Friday, 26 August 2016

(प)रागदारी 3

आता माझी सटकली 

राग: कायच्या काय राग

आपल्या भोवताली बऱ्याच गोष्टी घडत असतात, त्यातल्या अनेक आपल्या मनाविरुद्ध किंवा न पटणाऱ्या असतात. आपल्याला त्यांचा राग किंवा फारतर म्हणू, सात्त्विक संताप येत असतो, मनस्वी चीड येत असते. हे सर्व आत्ता आठवण्याचे कारण म्हणजे आज आपण ज्या रागातील गाणे पाहणार आहोत त्याच्या नावातच राग आहे. होय, त्याचे नाव 'कायच्या काय राग' असे आहे. आज आपण पाहूया 'सिंघम रिटर्न्स'  या सिनेमातील 'आता माझी सटकली' हे गाणे. आता माझी सटकली हा खरंतर पहिल्यांदा आलेल्या सिंघम या सिनेमातला एक फेमस डायलॉग आहे, त्यापासून प्रेरणा घेऊन त्याचेच या सर्जनशील मंडळीनी सिक्वेल सिनेमासाठी गाणे तयार केले.

हे गीत म्हणजे एक प्रकारे सबकुछ हनी सिंग, सॉरी यो यो हनी सिंग आहे. (हे यो यो महत्त्वाचे बाबा.) कारण या गीताचे शब्द, आवाज आणि संगीत अशा सर्वच गोष्टींचे उगमस्थान त्यांच्याच ठायी आहे. गाताना त्यांना साथ दिली आहे ममता शर्मा आणि नीतू चौधरी यांनी. तर त्यातील मराठी भाग लिहिला आहे सचिन पाठक यांनी. सिंघम ही व्यक्तिरेखा मराठी असल्याने मराठी येणे अपरिहार्यच नाही का? अरे कोण म्हणतो मराठी भाषा मागे पडतेय? या चराचर सृष्टीत कोणत्याही मानवास संघर्ष चुकलेला नाही, तो तर अटळच आहे. तो करण्यासाठी त्याच्या अंगी इनफ बळ यावे यासाठी या गाण्याची सुरुवातच प्रेरणा देते. कशी ते पहा --

फाईट फाईट फाईट लाइक ब्रूस ली
मेरा सोला का डोला, छियालीस की छाती
सीधी बात बोलू, बाते घुमानी नही आती
आता माझी सटकली

आधी फाईट फाईट फाईट लाइक ब्रूस ली असे सतत म्हणून संघर्षासाठी नेहमी तयार राहा असे म्हटल आहे. समस्या कधीही उभी ठाकू शकते, तिचा सामना करण्यासाठी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या उक्तीनुसार डोके वापरावे लागते, तर कधी मसल पॉवरची गरज असते. अशावेळी ब्रूस लीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बेडरपणे संकटाशी दोन हात करा, असा प्रोत्साहनपर संदेश सुरुवातीलाच देण्यात आला आहे. बुद्धिबळाची नुसती आवड असून उपयोग नाही. वेळप्रसंगी बुद्धी आणि बळ वापरताही आले पाहिजे. समयसूचकता नि प्रसंगावधान महत्त्वाचे. 

यानंतर सिंघम कसा बलवान आहे हे सांगणे ओघाने आलेच. म्हणून सिंघम भाऊ आवेशाने म्हणतात  की माझ्या दंडातल्या बेटकुळ्या पहिल्यात का राव, अरे एकेक बेटकुळी सोळाची आहे, आणि माझी छाती तर ४६ इंच फुलते. फुलते रे छाती माझी फुलते रे असे म्हणत ह्याचे क्षण फुलत असतील का? पोलीस भरती असते तेव्हा बाहेर केळीवाले हमखास दिसतात अन त्यांचा बिझनेसही तुफ्फान होतो त्या दिवशी. छाती इन्स्टन्टली फुलवण्यासाठी ती केळी देवासारखी धावून येतात ना म्हणून. परंतु या ताकदवान सिंघमला मात्र त्यांही गरज नाही, त्याची इनबिल्ट छातीच भव्यदिव्य अवाढव्य अजस्र वगैरे आहे. ‘मी उगाच गोल गोल भूलभुलैय्या टाइप बोलत नाही, नव्हे ते मला जमतच नाही आणि त्याचा मला सार्थ अभिमानही आहे. मनात जे काय असेल ते थेट स्पष्ट बोलतो - तोंडावर. उगाच ओठात एक पोटात एक असली कपटी स्कीम नाही आपल्याकडे. पण माझी एकदा सटकली की कुणाचे काही खरे नाही’, असेही तो पुढे स्पष्टपणे स्पष्ट करतो.

