |
समाधानाची बाब म्हणजे आर्टिलरी सेक्शन मिळाला, कारण इन्फंट्री म्हणजे मरणाचे हाल असतात. आर्टिलरीलाफिरायला गाड्या, जीप वगैरे तरी असतात, इन्फंट्री (पायदळ) म्हणजे सगळीकडे पायीच जायचं तेही अंगावर सततओझं घेऊन, फार खडतर ट्रेनिंग. काय खातात, काय जेवतात त्यांचं त्यांना माहीत.
बाबा म्हणतात, मिलिटरीत तर आर्टिलरी किंवा इतर कोणत्याही सेक्शनमधल्या सैनिकांची आपसांत चेष्टामस्करीचाललेली असली की ते असंच म्हणायचे- ‘तुझ्या मुलाला उचलून आणून इन्फंट्रीत टाकेन आणि तुला सांगणार पणनाही’ किंवा तो असेल त्या भाषिक प्रांताचा उल्लेख करून मुद्दाम दुसऱ्या सैनिकाशी टारगटपणे बोलणे पण तेहीटार्गेटला ऐकू जाईल असे की ‘अरे इन्फंट्रीला तमिळ डोकी पाहिजेत म्हणे अजून, जोरात भरती सुरु आहे, गरजपडल्यास आर्टिलरीतून उचलणार आहेत म्हणे.. नाही म्हणजे उस्ताद कुणाशीतरी बोलत होता ते कानावर आलंकाहीतरी की रंगनाथन दणकट आहे आर्टिलरीवाला.. लिस्टमध्ये घे’ वगैरे. मग तो चेहऱ्यावरचे रंग उडालेला तमिळरंगनाथन कुठला पोटभर जेवतोय त्या दिवशी. बाकीचे भले नाचतील ‘हवन करेंगे’ म्हणत, पण शेवटी त्यातमिळाची समजूतही काढतील आणि हसत खेळत एका ताटात ते (असेल त्या दर्जाचं अपुरं जेवण) जेवतील.तेवढाच रिलीफ, तेवढेच मनोरंजन.. नाहीतर विरंगुळा म्हणून बोलणार तरी काय ना..
अर्थात ऑगस्ट १९६५ ला जॉईन झाल्याने आणि तेव्हाच्या युद्धात आपली सैनिकहानी प्रचंड झाली असल्यानेनवीन दमाची फळी तयार करण्यासाठी मिलिटरी प्रशासनानेही काही कठोर पावले उचलली. तीन वर्षात दोन मोठीयुद्धे, त्यामुळे झालेला बॅकलॉग भरून काढायचा तोही लवकरात लवकर.. कारण पुन्हा पुढचे युद्ध कधी होईल सांगतायेत नाही, तयार असलं पाहिजे (जे झालंच पुढे सहा वर्षांनी) पण एकूणच त्याचा फटका तेव्हा जॉईन झालेल्या याबॅचला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प्रचंड बसला. कारण एरवी जॉईन झाल्यावर जे एकूण ५६ आठवड्यांचेट्रेनिंग असतं ते या बॅचसाठी मात्र केवळ ३२ आठवड्यात पूर्ण करण्यात आलं. म्हणजे काम तेवढंच, ट्रेनिंगतेवढंच.. फक्त ते शिकण्यासाठी कालावधी कमी.

मग काय,
तारांखालून क्रॉलिंग किंवा १५-२० फूट जाळी पायअडकवत अडकवत चढून जाताना जो घाम निघायचा, त्यापेक्षा खेळून निघणारा घाम आणि थकवा सैनिक एन्जॉयकरायचे. कुणी फ्रस्ट्रेशन काढत असला तर तो घोड्याला चांगलंच दामटवायचा, किंवा चार गोल जास्त करायचा जेया उस्तादवर्गाला सैनिकांमधली जिद्द, नेव्हर क्विट एटीट्यूड आणि विजीगिषु वृत्ती वाढवायला बरेच पडायचे.त्यांना काय जातंय मग गालातल्या गालात हसायला. बाबा हॉकी छान खेळायचे, सर्व्हिसेसच्या लोकलटीममधूनही खेळले होते.
तारांखालून क्रॉलिंग किंवा १५-२० फूट जाळी पायअडकवत अडकवत चढून जाताना जो घाम निघायचा, त्यापेक्षा खेळून निघणारा घाम आणि थकवा सैनिक एन्जॉयकरायचे. कुणी फ्रस्ट्रेशन काढत असला तर तो घोड्याला चांगलंच दामटवायचा, किंवा चार गोल जास्त करायचा जेया उस्तादवर्गाला सैनिकांमधली जिद्द, नेव्हर क्विट एटीट्यूड आणि विजीगिषु वृत्ती वाढवायला बरेच पडायचे.त्यांना काय जातंय मग गालातल्या गालात हसायला. बाबा हॉकी छान खेळायचे, सर्व्हिसेसच्या लोकलटीममधूनही खेळले होते.
हां पण हे सारे असले तरी आणखी एक निगेटिव्ह गोष्ट मात्र सैन्यातही होती, अजूनही असेलच. जिचा काहींनाफटका बसायचाच.. विशेषत: ट्रेनी सैनिकांना. ही गोष्ट मुळातच आपल्या देशात पूर्वापार चालत आली आहे, अगदीप्रत्येक क्षेत्रात आणि काही केल्या जाता जात नाही. कळले असेलच म्हणा या वाक्यावरून. पण तरीही त्याबद्दलआणि इतर काही गोष्टी पुढच्या भागात..
.
(क्रमश:)
Tuesday, 21 June 2016
बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग ४)
सैन्यात शिस्त पराकोटीची. सिनियर्सचे आदेश पाळणं आवश्यक. पण हे सगळं असलं तरी आणखी एक निगेटिव्ह गोष्ट मात्र सैन्यातही होती, अजूनही असेलच. जिचा काहींना फटका बसायचाच.. विशेषत: काही गुणी ट्रेनी सैनिकांना. ही गोष्ट मुळातच आपल्या देशात पूर्वापार चालत आली आहे, अगदी प्रत्येक क्षेत्रात आणि काही केल्या जाता जात नाही. कळले असेलच म्हणा या वाक्यावरून. बरोबर.. जाता जात नाही तीच म्हणजे जात.
बाबा जॉईन झाले तेव्हा दिवसा परेड, वेपन ट्रेनिंग वगैरे भाग तर रात्री काही टेक्निकल वर्क.. सर्व्हेयिंग, मार्किंग, कंट्रोल रूमचे काम कसे चालते वगैरे काही गोष्टी शिकून घेणं. आधीच ५६ ऐवजी ३२ आठवड्यात पूर्ण करण्यात आलं होतं. तरी २८ आठवड्यानंतर १० दिवसांची एक सुट्टी मिळाली होती. मग पुन्हा काही फिजिकल टेस्टस आणि फायरिंग वगैरे टेस्टस झाल्या.. आणि मग बाबांना साधारण एप्रिल-मे १९६६ च्या सुमारास पहिलं पोस्टिंग मिळालं ते डेहराडूनचं.
डेहराडूनला गेल्यावर जाणवलं की तिथेएकूणच संख्येने मराठे कमी होते, आणि शीख नि केरळी वगैरे जास्त होते. मग त्यांच्या त्या त्या प्रांतीय अधिकाऱ्यांचा त्यांच्या कंपूतल्या सैनिकांना सॉफ्ट कॉर्नर असायचा. जातपात आणि प्रांतवाद, भाषावाद हा नाही म्हटलं तरी तिथेही प्रत्ययाला आलाच. कुठेही कॅम्प गेला की सैनिकांना तिथे तंबू उभारून राहावे लागायचे. मग दिवसभर ग्राउंडवर्क आणि रात्रीचा वेळ टेक्निकल गोष्टींच्या सरावासाठी दिल्यावर तुम्हाला कुणी वाली नसेल तर अशावेळी बाहेर गस्त घालायला उभं राहावं लागायचं हातात दंडुका धरून. मग झोप किती मिळेल, किंबहुना मिळेल की नाही हे सांगता यायचं नाही. त्यात ती सैन्याची शिस्त, त्यामुळं वर तोंड करून विचारायची सोय नाही. कारण ऑर्डर डिसओबे झाली की शिक्षाही तितक्याच कडक असायच्या. म्हणजे आता पुढची वाक्यं वाचून आपण फक्त कल्पना करायची हं.



सैन्यात एखाद्या ज्युनियरने सिनियरला किंवा सहकाऱ्याला गोळी घातली अशी कधीतरी बातमी, अगदी क्वचित का होईना, पण आपण वाचतो. हे शक्यतो टाळण्यासाठीही ही शिस्त, आदरयुक्त भीती उपयोगी पडते. मुळात सिनियर्सविषयी मनात आदर असला की असं काही घडायची शक्यता कमीच. पण जर शारीरिक क्षमता आणि मनोबल कमी पडत असेल तर मात्र मग ते शिकाऊ सैनिक सरळ पळून येतात तिथून. (तिथून पळून येणंही सोपं नसतं. उगाच शाळा/कॉलेजात आपली प्रेझेंटी देऊन मागच्या दाराने वर्गाबाहेर पळून जाण्याचे वैयक्तिक अनुभव आठवू नये. पण मला तरी हे वाक्य नेमकं इथंच का सुचावं.. छे, भूतकाळ काही पिच्छा सोडत नाही)
एखाद्या मोहिमेवेळी असं करताना अशा खड्ड्यात कितीवेळ बसावं लागू शकतं याचा अंदाज नसतो, भूक लागली आणि अन्नाची पॅकेट्सही नसतील तर लगेच खा ती हिरवी पाने तरी असंही करता येत नाही, कारण आपण तिथे बसलोय हे शत्रूला दिसता कामा नये, पोषाखही त्याच रंगाशी मिळताजुळता असतो. सरडा जसं भक्ष्य टिपण्यासाठी कितीही वेळ बसून राहतो, आणि भक्ष्य टप्प्यात आलं की कायच्या काय लांब जीभ बाहेर काढून त्याला टिपतो, तसंच सैनिकांना करावं लागतं. शत्रू टप्प्यात आला की हा गोळीबाराचा समन्वयही साधावा लागतो. वायरलेस प्रत्येकवेळी असतीलच असं नाही, डिपेंड्स मोहीम कितपत मेजर आहे (अशा प्रत्येक मिशनलाही खास नावं दिलेली असतात.. मिशन अमुक किंवा ऑपरेशन तमुक), मग कधी खड्डे जवळजवळ असतील तर खाणाखुणा किंवा आधीच ठरलेले संकेत – पक्ष्याचा आवाज, विशिष्ट शिट्टी, किंवा रायफलनेझाडीत किंचीतशी हालचाल वगैरे. आणि मग दे दणादण... ठ्या ठ्या ठ्या धूड धूड धूड धूड.. (गोळीचा ढिश्क्यांव असा आवाज फक्त हिंदी सिनेमातच येतो)

हे बंकर्स आणि स्नेक स्ट्रेचिंगसाठीचे खड्डे खोदणं, तंबू लावणं वगैरे कामही असायचीच.. फक्त तेथील संबंधित हायर रँकचे क्लास वन ऑफिसर्स आणि ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर्स (जेसीओ) यांना या कामातून सूट असायची. अर्थात इतरांकडून कामं नीट करून घेणं ही त्यांची जबाबदारी असायचीच, म्हणजे काम सांगून हा स्वत: आत तंबूत जाऊन झोपला असं नसतं, त्या अधिकाऱ्यालाही लक्ष ठेवण्यासाठी जागावंच लागतं. तो लष्करी तंबू असतो, सरकारी ऑफिस नव्हे.
पण या कामातून प्रसंगी कधी कधी मोकळीकही मिळायची, तेही अधिकाऱ्यांकडूनच.. एखादी जादा येत असलेली भाषा मदतीला धावून यायची, काय.. आता हे कसं? सांगतो पुढच्या भागात..
(क्रमशः)
Tuesday, 21 June 2016
बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग ५)
एखादी जादा येत असलेली भाषा सैन्यात मदतीला धावून कशी येऊ शकते? हा फायदा बाबांनाही झाला होता. आता हे कसं? सैन्यात असताना काय असतो फायदा अशी एक्स्ट्रा भाषा अवगत असेल तर..
सातवीपर्यंत इकडे मराठी माध्यमात शिक्षण झाल्यावर पुढे सातवीनंतर बाबा केरूर भागात राहिले असल्याने तेव्हा कन्नड भाषेतूनही शिक्षण झाले होतेच. त्यावेळी काकांकडे राहताना घरातली काही कामे करत करतच ते सांभाळून शिक्षण, दरम्यान त्या भागातून सतत जाणारी एअरफोर्सची विमाने पाहत मनात उत्पन्न झालेले सैन्याचे आकर्षण, त्यापायी एकदा मित्रांसोबत थेट बेंगलोरला पळून जात येळहांका एअरफोर्स स्टेशनवर मारलेली धडक असा सगळा मामला काहीच वर्षांपूर्वी बाबांच्या बाबतीत घडून गेलेला होता.
६५ साली सैन्यात भरती झाल्यावर सैन्याचे ५६ आठवड्यांचे ट्रेनिंगही ३२ आठवड्यात पूर्ण करण्यात आले होते. ६२ आणि ६५ च्या युद्धात झालेला प्रचंड लॉस, ती जीवितहानी लवकरात लवकर भरून काढण्यासाठी केलेली उपाययोजना म्हणजे इकडे वाढवलेला हा असा रनरेट, नवीन फळी एएसएपी तयार झाली पाहिजे ना.. कारण पुढचं युद्ध कधी होईल सांगता येत नाही.. जे झालंच पुढे सहा वर्षात १९७१ साली.

...आणि इथे फायदा होतो भारतीय सैन्याला भारत बहुभाषिक असण्याचा. कारण पुढच्या आपल्या हालचाली, त्यासाठी होणारे संभाषण किंवा जनरल गोष्टीही जेव्हा पाकडे कॅच करायचे तेव्हा त्यांना ते समजू नये, डिकोड करता येऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जायची/जाते. म्हणजे आपल्याकडे असतात तसे त्यांच्याकडेही ट्रान्सलेटर्स असतातच, पण गंमत म्हणजे पाकिस्तानी गोटात हिंदी, मराठी, बंगाली, पंजाबी, गुजराती अशा भाषा डिकोड करून अर्थ सांगणारे होते, कारण या भाषा त्यांच्या हिंदीलाही तशा जवळच्याचं आहेत आणि लिपीतही फारसा फरक नाही.. पण कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळमसारख्या दाक्षिणात्य भाषांचे काय? त्या या पाकड्यांना घंटा कळत नाहीत. आणि इथेच भारताचा फायदा व्हायचा.
इकडे आपल्याआपल्यात काय बोलणं चाललंय ते शत्रूला कळू नये म्हणून ही सगळी दक्षता. एकमेकांत इकडे वायरलेसहून येणारे मेसेजेस, त्यांच्या गोटातले कॅच केलेले सांकेतिक किंवा साधे संदेश आणि रिसिव्हिंग एन्डला इकडे बसून ते डिकोड करणे आणि इन चार्ज ऑफिसरला माहिती देणे, रिपोर्ट करणे हे अशा अतिरिक्त भाषा येणाऱ्यांचे काम. त्यामुळे मग अशी स्कीम करायची असली की दाक्षिणात्य भाषा येणाऱ्यांना खुदाईकामातून सूट आणि तंबूत टेक्निकल टीमची मदत करणे हे काम..
‘वो पुजारी को इधर भेजो, कन्नडा में बोलना है, समझना है.. जाओ ये खुदाई तुम करो’ वगैरे आदेश सुटायचे. या सगळ्याचा फायदा डायरेक्ट फ्रंटवर... मग ती एखादी छोटीशी चकमक असो की प्रत्यक्ष मोठे युद्धच.. कारण ठरल्याप्रमाणे आपले सैनिक कन्नड, तमिळ वगैरे भाषेची चेन करून बोलायचे.
कधी कधी शत्रूची दिशाभूल होण्यासाठी मध्येच काही हिंदी किंवा उर्दू शब्द टाकायचे, जेणेकरून तो तेवढाच शब्द पकडून शत्रू काहीतरी हमखास चुकीचा अंदाज लावून त्याप्रमाणे त्याचा प्लान ठरवणार आणि मग इकडे चकमकीत आपल्यालाहवी ती बाजू शत्रूकडून ढिली व्हायची किंवा कधी आपणच एखाद्या दिशेकडून आधीच सैनिक पेरून ठेवायचे आणि मेसेजमध्ये बोलताना मुद्दाम ‘अंडू गुंडू अंडू गुंडू पहाडी की पीछेसे अपना ट्रूप क्लियर करो, सबको वापस बुलाओ अंडू गुंडू’ (इथे अंडू गुंडू म्हणजे कोणतीही दाक्षिणात्य भाषा, मला येत नाही म्हणून सोय) वगैरे पावशेर टाकायचं.झालं.. शत्रू गंडला खुश होऊन तिथे जाऊन.
अर्थात कधी कधी संपूर्ण संभाषणंच दाक्षिणात्य भाषेत व्हायची. बहुतेकदा गन पोझिशनवरून (GP) ऑब्झर्व्हेशन पोस्टला (OP) जाणारे अतिशय महत्त्वाचे मेसेजेस शत्रूने कॅच करू नयेत म्हणून या अशा दाक्षिणात्य भाषांचा तिथे उपयोग केला जायचा. GP आणि OP दोन्हीकडे अर्थात तसे सक्षम भाषाप्रभुत्व असलेले, गरज पडल्यास सांकेतिक भाषेतून बोलू शकणारे सैनिक असायचे जे ट्रान्समीटर्स आणि रिसिव्हर्स म्हणून त्यांची कामगिरी चोख पार पडायचे. बाकी मेसेज डिकोड करणारी, ट्रान्सलेट करणारी टीम मदत म्हणून असायचीच. ‘हे हे अमुक बोलायचंय.. बोल कन्नडमधून’ असं सांगणारे ऑफिसर्स तिथे असायचे. हे असं दोन्ही एन्ड्सना चालायचं. जे पोचवायचंय ते सहकाऱ्याला हिंदी वा इंग्रजीत सांगणे, मग त्याने ते कन्नड, तमिळमध्ये वगैरे तिकडे पोचवणं आणि तिकडे हीच क्रिया उलट, म्हणजे कन्नड समजून घेऊन ते हिंदीतून सांगणे, त्यावरील उत्तर हिंदीत ऐकून कन्नडमध्ये पोचवणं.. आणि असं कितीही वेळ.