जिगरा है टायगर, दिमाग से हायपर
आता माझी सटकली
तो गोली मारे जैसे स्नायपर  
आता माझी सटकली

सदर सिंघमला वाघासारखे मजबूत काळीज लाभले आहे. पण तो डोक्याने मात्र भडक आहे. त्याला राग आला तर तो स्नायपर शॉटप्रमाणे अचूक नेम धरून एखाद्याला गोळी मारू शकतो. चित्रपटात तो डॉक्टर नसून पोलिस अधिकारी दाखवला असल्याने ही गोळी म्हणजे बंदूकवाली गोळी असावी, औषधवाली खचितच नव्हे. 

गोली मारे जैसे स्नायपर... येस
मेरा बलमा है टायगर... ट्रू
अरे व्हेरी व्हेरी हायपर
आता माझी सटकली
मला राग येतोय
 
चित्रपटात पोलिस आणि त्याचा संघर्ष दाखवला असला तरी हिंदी सिनेमाच्या परंपरेला अनुसरून नायकाला नायिका ही हवीच. तर त्याच्या नायिकेला त्याच्या ह्या गोष्टीचेही कोण कौतुक. तू वेगवान आणि अचूक लक्ष्यभेद करू शकतोस, सही. भारीच रे. कसला सॉलिड आहेस तू भावा, आपलं राया किंवा यारा. मग खुश होऊन ती म्हणते, माझा सजणा कुणी लेचापेचा नाही तर साक्षात वाघ आहे वाघ. तोही सकारात्मक दृष्टीकोन असणारा आणि नेहमी आशावादी विचार करणारा असल्याने ह्यास होकार देतो. (चांगला जतन केला पाहिजे मग त्याला, आधीच कमी होत चाललेत वाघ देशातले..) पण तो गरम खोपडीचा आहे हे मात्र तिलाही मान्य आहे आणि त्यास तिची काही हरकतही  नाही. उलट त्याचेही कौतुकच वाटते तिला. (न वाटून सांगते कुणाला, गाण्यात राहायचंय ना.) 

या गीताचे पिक्चरायझेशन तुम्ही पाहिलेय का? नाही.. अरे मग काय पाहिले आयुष्यात? जरूर पहा, अन्यथा एका मोठ्या आनंदाला मुकाल. ते तर इतके बहारदार आहे की त्यात नायक नायिका अन इतर नृत्य कलाकारांसोबतच एक लहान मुलगा आहे. किंबहुना अशी बरीच लहान मुले आहेत - तीही पोलीस वेषातली. त्यातील एकजण विशेष लक्ष वेधून घेतो जो सारखा 'मला राग येतोय' असे बेंबीच्या देठापासून ओरडत असतो. आयुष्यात जरा कुठे वेळ मिळाला की सिंघमची सतत सटकत असणे आणि या मुलाला राग येत असणे यातून हा चिमुरडाच ज्युनियर सिंघम असल्याचे दिग्दर्शकाला सूचित करावयाचे असेल काय? सिंघमसारखाच बनियन तोही घालतो (अर्थात लहान मापाचा, उगाच त्यात मापं नका काढू आता त्याची). पण  खरंच, कोण जाणे ‘सिंघम अकराव्यांदा रिटर्न्स’ या सिनेमात हा मुलगाच हिरो अर्थात दस्तुरखुद्द सिंघम असेल. या सिनेमावाल्यांचे डोके आणि त्यात अनलिमिटेड प्रमाणात भरलेल्या क्रिएटिव्हिटीला मर्यादा नसतातच!      