कधी कधी तास दोन तासातून एखादा मेसेज.. पण दोन्ही बाजूंचे सैनिक कानात प्राण आणून ते ऐकत बसलेले असतात. तशी प्रक्रिया फार वेळखाऊ, नि किचकट, पण शत्रूला थांगपत्ता लागू नये म्हणून तितकीच गरजेचीही. या सगळ्याचा आढावा घेऊन त्यानुसार योजना आखत फ्रंटवर काय व्हावे, तोफा अमुक अंतर मागे घ्या, पुढे घ्या, या दिशेने आणखी सैन्य पाठवा, इकडे इतकी रसद पुरवा, किंवा कधी तिकडून त्यांची स्वत:हून काही हालचाल होईपर्यंत ढिम्म रहा वगैरे ऑर्डर्स देणारा अधिकारी पुढे असायचा.
पण नेमके आर्टिलरीचे काम कसे चालते? तोफखान्यात काम करताना तिथल्या जबाबदाऱ्या काय असतात, त्याना तोफांबद्द्ल खास असे काय शिकवले जाते? पाहू पुढच्या भागात..
(क्रमश:)
Tuesday, 21 June 2016
बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग ६)
आर्टिलरीचे काम नेमके कसे चालते? तोफखान्यात काम करताना तिथल्या जबाबदाऱ्या काय असतात? सैनिकांना तोफांबद्द्ल खास असे काय आणि कधी शिकवले जाते?
एकतर युद्धाच्या प्रसंगी सर्वात बेसिक पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोफा कुठेकुठे ठेवायच्या, त्यांच्या पोझिशन्स नेमक्या काय असाव्यात, किती स्थिर तोफा वापरायच्या, किती मोबाइल तोफा वापरायच्या आणि कधी (ज्या एखाद्या वाहनातून गरज पडल्यास ऐनवेळी चटकन दुसरीकडे नेता येतील) हे ठरवणं. कुठून तोफगोळे टाकले तर जास्तीत जास्त एरिया कव्हर करता येईल हे आर्टिलरी टीमला आधी ठरवून घ्यावे लागते.
तोफांचे मार्किंग, आणि ते गोळे किती लांबवर पडू शकतील त्याचा अंदाज (गोळ्याचे वजन, वेग, अँगल, ट्रॅजेक्टरी या सगळ्याचा विचार करून) घेऊन ते शत्रूच्या हद्दीत पडून कितपत डॅमेज करतील हे सांगणं. मिलिटरी भाषेत ‘एस्टिमेटेड डेंजर झोन’ ठरवून सांगणं. परिस्थितीचा अभ्यास करून काही कॅल्क्युलेशन मांडणं, आणि मग वेग, वेळ, विध्वंसक क्षमता वगैरे त्रैराशिक मांडून पाहणं कोणती तोफ कुठे सुटेबल ठरेल, त्यानुसार डिप्लॉयमेंट ठरलेले.
![]() |
डिरेक्टर थिओडोलाइट |
खरंतर तसा डेटा उपलब्ध असतोही, की कोणत्या कॅटेगरीतला गोळा किती अंतरावर किती सेकंदांत जाऊन पडेल आणि कितपत डिस्ट्रक्शन करू शकेल. पण जर एखादेवेळेस अशी तयार माहिती उपलब्ध नसेल तर मात्र प्रॉपर trigonometry कॅल्क्युलेशन वापरून ते Sin, Cos, Tan वगैरे मित्रांच्या मदतीने अँगल्स आकडेमोड करून शोधून काढणे आणि सांगणे, हे काम असायचे.
![]() |
डिरेक्टर थिओडोलाइटचा वापर (फोटो प्रातिनिधिक) |
![]() |
देवळाली आर्टिलरी सेंटर - तोफ |
तर नंतर हैद्राबाद हे सेंटर होते जिथे ‘स्कूल ऑफ आर्टिलरी’ मध्ये वेगवेगळे कोर्सेस शिकवले गेले. अर्थात त्यासाठीही एक्झाम्स असायच्याच. म्हणजे नाशिक सेंटरमधून पास झाल्यावर इकडे विशिष्ट कोर्ससाठी एडमिशन घेताना पुन्हा एखादी एक्झाम वगैरे. पूर्ण युनिटमध्ये तीसच विद्यार्थी असायचे. हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला की त्या सैनिकाचे पुन्हा आर्मीत जाताना Instructor म्हणून प्रमोशन व्हायचे, कारण नाशिक कोर्सपेक्षा ही अजून एक हायर ग्रेड आता अचिव्ह केलेली असायची. थोडक्यात पोस्ट ग्रॅज्युएशन. पण हैद्राबाद सेंटरमधून कोर्स पूर्ण केल्यावर तिथून पुन्हा मिलिटरीत जावे लागायचे, कारण आता हे सैनिक कोर्स क्वालिफाइड झालेले असायचे. आणि Counter Bombardment म्हणजे ऑलरेडी आधीच शत्रूच्या तोफखान्याकडून हल्ला झाला तर कसे प्रत्त्युत्तर द्यायचे याचेही ट्रेनिंग झालेले असायचे, म्हणजेच लगेच उद्या जरी हल्ला झाला, युद्ध छेडले गेले तरी हे सैनिक काउंटर अटॅक करायला सज्ज आहेत असे समजले जायचे.
या कोर्सेसमध्ये तोफा, त्यांचे काम कसे चालते, त्यांची निगा कशी राखावी, तोफगोळे नि त्यांची माहिती, प्रत्येकाची वजनानुसार destruction power, गोळे बनवतानाचे त्यातील ingredients, वाऱ्याचा किंवा एकूणच हवामानाचा गोळ्याच्या गतीवर आणि गोळा लँड होताना अंतिम विध्वंसक शक्तीवर होणारा परिणाम वगैरे माहिती आणि इतर काही पूरक अभ्यासक्रम म्हणजे मॅप मार्किंग करताना तोफांची strategic locations, युद्धाच्या वेळी आवश्यक त्या मानसिकतेचा अभ्यास, शत्रूच्या हल्ल्यांचा अंदाज घेणे, आपल्याकडे पडू शकणाऱ्या गोळ्यांची फ्रिक्वन्सी, एकूणच विध्वंस पाहून लगेच पुढच्या ऐनवेळी बदलाव्या लागू शकणाऱ्या उपाययोजना, अचानक दिशा किंवा वजनी गोळे बदलून शत्रूचा अंदाज चुकवणे वगैरे अनेक गोष्टी शिकवल्या जायच्या.
![]() |
देवळाली आर्टिलरी सेंटर - सराव |
आता हे कौशल्य आत्मसात करून आल्यावर या सैनिकांची जबाबदारीही तेवढीच वाढलेली असायची. म्हणजे गोळा सांगितलेल्या ठिकाणापेक्षा दुसऱ्या point वर पडला तर ती चूक अर्थात यांची. गोळा त्याच ठिकाणी पडला पाहिजे. मॅप मार्किंग करताना झालेली बॉर्डर मार्किंग आणि एक्च्युअल मार्किंग यांचा proportion नुसार अंदाज घेऊन आणि ग्रीड रेफरन्स तयार करून कमांडरला देणे हे एक काम असायचे.
गोळा नेमका कुठे आणि किती वेळात पडेल याचीही एक सेट एक्युरसी असते. ते प्रिसाईजली ठरवण्यासाठी आधी सर्व्हे टीमलाही जावे लागायचे. म्हणजे सर्व्हे करून मॅप्स अपडेट करणे, रूट चार्ट तयार करणे इत्यादी. हे सारे काम त्यावेळी जास्तीत जास्त मॅन्युअली करावे लागायचे, पण आता ते टेक्नॉलॉजीमुळे खूप सोपे झाले आहे आणि त्यामुळे अर्थातच बहुमूल्य मानवी श्रम आणि वेळ वाचतो आहे असं बाबा म्हणतात. ही वाचलेली एनर्जी सैनिकांना पुढे युद्धासाठी राखून ठेवता येते.