माझा मर्दानी राया रे
याची वाघाची काया रे
भीत नाही कोणाला रे
अस्सा मराठी छावा रे
आता माझी सटकली 

ती नायिका तर बघा की खम्प्लीट येडीपिशीच झाली आहे त्याच्यासाठी, नाहीतर काय फुल हरकलीच हाये बाई जणू. म्हणते कशी की माझा राया अस्सल मर्द आहे. त्याच्या मर्दानगीचा नाद नाय करायचा. थोडक्यात तो चहाला कधी नाही म्हणत नाही असे गीतकाराला यातून सुचवायचे असेल. कारण सुवासिनींनी कुकवाला अन मर्दानी च्याला नगं म्हणू नये असे मगदूम चहावाल्यांनी पूर्वीच जगाला (दररोज रेडीओवरून सकाळी ९ वाजता) सांगून ठेवले आहे. ती पुढे म्हणते, माझा निडर सिंघम कुणालाही भीत नाही आणि त्याची काया अगदी वाघासारखी आहे. (जपून ठेव बाई मग, वाघाच्या कातडीला इंटरनेशनल मार्केटात खूप मोठी किंमत मिळते, तेव्हा तुझ्या या सिंघमची आणि त्याच्या त्वचेचीही विशेष काळजी घे.) 

अंग्री यंग मॅन
मी आहे माझ्याशी लफडा...नाय नाय
तोडून टाकेन हातपाय
व्हेन आता माझी सटकली
बोलो मुझे बाय बाय

स्वत:चे पुरेसे कौतुक (?) नायिकेकडून झाल्यानंतर यापुढे सिंघम स्वत:बद्दल थोडी माहिती स्वत:हून देऊ लागतो. तो  आगरी यंग man आहे.. आपलं अंग्री यंग man आहे. असा तामसी स्वभावाचा (नॉनव्हेज खात असेल फार, दुसरं काय) म्यान कधीच आपली शस्त्रे म्यान करत नाही, उलट संकट आले रे आले की तोच त्याच्यावर धावून जातो आणि त्याची वाट लावतो. म्हणून मी असा रागीट मनुष्य असल्याने  माझ्याशी पंगा घेऊ नका असे तो इतरांच्याच भल्यासाठी सुचवतो. ‘गप सरळ वागायचं आपल्याशी, नाहीतर डोक्यात टण्णुच बग’, अशी साधारणपणे प्रेमळ धमकीच तो देतो असे म्हणायला हरकत नाही.  माझं एकदा का टाळकं फिरलं की कोण आडवा येईल त्याचे हात पायच तोडून टाकेन असेही तो पुढे म्हणतो. शब्दाने शब्द वाढतो म्हणून शक्यतो मारामारी करुनच प्रकरण मिटवावे या वृत्तीचा तो असावा. स्वत:ला माझ्यापासून वाचवायचं असेल तर चालते व्हा आणि माझा निरोप घेत मला बाय म्हणा असे तो इतरांच्याच सेफ्टीसाठी सुचवतो. वा वा, दुसऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी असावी ती अशी.  त्याच्या इंटर्नल सिस्टीमच्या बेसिकमध्येच जहाल विचारसरणी कुठून कुठून गोळा करून कुटून कुटून भरलेली असल्याने हे सर्व त्याच्या स्वभावाला अगदी धरूनच आणि साजेसेच, किंबहुना त्याची शोभा आणखी वाढवणारे नव्हे काय?

आता माझी सटकली
मला राग येतोय

यानंतर आता माझी सटकली, मला राग येतोय हे सिंघम आणि तो (अजिबातच डोक्यात न जाणारा) लहान मुलगा मग (कंटाळा येऊपर्यंत) वारंवार म्हणत राहतात. कुणाचा जप आधी होतो अशी स्पर्धाच लागली असावी दोघांच्यात असे वाटते. शेवटी शेवटी मला राग येतोय असं अखंड म्हणताना शीण येऊन, मानसिक थकवा येऊन तो मुलगाच जरा लो महसूस करत असावा, सतत तेच तेच म्हणून त्याची एनर्जी कमी होत गेली असावी आणि म्हणून (पहा 'म्हणून' शब्दावर कसा नकळत श्लेष अलंकार साधला गेला ते..) त्याचा आवाज क्षीण होत जातो, संथ होत जातो.. पण विरत मात्र नाही. असा हा लढवय्या ज्युनियर सिंघम नुसत्या एका गाण्यातून तयार करण्याचे श्रेयदेखील सिंघमरावांनाच दिले पाहिजे. नाही का?