आता हे सगळे झाले जमिनीवरून जमिनीवर होणाऱ्या हल्ल्यांसाठी, त्या युद्धांसाठी जिथे दोन्ही बाजूंनी इन्फंट्री (पायदळ) आणि आर्टिलरी (तोफखाना) याच मुख्य घटकांत युद्ध होत असतं. पण मग एअर अटॅक झाला तर काय करायचे? हा भाग पुढच्या भागात पाहू…
(क्रमश:)
Tuesday, 21 June 2016
बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग ७)
जमिनीवरून जमिनीवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये दोन्ही बाजूंनी इन्फंट्री (पायदळ) आणि आर्टिलरी (तोफखाना) याच मुख्य घटकांत युद्ध होत असतं. पण मग एअर अटॅक झाला तर काय करायचं?आणि युद्धातले धोके, घ्यायची काळजी कोणती?

पण एक आहे, एअरफोर्सला आर्टिलरीची भीती असतेच. या दोघांमध्ये फार खुन्नस असते. कारण आपल्यावर गोळा कसा कुठून येईल हे एअरफोर्सवाल्यांना एकदम ओळखता येत नाही. आणि इकडे रडार सिस्टीम परफेक्ट सिग्नल्स देत असेल तर एअरफोर्सचे होत असलेले आणि संभाव्य हल्लेही आर्टिलरी नामोहरम करू शकते. थेट विमानांवरच निशाणा साधून विमानंच उडवून टाकणं. ना रहेगा बांस ना बजेगी बांसुरी. एकेका विमानात बराचसा दारुगोळा असतो, त्यामुळं एक फायटर प्लेन नेम धरून बंबार्डमेंट करत हवेतच उद्धवस्त केलं की पुढचा आपल्याकडचाही बराचसा संहार टळतो. थोडक्यात वेळीच घातलेला एक टाका पुढचे नऊ टाके वाचवतो,Prevention is better than cure वगैरे..
अर्थात युद्धात मात्र आर्टिलरीचं मुख्य काम हे इन्फंट्रीला (पायदळ) सपोर्ट करणं हेच असतं. मग इन्फंट्रीचं त्याना मिळणाऱ्या ऑर्डर्सनुसार advancement करणं सुरु असेल किंवा withdrawal करणं, दोन्हीवेळी तोफखाना त्याना प्रोटेक्शन देत पुढे नेतो किंवा धोक्यातून बाहेर काढत मागे आणतो. कारण कधी कधी आठ पावलांची झेप घ्यायला चार पावलं मागे यावं लागतं. शिवाय शत्रूला खोटा कॉन्फीडन्स देऊन आपलं मनोबल खचलंय असं दाखवत त्यांना बेसावध करून अचानक डबल ताकदीनिशी हल्ला करणं वगैरे असतंच. असो, वॉर टेक्निक्स हा पूर्ण वेगळा आणि मोठा भाग.


युद्धातला एक मोठा धोका म्हणजे फुटबॉलमध्ये सेल्फगोल. म्हणजे आपल्याच चुकीनं आपलेच सैनिक मारले जाण्याची शक्यता असते, ते मरू नयेत म्हणून काळजी घ्यावी लागते. ट्रूप प्लेसमेंट नीट आखावं लागतं, अगदी मायनर पोझिशन्सही.. म्हणजे जे स्वत: प्रत्यक्ष लढत नसतात असेहीसैनिक. उदाहरणार्थ, एका तुकडीकडची रसद संपत आलीय असा संदेश मिळाला की अमुक ठिकाणी इतके इतके गोळे आणि गोळ्या नेऊन देणारे सैनिकही कुठून कसे जातील हे ठरलेलं असतं. कारण तिथे सगळा मामला अक्षांश रेखांशावर चालत असतो. ‘पुढे दोन खडक जाऊन उजव्या अंगाला खाली वळा’ अशी भाषा नसते. वॉकीटॉकीवरून एक्झॅक्ट कोऑर्डीनेट्सच कम्युनिकेट केले जातात आणि त्याप्रमाणे पोझिशन्स घेतल्या जातात, बदलल्या जातात.
हे कोओर्डीनेट्स फार अभ्यासपूर्वक ठरवावे लागतात की कोण कुठे बसेल, उभा राहील, कोणती तुकडी किती एरिया कुठल्या दिशेने प्रोग्रेस होत कव्हर करेल, तिथे गरज पडल्यास उरलेल्यांपैकी कोणत्या तुकडीतले सैनिक धाडायचे, प्रत्येक गटात लीडर कोण असेल वगैरे सगळंच आधी ठरवावं लागतं. थोडक्यात जोश में होश खो दिया आणि जिथे जाणं अपेक्षित नाहीये तिथे घुसून तिथल्या टीमचा बॅलन्स बिघडवला, त्यांचं लक्ष विचलित होऊन ते शत्रूच्या गोळ्यांना बळी पडलेअसं चालत नाही. किंवा अमुक ठिकाणी खडकांत, झाडीत आपलीच एक दुसरी तुकडी बसलीय आणि त्यांच्या पलीकडे शत्रू असला तरी सावधानतेने फायरिंग करावं लागतं. अशा वेळी विशिष्ट ठिकाणी फायरिंगची ऑर्डर असेल तर अमुक अँगलनेच गोळीबार करावा लागतो, कारण तिथे बसलेल्या आपल्याच सैनिकांना आपलीच गोळी लागू नये. आपलेच दात आपलेच ओठ टाइप..
![]() |
भारतीय लष्कराच्या ताफ्यातील एक रणगाडा तोफ |
![]() |
इंडियन फायटर प्लेन - मिग २९ |
प्रतिस्पर्धी एअरफोर्स आणि आर्टिलरी म्हणजे साप आणि मुंगुस. कितीही तयारी करून आलेल्या फायटर प्लेन्सना जसा तोफखाना भारी पडतो तसाच एअर अटॅक झाला तर आर्टिलरीलाही विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणजे एकाच वेळी सगळ्या तोफा त्यांच्या हल्ल्याने डॅमेज होऊ नयेत म्हणून अर्ध्या तोफा या रूटला तर अर्ध्या तोफा त्या रूटला जातात.शिवाय इमर्जन्सीमध्ये अगदी ऐनवेळी कितपत तोफगोळे, सैनिक, ऑपरेटर इत्यादी कुमक आपल्या मदतीला येऊ शकते याचाही अंदाज घ्यावा लागतो.
यासाठी फेमस टेक्निक म्हणजे सँड मॉडेल्स किंवा क्लोथ मॉडेल्स बनवून त्यानुसार आधीच सूचना देऊन ठेवणं. त्यासाठी आवश्यक ते आर्टवर्क आधी तयार करणं. वॉर प्लॅनिंग खरं यातच होत असतं. अर्थात या सर्वच टॉप सिक्रेट गोष्टी, ज्या फक्त रेजिमेंट कमांडर, ऑन ड्युटी ऑफिसर आणि सर्व्हे ऑफिसर यांनाच माहिती असतात. मग इतर लहानमोठे ऑफिसर किंवा ट्रूप लीडर्स मौका बघून यापैकी कुणाशी सलगी असेल तर मागे लागतात की ‘सांग ना, आमची पोझिशन कुठे आहे’, ‘अगदीच जबड्यात जायचंय आधीच की टप्प्याटप्प्यानं’,‘उद्या आम्ही जात्यात आहोत की सुपात’ ही अशी विचारणा होतच असते. पण अशा ‘अवांतर’ वेळी कोणतीही माहिती या ऑफिसर्सकडून काही केल्या पुरवली जात नाही. सर्व अलॉटेड पोझिशन्स आणि वॉर प्लेसमेंट्स सर्व एक्टीव्ह रेजिमेंट्स आणि डिपार्टमेंट्सना (हेल्पिंग, वॉर मटेरियल सप्लायिंग, रिप्लेसमेंट फॉर इंज्युर्ड सोल्जर्स, रेस्क्यू, मेडिकल हेल्प वगैरे विभाग) एकाच वेळी सांगण्यासाठी एक स्पेशल नॅरेटीव्ह सेशन असतो, तेव्हाच या गोष्टी सांगितल्या जातात.
अशी मॉडेल्स बनवणं, आर्टवर्क करणं, सांग सांग म्हणून मागे लागलेल्यांना मार्किंग्ज, पोझिशन्स न सांगणं, आणि फायनली ती जबाबदारीची सेशन्स नीट नॅरेट करणं ही सगळीच कामं सर्व्हे ऑफिसर झाल्यावर बाबांनाही करायला मिळाली. मुळातच उत्तम असलेलं ड्रॉइंग आणि जॉईन झाल्यावर घेतलेलं टेक्निकल नॉलेज, नाशिकला केलेलाCounter Bombardment(CB 52)कोर्स या सगळ्याच गोष्टींचा त्याना हा एक महत्त्वाचा पण तितकाच जोखमीचा अनुभव मिळवण्यासाठी चांगलाच फायदा झाला.
हे इतकं सगळं शिकायला मिळत असताना सैनिकांकडे कोणत्या बाबतीत दुर्लक्ष होत असतं? त्यांना मिळणारं वेतन, एकूणच सोयीसुविधा (?), आणि महत्त्वाचं म्हणजे आहार त्यांच्या जबर शारीरिक कामाला, रोजच्या कष्टांना आणि त्यागाला साजेसा असतो काय? त्यांना कोणत्या एका गोष्टीची सर्वात जास्त खंत असते? हा भाग पुढच्या लेखात..
(क्रमश:)
Tuesday, 21 June 2016
बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग ८)
बहुसंख्य सैनिकांचं दु:ख काय? त्यांना मिळणारा तुटपुंजा पगार, की तुटपुंजा शब्द पुष्कळ वाटेल असा मिळणारा आहार? की आणखी काही वेगळीच, सहजासहजीलक्षात न येणारी गोष्ट? उलगडून बघू जरा..
बहुसंख्य सैनिकांचं दु:ख काय? त्यांना मिळणारा तुटपुंजा पगार, की तुटपुंजा शब्द पुष्कळ वाटेल असा मिळणारा आहार? की आणखी काही वेगळीच, सहजासहजीलक्षात न येणारी गोष्ट? उलगडून बघू जरा..
जॉईन झाले त्या काळी बाबांना एकूण पगार साधारण ७४ रुपये मिळायचा. पैकी बेसिक ५० रुपये, डीए २० रुपये आणि ४ रुपये डीडक्ट व्हायचे. एक तारखेला पगार झाला की दर महिन्याला बाबा लगेच फॅमिली अलॉटमेंट पॉलिसीखाली त्यातले तब्बल ५० रुपये डायरेक्ट इकडे सांगलीला पाठवून द्यायचे, डायरेक्ट कट म्हणजे प्रत्यक्ष हातात तेव्हा २० रुपयेच पडायचे आणि ५० रुपये तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर पाठवल्याची सही-शिक्क्याची रिसीट असा प्रकार.
हे पैसे स्लो मोशनमधल्या कासवाला किंवा पोलिओ झालेल्या गोगलगायीलाही उसेन बोल्ट ठरवेल अशा पोस्ट ऑफिसच्या वेगवान कारभाराने महिना अखेरीस इकडे पोहचायचे. हे सायकल प्रत्येक महिन्यात. नेहरू सरकारने तेव्हापासूनच सरकारी खात्यांना वेळच्या वेळी कामे करायची सवय लावली असती, लोकांना जरा स्वच्छतेचे महत्त्व पटवायला काही शिस्त लावली असती तर आज नक्कीच वेगळे चित्र दिसले असते. आणि भारत म्हणजे ‘गांधी, गरिबी, रस्त्यावरच्या गायी आणि गारुड्यांचा देश’ अशी इनफेमस इमेज झाली नसती आपली जगभरात. आज मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाची खिल्ली उडवली जाते ती यामुळेच की ‘अरे ६० वर्षे आम्ही रस्त्यावर थुंकत आलो, कचरा इथे तिथे मनसोक्त टाकत रस्त्याचं डेकोरेशन करत राहिलो आणि आता असं मध्येच कसं थांबू’ टाइप. असो, तो वेगळा विषय.
पाठीवर ३ भाऊ, २ बहिणी अशी धाकटी टीम, आई बाबा असे सांगलीत कुटुंब आणि तेव्हा लहान वयात परिस्थितीमुळे कमवायला लागलेले बाबा आणि मोठे काका हे दोघेच. असं त्या काळी बऱ्याच घरी चित्र असायचं की थोरले एकदोघे कमवायला बाहेर पडलेत आणि त्यांच्या खांद्यावर घरचे खर्च निभावून नेले जातायत. अर्थात इतरही भावंडे त्यांना जमतील तशी, मिळतील ती कामे शिकतानाही करून घरच्यांसाठी अर्थार्जन करत राहायचेच.तरी नानांनी बाबांना सांगितलं होतं की ‘अरे तू असे इतके पैसे एकदम पाठवत जाऊ नकोस. तशी काही गरज नाही. किंबहुना १९६६ लाच त्यांनी बाबांना स्वत:चे अकाउंट ओपन करून पैसे साठवायला सांगितले होते. पण बाबांनी ते सिरीयसली घेतले नाही, आणि अगदी १९८० पर्यंत पैसे पाठवतच राहिले.
पण तिकडे सीमेवर असताना पैसा, पॅकेज, फॅसिलिटीज वगैरे गोष्टी अर्थात टोचत नाहीत. टोचते ती वेगळीच गोष्ट. मुळातच ९० टक्के सैनिकांचं दु:ख हेच की आपण कुटुंबापासून इतके दूर आहोत, कित्येक महिने भेट नाही, संपर्क अगदी कमी.. (आज आहे हे सगळं फोन्स, इंटरनेट वगैरे.. तेव्हा फक्त पोस्टकार्ड झिंदाबाद.. क्वचित फोन तेही खूप नंतरच्या काळात) पण फक्त दूर आहोत ही खंत नसते तर आपण त्यांना प्रत्यक्ष तिथे राहून काही मदत करू शकत नाही हे शल्य जास्त.
म्हणजे अचानक कुणी आजारी पडले तर ताबडतोब पोहचणे, किंवा कुणाचे लग्न, मुंज, बारसे वगैरे काही असेल तर ते अटेंड करणे हे दुरापास्त व्हायचे. लेह, लदाख, सियाचीनसारख्या भागात पोस्टिंग असताना तर ही वेदना जास्त भीषण. (होप तार तरी खरंच तारेच्या वेगानं जात असेल तेव्हा) बाबांनाही सगळ्याच भावंडांच्या लग्नात उपस्थित राहणे जमले नाही ते यामुळेच. अर्थात गंमत म्हणजे जे २० रुपये उरायचे त्यातही खर्च निवांत भागायचा. कारण खर्च म्हणजे काय तर फक्त तेल, साबण, ब्रश, टूथपेस्ट, दाढीसामान, चार कपडे वगैरे एवढाच. (शीख सैनिक सोडून शक्यतो कुणालाही परवानगी नसते दाढी ठेवायला, मग इतरांसाठी रोज दाढी करणं आलंच)
![]() |
इंडियन आर्मी रँक्स |
एक गंभीर आणि खरंतर चुकीची गोष्ट म्हणजे जेवणाच्या बाबतीत घडायची. सैनिकांना जेवण अगदी मर्यादित मिळायचं. दर्जाबद्दल न बोललेलंच बरं. फिजिकल एक्सरसाइज झाल्यावर प्रत्येक सैनिक मग ६-८ केळी हादडायचा. जेवण ऑफिसर्सना चांगल्या प्रतीचं आणि पोटभर, पण इतर रँक्सच्या सैनिकांना मात्र अगदीच साधं, कधीकधी बेचव, निकृष्टच.
कमाल आहे, ज्यांना प्रत्यक्ष फ्रंटवर जाऊन शत्रूशी दोन हात करावे लागतात, त्यासाठी मजबूत व्यायाम करून तब्येत कमवावी लागते, बोजड रायफल्स हाताळत त्या सतत पाठीवर वागवत राहाव्या लागतात, अवजड तोफगोळे वगैरे वाहून न्यावे लागतात, रोज कसरतीत इतका घाम गाळावा लागतो त्यांना सैन्यात ही ट्रीटमेंट. पण कुणी काही बोलू नाही शकायचं, कारण सिपॉय रँकवर जॉईन झालेल्यांपैकी कित्येक तर कमी शिकलेले, अनपढही असत. अशांना आपल्यावर अन्याय होतोय हेही कळत नसतं. किंवा ‘इथे हे असंच असतं’ अशी त्यांनी समजूत करून घेतलेली असते. म्हणजे अपेक्षा काय तर इथल्या कामाला, फ्रंटवर लढायला पाहिजे वाघ आणि आहार मात्र शेळीचा.. असं कसं चालेल?

त्यातल्या त्यात बरी गोष्ट म्हणजे १९८० नंतर तरी चित्र हळूहळू का होईना पण बदलत गेलं असं बाबा म्हणतात. ८० हा असा टप्पा होता ज्याआधी नऊ वर्षं मेजर युद्ध करावं लागलं नव्हतं आणि त्याधीच्या नऊ वर्षांत तीन मोठी युद्धं लढावी लागली होती. १९७५ च्या आणीबाणीतून पुढे सरकारनेही आतापर्यंत थोडाफार धडा घेतला होता. ८० च्या दशकापासून राजकीय स्थिती बदलू लागली तसेच इकडे भरती होणारे सैनिकही बऱ्यापैकी शिकलेले असायचे. आणि आताशा तर किमान बारावी झालेलेच असतात बहुसंख्य. त्यामुळे त्यांनाही आपल्या हक्काची जाणीव असते.
आताआणखी समाधानाची बाब म्हणजे मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री झाल्यापासून लष्कराप्रति अनास्था मावळून सरकारी धोरणही सुधारलंय. कोणताही देश सर्वात जास्त खर्च करतो किंवा बजेट राखून ठेवतो ते त्याच्या लष्करासाठी ते का, कशासाठी हे भारताला नऊ वर्षांत तीनयुद्धं झेलल्यावर आणि त्यात अपरिमित झीज सोसल्यावर उशिरा का होईना उमगलं असावं.