पुन्हा अभ्यासू असेच एखादे गीत. तोपर्यंत शांत स्वभाव, समजूतदारपणा, संयम, सदसद्विवेकबुद्धी वगैरे फडतूस निरुपयोगी दुर्गुण तुमच्या अंगी असतीलच तर त्यांचा रागाने त्याग करा. आय टेल यू, त्याग करायला खूप धैर्य लागते. द्या त्यांना सोडचिठ्ठी. हे दुर्गुण ठायी बाळगल्याने तुम्ही जणू जगण्यासच नालायक ठरता गड्या हो. सिंघमभाऊंचा (आणि त्या पोराचाही) आदर्श डोळ्यांसमोर ठेवा आणि त्यांना म्हणा - 'आता माझी सटकली, मला राग येतोय...'

Thursday, 25 August 2016

(प)रागदारी 2 

चार बाटल्या व्होडका

(राग: मद्यच माझे गद्य नि पद्य)

आज (प)रागदारी या सदरात आपण अभ्यासणार आहोत एक अतिशय गाजलेले गाणे तेही एका अशा महाशयांचे जे  आजकाल खूपच लोकप्रियआहेत, प्रसिद्धीच्या लाटेवर असे काही स्वार झाले आहेत की बड्या बड्या कलाकारांना, निर्मात्या दिग्दर्शकांनाही ह्यांचे एकतरी गीत आपल्या चित्रपटात असावेच असे मनापासूनवाटते. भले चित्रपटास काही कथा असो नसो (तिच्याशी कोणत्या गाढवास देणे घेणे असते नाहीतरी), पणह्यांचे एक गाणे असलेच पाहिजे अशा धारणेतून ह्यांना कामहीबरेच मिळते आहे.

मध्यंतरी व्हॉटसअपवर यांच्या थोरल्या भावाचे नाव काय तर ज्येष्ठमध असा एक विनोदही वेगाने फिरत होता. तुमच्यासारख्या चाणाक्ष सुज्ञ सुजाण संगीतप्रेमी रसिकांना एव्हाना समजलेचअसेल की आम्ही कोणाबाबत बोलत आहोत ते... होय होय होय, कलियुगीन संगीतातील एक अद्भुत चमत्कार, एक अलौकिक प्रतिभा,आजच्या तरुण पिढीचे श्रद्धास्थान आणि प्रखर प्रेरणा, असंख्य डिस्कोथेक, क्लब्ज, पब्ज आणि बार संचालकांचे पोशिंदे,वन अंड ओन्ली स्वयंभू rapmaster, अर्थात यो यो हनी सिंग. (काही गुरूंच्या नावाआधी जसे श्री श्री असते, तसे हे यो यो असावे असा आमचा कयास आहे.) आणि त्यांचा आवाज व संगीत लाभून पावन झालेले हे गाणे आहे रागिणी एमएमएस द्वितीय या चित्रपटातले. गाण्यातील गद्य व पद्य दोन्हीही मद्यावर आधारित असल्याने 'मद्यच माझे गद्य नि पद्य' या रागात गुंफलेल्या या 'चार बोतल व्होडका' गाण्याचे शब्द लिहिले आहेत उस्ताद भगदार अली खान साहब यांनी.    



चार बोतल व्होडका
काम मेरा रोज का
ना मुझको कोई रोके
ना किसीने रोका

वा वा वा, हनीजी आपल्या नावाप्रमाणेच मधाळ असलेल्या आवाजात गातात की चार बाटल्या व्होडका प्राशन करणे हेच माझे रोजचे काम,  हेच माझे जीवितकार्य आणि हे साध्य रोजच्या रोज साध्य करण्यापासून मला कुणीही रोखू शकत नाही. नव्हे, हे पवित्र कार्य उम्रभर करण्यासाठी मी स्वत:ला वाहून घेतलेले असताना आजवरच्या वाटचालीत मला कोणी रोखलेलेही नाही. कुणाची एवढी बिशाद?