पुढच्या भागात बाबांच्या निवृत्तीबद्द्ल..
(क्रमश:)
Monday, 4 July 2016
बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग ९)
या शेवटच्या दोन भागांमध्ये बाबांच्या निवृत्तीबद्द्ल.. आता ती किती सहज सुखासुखी आणि कितपत स्वेच्छेने मिळाली ते पाहू..
एकदा भरतपूर ते बिकानेर या प्रवासात बाबा सहकाऱ्यांसोबत होते. आर्टिलरी सामुग्री नेण्याचे रुटीन काम होते. डेस्टिनेशनला पोचल्यावर ८० किलोपर्यंतच्या गोळ्यांचे रेल्वे वॅगनच्या फळीवरून अनलोडिंग सुरु होते. असे प्रचंड मोठे हेवीवेट गोळे उतरवून घेताना सहकाऱ्याशी योग्य तो समन्वय असावा लागतो. बरेचसे गोळे उतरवून झाले होतेच. पण शेवटी शेवटी एक गोळा उतरवून घेताना त्यांचे आणि सहकारी सैनिकाचे काहीतरी कोओर्डीनेशन दुर्दैवाने चुकले. बांधकाम सुरु असलेल्या साईटवर आपण कित्येकदा पाहतो की ते मजूर एकमेकांकडे विटा, किंवा वाळूच्या, सिमेंटच्या पाट्या किती जबर कौशल्याने पास करत असतात. मग त्यांच्यात एक जरी चुकला तरी पूर्ण चेन बिघडते. पण सरावाने ते अगदी एकमेकांकडे न बघताही ते काम सहज तरी शिस्तबद्ध करत असतात. एवढच कशाला, घरी आपणही साधा चहाचा कप किंवा चिवड्याची बशी देतानाही असं होतं की समोरच्याने धरलंय असं वाटतं आणि म्हणून आपण तितक्यात सोडून देतो, पण त्याने ते धरलेलं नसतं आणि मग कप, बशी खाली पडून फुटते.
![]() |
तोफगोळ्यांचे लोडिंग अनलोडिंग (फोटो प्रातिनिधिक) |
आता इथे फरक एवढाच की इकडे बशी नाही तर एक प्रचंड हेवीवेट बॉम्ब होता. असंच झालं, समोरच्याने नीट पकडलाय असं समजून बाबांनी आणि त्यांच्या सहकारी सैनिकाने गोळा हातातून सोडला, पण त्या घेणाऱ्याने अजून तो नीट धरला नव्हता.. इकडे यांची ग्रीप तर ऑलमोस्ट सुटली होती, मग तितक्यात यांची पकड पूर्णच सुटली असती तर समोरच्या सहकारी सैनिकाला गंभीर इजा होण्याची शक्यता होती. म्हणून मग तो गोळा खाली पडण्याच्या आधीच बाबा एकटेच खाली हात धरून तो पकडायला गेले, पण त्यांच्या दुसऱ्या साथीदारानेही तो त्याचवेळी धरणे अपेक्षित होते, जे झाले नाही. परिणामी त्या गोळ्याखाली बाबांची बोटे चेंगरली गेली. आणि उजव्या हाताची तर्जनी जागच्या जागी मधल्या पेरातून तुटून लोंबकळायला लागली.
प्रचंड रक्तस्राव सुरु झाला, तातडीने त्यांना जवळच्याच आर्मी मेडिकल कॅम्पमध्ये नेण्यात आले. बाबा ते तुटलेले बोट तसेच दुसऱ्या हातात धरून सपोर्ट देत कसेबसे तिथे गेले. लगेचच किमान टाके तरी घालावे लागणारच होते. भूल देऊन पुरेशी गुंगी आल्यावर उपचार करायचे आणि ते बोट जोडायचे तर त्यात काही वेळ गेला असता. अशावेळी सैनिकांनाच विचारले जाते की ‘भूल न देताच उपचार करायचे का, त्रास खूप जास्त होईल पण पटकन काम होईल’. अफाट वेदना होत असल्याने बाबांनीही त्याला होकार दिला आणि मग भूल न देताच त्या बोटावर उपचार झाले. बाकी हात, पंजा आणि बोटांनाही काहीशी दुखापत झाली होती पण ती इतकी गंभीर नव्हती. तर्जनीचा तुटलेला तुकडा पुन्हा जागच्या जागी नीट जोडून बसवण्यात आला. ऑपरेशन तसं छोटंसंच होतं, पण महत्त्वाचं होतं, गरजेचं होतं. त्यावेळी त्या बोटात घातलेला तो छोटासा रॉड कायमस्वरूपी राहणार होता. तो काढला की पुढची दोन्ही पेरं पुन्हा तुटून पडली असती. अर्थात हा रॉड कायमचा त्या बोटातच असल्याने अजूनही बाबांचे त्या तर्जनीचे फक्त नखाजवळचे पेरच वाकते.. तेही अगदी जरासेच, आणि बोट मधल्या पेरातून मध्यभागी वाकू शकत नाही.
आली का लक्षात पंचाईत? हेच बोट रायफल चालवण्यासाठी असतं. आता बोटच वाकत नाही म्हटल्यावर ट्रिगर करणार कसे, इतक्या वर्षांची सवय अचानक तीही या वयात बदलणं अवघड असते, त्यामुळं फायरिंगसाठी दुसरं बोट किंवा डावा हात वापरणं मुश्कीलच होतं. ऑपरेशननंतर तिथल्या मेडिकल फॉरमॅलिटीज पार पाडल्यावर बाबांना तिकडून तातडीने दिल्लीला पाठवण्यात आलं.
आली का लक्षात पंचाईत? हेच बोट रायफल चालवण्यासाठी असतं. आता बोटच वाकत नाही म्हटल्यावर ट्रिगर करणार कसे, इतक्या वर्षांची सवय अचानक तीही या वयात बदलणं अवघड असते, त्यामुळं फायरिंगसाठी दुसरं बोट किंवा डावा हात वापरणं मुश्कीलच होतं. ऑपरेशननंतर तिथल्या मेडिकल फॉरमॅलिटीज पार पाडल्यावर बाबांना तिकडून तातडीने दिल्लीला पाठवण्यात आलं.
सुरुवातीची बेसिक पोस्टिंग्ज झाल्यावर १९६७ ते १९८० या काळात बाबा थर्टीसिक्स मीडियम या रेजिमेंटमध्ये तर त्यानंतर थर्टीफोर मीडियम या रेजिमेंटमध्ये होते. खरंतर ही सिरीयस इंज्युरी पाहूनही त्यांचे युनिट त्यांना सोडायला तयार नव्हते, कारण बाबांकडे एकदा एखादे काम सोपवले की ते होणारच हा त्यांचा तिथे लौकिक. पण आता रेजिमेंट बदलल्यावर तसंही आधीपासून या युनिटमध्ये असणारे काही सीनियर्स होतेच, ज्यांना प्रमोशनसाठी अर्थात आधी प्रेफरन्स मिळतो. त्यामुळं बाबांना आता इतक्यात तरी प्रमोशन ड्यू नव्हतं, त्यात ही इंज्युरी झालेली. नाहीतर आता दोन रॅंक्समध्ये प्रमोशन होऊन ‘लेफ्टनंट’ पद टप्प्यात होतं.
![]() |
तोफगोळे |
आता अशा परिस्थितीत किमान तसं मेडिकल सर्टिफिकेट तर मिळणं जरुरी होतं. कारण ते नसेल तर पुन्हा इतर सैनिकांसारखाच सराव लागला असता, ज्यात अर्थात फायरिंगही येतं. आणि तोफगोळ्यांचं लोडिंग अनलोडिंग तर असायचंच, शिवाय बाकीची अवजड शस्त्रे किंवा आर्टिलरीच्या एक्सेसरीज हाताळणे वगैरे भाग असतोच. या सगळ्यासाठी आता अजून भरून न आलेली भळभळणारी जखम होती, आणि अजून काही आठवडे तरी ती फार त्रास देणार होती, यामुळं किंबहुना ती कामं करणं शक्यच नव्हतं. पण मग आता पंचाईत अशी की मेडिकल सर्टिफिकेटही लगेच मिळत नव्हतं, कारण मेडिकल ऑफिसरने असं म्हणणं पुढं केलं की ‘तुम्ही तर सर्व्हेयर आहात, तुम्हाला कुठे रोज फायरिंग करायला जावं लागतं, कशाला पाहिजे मग सर्टिफिकेट?’. अर्थात हे म्हणण्यापुरतंच असतं आणि काम तर सगळंच पडतं.
मग त्या मेडिकल ऑफिसरला अचानक लक्षात आलं असावं की आपण ऑफिसर रँकवर आहोत आणि हा नायब सुभेदार रँकचा माणूस फक्त एक सर्टिफिकेट मागतोय. एक सही करणं किती अवघड आहे, पण ती फुकट का करायची. आणि हा माणूस सध्या आहे काय तर सर्व्हेयर.. मग त्यांना पुन्हा अचानक आठवलं असावं की सध्या आपण एक बंगला बांधतो आहोत त्यासाठी लेआउट, डिझाईन वगैरे सगळंच करायचं बाकी आहे.
झालं, मग त्यांनी बाबांना पुन्हा बोलावलं आणि सांगितलं की ‘माझं एक काम कराल तर तुमचं सर्टिफिकेट एप्रूव्ह करून देईन.’ कोणतं काम ते त्यांनी सांगितलं. मग काय, सर्व्हेयर हा बऱ्यापैकी आर्किटेक्ट असतोच की. झालं, त्यांच्या बंगल्याचं मार्किंग, संपूर्ण ड्राफ्टवर्क, सगळे मॅप्स, ब्ल्यू प्रिंट्स बाबांनी तयार करून दिल्या. आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी सही झालेलं सर्टिफिकेट बाबांच्या हातात पडलं. त्या ऑफिसरला आर्किटेक्ट नेमून त्याला द्यावी लागणारी मोठी फी वाचली आणि असं फुकटात पण उत्तम दर्जेदार काम झालं. यथावकाश बाबांच्या त्या डिझाईनबरहुकूम त्या ऑफिसरचा बंगला बांधून झाला.
झालं, मग त्यांनी बाबांना पुन्हा बोलावलं आणि सांगितलं की ‘माझं एक काम कराल तर तुमचं सर्टिफिकेट एप्रूव्ह करून देईन.’ कोणतं काम ते त्यांनी सांगितलं. मग काय, सर्व्हेयर हा बऱ्यापैकी आर्किटेक्ट असतोच की. झालं, त्यांच्या बंगल्याचं मार्किंग, संपूर्ण ड्राफ्टवर्क, सगळे मॅप्स, ब्ल्यू प्रिंट्स बाबांनी तयार करून दिल्या. आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी सही झालेलं सर्टिफिकेट बाबांच्या हातात पडलं. त्या ऑफिसरला आर्किटेक्ट नेमून त्याला द्यावी लागणारी मोठी फी वाचली आणि असं फुकटात पण उत्तम दर्जेदार काम झालं. यथावकाश बाबांच्या त्या डिझाईनबरहुकूम त्या ऑफिसरचा बंगला बांधून झाला.
सही घेऊन त्या सर्टिफिकेटसह बाबा इकडे युनिटमध्ये आले.. आणि झालं, आता इकडे युनिट खवळलं. आता युनिटने बाबांना रिलीज करायला नकार दिला, त्यासाठी त्यांना काही गूळ लावण्याचा प्रकारही झाला. आता हे काय? शेवटच्या भागात पाहू...
(क्रमशः)
Monday, 4 July 2016
बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग १०)
आर्मी मेडिकल ऑफिसरची सही घेऊन त्यांना ते लो मेडिकल कॅटेगरीसाठी एप्रूव्ह करणारे सर्टिफिकेट घेऊन बाबा इकडे युनिटमध्ये आले.. आणि झालं, आता इकडे युनिट खवळलं. आता युनिटने बाबांना रिलीज करायला नकार दिला, त्यासाठी त्यांना काही गूळ लावण्याचा प्रकारही झाला. आता हे काय?
“व्हाय आर यू मेडिकली डाउन?” वगैरे प्रश्नांची सिनियर्सकडून सरबत्ती सुरु झाली. खरंतर ‘इंडेक्स फिंगर सिव्हीयरली इंज्युर्ड, ही इज अनेबल टू फायर, नॉट इव्हन मेडिकली फिट फॉर अदर डेली कॉमन एक्सरसाईझेस अँड ड्यूटीज लाइक लोडिंग अँड अनलोडिंग.. हेन्स एप्रूव्हड एज मेडिकली डाउन अँड धस पुट इन लो मेडिकल कॅटेगरी’ हा ऑथेंटिक ऑफिशियल आर्मी मेडिकल रिपोर्ट वाचूनही ते असं विचारत होते. त्यांचं म्हणणं असं की उद्या गरज पडलीच तर तुम्ही फ्रंटवर जाऊ नका तोफा आणि रायफल्स घेऊन, हाताळू नका त्या गोष्टी. पण सर्व्हेयर म्हणून रहा, इथेच फक्त ऑफिसवर्क करा वगैरे.
पण आता १८ वर्षे सर्व्हिस झाल्यावर आणि शेवटी शेवटी रेजिमेंटही बदलली गेल्यावर तसंही प्रमोशन इतक्यात नव्हतं, फक्त ऑफिसवर्क ही ऑफर गूळ लावण्यापुरती असते हे आधीच्या काहीजणांच्या उदाहरणांवरून तिथे बाबांनी पाहिलं असावं. पण अगदी बेसिक पण महत्त्वाचं म्हणजे १९६५ आणि १९७१ या दोन मोठ्या युद्धांत आणि लेह, लदाख, सियाचीन, पूंछसारख्या अनेक ठिकाणी काही लहानमोठ्या चकमकीत सहभागी झाल्यावर आता फ्रंटवर न जाणं, तोफा नि रायफल्स पहिल्यासारख्या सक्षमतेने हाताळू न शकणं यासारखे अस्सल सैनिकाला दुसरे दु:ख नाही. मग तिथे त्या वातावरणात राहणं नको वाटतं, की डोळ्यांसमोर दिसतायत बाकीचे सगळे या सगळ्या ड्यूटीज करताना आणि आपण मात्र...
तुटक्या बोटाकडे बघत त्यांना हा कठोर निर्णय घेणं भागच होतं. शिवाय बाबांचं लग्न होऊनही आता चार वर्षे झाली होती. पहिली झालेली मुलगी जन्मानंतर अवघ्या चार दिवसांत गेल्यावर आता नुकतेच त्या चालू वर्षी १९८३ ला एका मुलाचे ते बाबाही झालेले होते (हा माझा मोठा भाऊ प्रवीण.. आमची जी ताई असली असती तिचा १९८१ साली जन्म झाला तोच चार दिवसांचं आयुष्य जगण्यासाठीच जणू, मग अशावेळी इकडे आईची मन:स्थिती काय असेल), त्यामुळं एकूणच हाही सगळा विचार करून घरच्या या जबाबदारीमुळे घरची ओढही आता पहिल्यापेक्षा जास्त होती.
शेवटी अठरा वर्षे सर्व्हिस करून मग १२७८५०१ या बॅज नंबरने निवृत्ती घेतली. पेन्शनसाठीचे ट्रेजरी ऑफिसर सर्टिफिकेट, डिस्चार्ज बुक, पीपीओ (परमनंट पेन्शन ऑर्डर) वगैरे सोपस्कार पार पडले. तेव्हा पेन्शन सुरु झाली ती साधारण २९१ रुपये. खरंतर लो मेडिकल कॅटेगरी असल्याने ती संबंधित मेडिकल सर्टिफिकेट्स सादर करून पेन्शन बेसिकच्या जास्तीत जास्त २०% पर्यंत अधिक मिळू शकते. अर्थात तुमच्या फिजिकल डिसएबिलिटीच्या तीव्रतेनुसारच. पण त्यासाठी तहहयात दर दोन वर्षांनी संबंधित ऑफिसात स्वत: हजर राहून दाखवणं की ‘बाबांनो रे, मी जिवंत आहे अजून आणि हे पहा माझे फिजिकल डिसएबिलिटीवाले बोट’... हा एकतर शुद्ध वेळखाऊ वैताग, कारण अशा ऑफिसेसमध्ये अगदी अंदाधुंद कारभार असतो, कामे वेळेवर होत नाहीत. (म्हणजे तेव्हा १९८३ची तरी ख्याती अशीच होती, आत्ता कुठे आपण जरा पेपरलेस वर्क वगैरे करायला शिकतोय, पण तेही फारच कमी.) कुठल्याही सरकारी ऑफिसची पहिली ओळख अजूनही दुर्दैवाने फायलींचा ढिगारा हीच आहे. आणि तरीही यांचे डॉक्युमेंटेशन नीट नसते, हवी असलेली डॉक्युमेंट्स वेळेवर मिळतील तर शपथ.
पुढे इकडे सांगलीत येऊन बाबांनी निर्लेप या किचन एक्सेसरीजच्या बिझनेसमध्ये स्वत:ला गुंतवून घेतले होते, मग ही धावपळ करणे शक्य नव्हते. म्हणून मग ‘ही सवलत आणि वाढीव पैसे मला नकोत’ हे सांगणारे हे ‘अनविलिंग सर्टिफिकेट’ सही करून सोल्जर बोर्डाला द्यावे लागते ते त्यांनी लिहून दिले, अन्यथा आज पेन्शनसोबत ते मिलिटरी मेडिकल बोर्डाचेही साधारण (सुधारित पेन्शनप्रमाणे) किमान दोन-तीन हजार तरी एक्स्ट्रा मिळत असते. अर्थात अजूनही ते कसलेसे एक सर्टिफिकेट घेऊन स्वत: सांगलीतल्या जिल्हा सैनिक बोर्डात जाऊन वर्षातून एकदा वगैरे हजेरी लावावी लागतेच की ‘मी अजून जिवंत आहे आणि माझी पेन्शन मी स्वत:च घेतो आहे.’ पण एक्स-सर्व्हिसमेनसाठी हे तसे कॉमनच आहे, अनेकांना माहीतही असेल.