मैं रहुं सारी रात इन द बार
दारू पिऊ लगातार
एक आधी सब पी लेते है
मैं तो पिऊ बोतल चार
आय वाना हंगओव्हर टूनाईट

यापुढे हनीसिंग यांच्यामधील विलक्षण सर्जनशील असा अफलातून rapmaster जागृत होतो आणि आवेशाने पण तितक्याच संयतपणे गाऊ लागतो की अरे मी अख्खी रात्र बारमध्ये राहीन आणि एकापाठोपाठ एक मद्याचे प्याले रिचवेन. अर्धी किंवा एखादी बाटली तर कुणीही पीत असेल, परंतु मी मात्र एक नव्हे, दोन नव्हे तर पूर्ण चार बाटल्या सहज संपवतो. कारण मला रात्री असाच कैफ हवा आहे.

समजा पिणारा स्वत: रोज डायरी लिहित असेल तर रोज काही वेगळे लिहावे लागणार नाही. एक जानेवारीला जे लिहिले तेच पुढे वर्षभर होणार असल्याने पुढील सर्व पानांवर केवळ सेम एज एक जानेवारी असे लिहिले तरी काम भागू शकते. किवा पहिल्याच पानावर 'हेच नि असेच पुढे' असे नमूद करून पुढील सर्व पाने एखाद्या गरजू गरीब विद्यार्थ्याला अभ्यासासाठी देताही येतील असा विचारही यामागे असू शकतो. सहीच ना! आम्हाला तर वाटते की स्वत:च्या प्रकृतीची, लिव्हरची तिळमात्र काळजी न बाळगता रोज चार बाटल्या घशात घालण्याचे जीवनविषयक तत्त्वदेखील याच वैचारिक मंथनातून आले असावे. जेणेकरून भंगारवाल्याला दर महिन्याला तब्बल १२० बाटल्या देऊन त्याला बरे आर्थिक दिवस तरी आणता येतील. तुम्हीच सांगा आजकाल कोण करतो दुसऱ्याचा इतका विचार?  

सारी रात दारू, सुबह निंबूपानी
पार्टी करनेवालो की है याही कहानी
पेट भरके जितनी भी पीलो
किसी की बंदी को भी हेल्लो
हेल्लो बेबी हाऊ डू यु डू?
एक मिनट तो खद जा तू
पता नि मुझे ये समझ नि आता
मेरे साथ कभी कोई क्लब नही आता
अपने पल्ले से कोई नि पिलाता
मैं पी लू ज्यादा फिर कोई मुंह नही लगाता  
क्यू की, क्यू की, क्यू की, क्यू की   

नंतर ह्या संगीतरत्नाने एक वैश्विक सत्य अगदीच अलगदपणे आणि सहजतेने कथन केले आहे. तो म्हणतो की रात्रभर मनसोक्त मनमुराद मद्यपान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे (दुपारी १२ च्या सुमारास) उठून निर्मळ मनाने लिंबूपाणी घेणे हीच पार्टी करणाऱ्यांची आज कहाणी आहे. हीच त्यांची कथा आणि व्यथा बनली आहे. पोटभर प्या, कितीही प्या आणि मग कुणाच्याही प्रेयसीला वा पत्नीला मनोभावे नमस्कार करा, आपणच तिचा प्रियकर वा नवरा आहोत असे समजून त्याच्याच प्रेमाने आणि नशेतून आपसूक निर्माण होणाऱ्या जवळीकीतून हाय हेलो म्हणा. आपण कशा आहात अशी आपुलकीने चौकशी करा. आपल्यासोबत क्लबसारख्या मानवनिर्मित शांत, प्रसन्न, रम्य ठिकाणी कधीच कुणी येत का नाही या विचाराने आपण कधी त्रस्त होऊ शकतो. त्यामागील कारणे कितीही विश्लेषण करून कधीकधी आपल्या लक्षा येत नाहीत. पण मग अशा लादल्या गेलेल्या सक्तीच्या एकटेपणातून उद्भवणारे दु:ख विसरण्यासाठीही जर कुणी आपल्या पैशाने पाजत नसेल, तर आपणच आपली आपली प्यावी, मग कुणाची बिशाद आपल्या नादी लागण्याची किंवा त्या बाटलीला तोंड लावण्याची. दुसरे समजून घेत नसताना किंवा मदत करत नसताना स्वत:ची वाट स्वत: चोखाळावी, आपला स्वाभिमान मजबूत ठेवावा, आत्मसन्मानाशी हरगीज तडजोड करू नये अशी महान शिकवण कविवर्य यातून आपणांस ऑफर करतात. आणि ह्याचेही कारण म्हणजे रोजच्या चार बाटल्या व्होडका हेच होय असेही पुढे आत्मविश्वासाने नमूद करून ठेवतात.       