***
***
घरातल्या बाबांच्या त्या दोन ट्रंक्स हा आम्हा दोघा भावंडांसाठी नेहमीच कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय राहिलाय. ट्रंकवर त्यांचे नाव, १२७८५०१ हा नंबर आणि ट्रंकमध्ये त्यांचे मिलिटरीचे ड्रेस, वेगवेगळ्या प्रकारचे बूट (अगदी शोलेमधल्या ठाकूरसारखे सोलला खाली खिळे असलेलेही), त्यांचा बॅज, कॅप, बेल्ट, आणि सर्वात कौतुकास्पद म्हणजे ती पाच मेडल्स. एक अमूल्य ठेवा!!
![]() |
बाबांची मेडल्स |
१९९५ साल.. एक गुरुवार.. दादाला हाक मारताना अचानक बाबांना घरीच पॅरॅलिसीसचा जोरदार अटॅक आला आणि ते कोसळलेच. पण मग त्यातूनही ते जिद्द आणि विलपॉवरच्या जोरावर बाहेर आले. हे डॉक्टरांचंच मत. आम्ही तेव्हा तसे लहानच होतो, पदर खोचून आईने प्रचंड प्रचंड धावपळ केली. त्यावेळी कदाचित बाबांच्या उजव्या पायाला उजव्या हाताचे अप्रूप वाटत होते, की ‘ह्याचे हे एक बोट वाकत का नाही, स्पेशल दिसतंय हे बोट’, आपण असे का नाही असं त्याला वाटत असावं.. सांगण्याचा मुद्दा.. जोराचा अटॅक आणि अलीकडेच सुरु झालेले डायबेटीस यामुळे तेव्हा संपूर्ण पायालाच धोका होता. एरवीही डायबेटीस पेशंट्सना पाय फार जपावा लागतो, आणि अशावेळी तर जास्तच.. नाहीतर गँगरीन होऊन अख्खा पायच कापून काढावा लागतो. उशीर केला असता तर तीच वेळ येऊ शकेल असं डॉक्टरांचं म्हणणं पडलं, म्हणून मग ते टाळण्यासाठी त्यांची उजव्या पायाची करंगळी तेव्हा कापण्यात आली. पायावर किंचितसे काळसर डाग मात्र राहिले. पण त्यावेळी तो निर्णय योग्यच होता. तेव्हा ‘बोटावर निभावणं’ म्हणजे अक्षरश: काय असतं हे आम्ही पाहिलं आणि बाबांनी अनुभवलं.
त्यांच्या त्या मोठ्या आजारात पैसा पाण्यासारखा खर्च झाला. पैसा उभा करण्यात कष्टाने उभा केलेला स्वत:चा बिझनेस, म्हणजे निर्लेप, मिल्टन, सहेली, टेबलटॉप, अशोक स्टोव्ह इत्यादी किचन एक्सेसरीजच्या अनेक एजन्सीज हातात असलेली प्रवीण इंडस्ट्रीज ही फॉर्मातली कंपनी आणि घर, गाडी वगैरे सगळंच पणाला लागलं होतं, ते सगळंच गेलं. नंतरही म्हणजे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळून घरी आल्यावरही पायात ताकद येण्यासाठी त्यांना कबुतराच्या रक्ताचं मालिश करायला एकजण येत होता. लवकर रिकव्हरी होण्यासाठी हा उपाय बरेचदा डॉक्टरांकडून सुचवला जातो.
तशा अडचणी बऱ्याच होत्या, पण आमचं शिक्षण पूर्ण करणं हेच आईबाबांचं पहिलं ध्येय होतं. वाट्टेल ते कष्ट करून आईबाबांनी आम्हाला शिकवलं, मोठं केलं. दादा (मोठा भाऊ प्रवीण) आता तसा सेटल्ड आहे, मी अजूनही धडपडतोय. पण जसा कोणत्याही मुलांना वाटतो तसाच आम्हांलाही आईबाबांचा अर्थात या सगळ्यासाठी प्रचंड अभिमान वाटतो.
तशा अडचणी बऱ्याच होत्या, पण आमचं शिक्षण पूर्ण करणं हेच आईबाबांचं पहिलं ध्येय होतं. वाट्टेल ते कष्ट करून आईबाबांनी आम्हाला शिकवलं, मोठं केलं. दादा (मोठा भाऊ प्रवीण) आता तसा सेटल्ड आहे, मी अजूनही धडपडतोय. पण जसा कोणत्याही मुलांना वाटतो तसाच आम्हांलाही आईबाबांचा अर्थात या सगळ्यासाठी प्रचंड अभिमान वाटतो.
तुम्ही कुणीही असा, काहीही असा, कुठेही असा, पण आईबाबांना कधी चुकूुनही दुखवावंसं वाटलंच तर त्याआधी प्लीज स्वत: आत्महत्या करा.
***
बाकी काय सांगू, एवढे भाग होतील असं खरंच वाटलं नव्हतं. लष्करी जीवन हा तसा रुक्ष विषय, पण एका अनाम अंत:प्रेरणेने लिहित गेलो. पण कदाचित भवताली घडणाऱ्या काही गोष्टीही म्हणजे सियाचीन ग्लेशियरमध्ये वाचलेल्या हनुमंतअप्पा यांचं नंतर झालेलं निधन, त्याचवेळी मीडियाने हाइप केलेल्या जेएनयूसारख्या काही देशविघातक गोष्टी, एकीकडे दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेला होणारी गर्दी तर दुसरीकडे हुतात्मा संतोष महाडिक यांच्या पत्नीनेही सैन्यात जाण्याची दाखवलेली जिगर किंवा इस्रोच्या इकॉनॉमिकल मोहिमेत स्वयं हा आपला उपग्रह सोडूनही मीडियाकडून दुर्लक्षित राहिलेले पुणे सीओइपी कॉलेजचे हुशार इंजीनियर्स (कारण त्यांनी देशविरोधी काही केलं नाही ना हिरो व्हायला) अशा अनेक गोष्टी आजूबाजूला घडत होत्या. काही अस्वस्थ करत होत्या, काही बळ देत होत्या. यातूनही सैनिकांचं किंचितसं का होईना पण जगणं समोर आणावंसं वाटलं असेल मला. मग मी लिहित गेलो, तुम्हीही उत्सुकतेने वाचत गेलात.. छान वाटलं.
***
बाकी काय सांगू, एवढे भाग होतील असं खरंच वाटलं नव्हतं. लष्करी जीवन हा तसा रुक्ष विषय, पण एका अनाम अंत:प्रेरणेने लिहित गेलो. पण कदाचित भवताली घडणाऱ्या काही गोष्टीही म्हणजे सियाचीन ग्लेशियरमध्ये वाचलेल्या हनुमंतअप्पा यांचं नंतर झालेलं निधन, त्याचवेळी मीडियाने हाइप केलेल्या जेएनयूसारख्या काही देशविघातक गोष्टी, एकीकडे दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेला होणारी गर्दी तर दुसरीकडे हुतात्मा संतोष महाडिक यांच्या पत्नीनेही सैन्यात जाण्याची दाखवलेली जिगर किंवा इस्रोच्या इकॉनॉमिकल मोहिमेत स्वयं हा आपला उपग्रह सोडूनही मीडियाकडून दुर्लक्षित राहिलेले पुणे सीओइपी कॉलेजचे हुशार इंजीनियर्स (कारण त्यांनी देशविरोधी काही केलं नाही ना हिरो व्हायला) अशा अनेक गोष्टी आजूबाजूला घडत होत्या. काही अस्वस्थ करत होत्या, काही बळ देत होत्या. यातूनही सैनिकांचं किंचितसं का होईना पण जगणं समोर आणावंसं वाटलं असेल मला. मग मी लिहित गेलो, तुम्हीही उत्सुकतेने वाचत गेलात.. छान वाटलं.
लेखमाला लिहायची असं खरंतर ठरवलं नव्हतं एक दोन पोस्ट्समध्ये थोडक्यात सांगणार होतो, पण पहिला भाग शंभरावर लोकांनी वाचून मग अनेकांनी सविस्तर लिहिण्यास सुचवलं. नंतर बाबांकडून नीट माहिती घेऊनच वेळ घेऊन लिहिलं. माझा लेखमालेचा असा हा पहिलाच प्रयत्न.. सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार. आपला भारत देश भारीच आहे, चला सगळे मिळून देशासाठी आणखी काहीतरी चांगलं करूया, देश पुढे नेऊया.
भारतीय सेनेच्या प्रत्येक सैनिकाला मनापासून सॅल्यूट!
भारतमाता की जय!! जय हिंद !!!
(लेखमाला समाप्त.. धन्यवाद)
No comments:
Post a Comment