सूजी सूजी आंखे मेरी ये फिर भी देखो
लडकियो को कैसे ये निहारे निहारे
अगले दिन उठू मैं हंगओव्हर में फिर भी देखो
लिव्हर मेरा व्होडका पुकारे
क्यूंकी चार बोतल व्होडका...  

कोणत्याही परिस्थितीत आपल्या ध्येयापासून आपली (तारवटलेली लालसर) नजर हटता कामा नये असे गीतात पुढे म्हटले आहे. म्हणजेच काय तर अति मद्य प्राशन झाल्याने डोळे जरी सुजले, लाल झाले, डोळ्यांची कितीही आग आग होत असली तरीही मुलींवर लाइन मारण्याच्या लाइफ़टाइम कर्तव्यातून तिने माघार घेता कामा नये. सौदर्याची उपासना करावीच, ती केलीच पाहिजे म्हणजे पाहिजेच कारण ते ताज्या तरुण टवटवीत प्रफुल्लीत सदाबहार वगैरे वगैरे मनाचे लक्षण आहे.  यातून कवी आपल्या मनावर प्रकृतीपेक्षा वा होऊ शकणाऱ्या संभाव्य धुलाईपेक्षाही कर्तव्यभावना आणि स्वत:ला घालून घेतलेले नियम नि शिस्त यांना वरचे स्थान देतो आणि या गुणांपासून ढळू नये असे सुचवतो. इतके सुरापान केल्यावर दिसणारी प्रत्येक मुलगी नखशिखान्त न्याहाळली नाही तर हाय कम्बख्त, तुझे कुछ चढीच नाही की मर्दा, असा गर्भितार्थसुद्धा यात असू शकतो.

इतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी उठल्यावर (अर्थात १२ वाजता, त्या बेअक्कल सूर्याला कधी उगवावे हे समजत नसेल तर त्याला आपण काय करणार, लेकाचा सहासात तास आधीच येऊन बसतो. तोंडावर आला उजेड, कर दुर्लक्ष) आधीच्या रात्रीचा कैफ तसाच असल्यामुळे आणि हंगओव्हर कायम असल्याने यकृतोबा व्होडका व्होडका असे आर्तपणे पुकारत असतो, तेव्हा त्याकडे मात्र दुर्लक्ष करू नये आणि पुन्हा त्याला खतपाणी घालावे. असे केल्यानेच 'काम मेरा रोज का' ह्या उक्तीचा खरा अर्थ आपल्याला उमगू शकेल अशी शिकवण कवीने दिली आहे. थोडक्यात पिण्यातले समर्थ हनीमहाराज काय म्हणतात - प्यायल्याने होत आहे रे, आधी प्यायलेचि पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजेच, तेही व्होडका पेयाच्या चार बाटल्या.  शेवटी तो पुन्हा पुन्हा चार बाटल्या व्होडका अशा किंकाळ्या मारतो.

त्याने फोडलेला हा हंबरडा पाहून कुणाचेही हृदय आणि यकृतोबा पिळवटून निघेलच.  तसे एखाद्याच्या बाबतीत न झाल्यास त्या पामराला 'हाय तूने पीही नही तो क्या समझोगे' असे म्हणून त्याला कस्पटासमान लेखावे, पूर्णत: दुर्लक्ष करावे. पण व्होडकादेवतेचा अपमान सहन करू नये हीच भावना हा कस्पटासमान गायक, (ओह सॉरी सॉरी, हे काय बरे अनवधानाने लिहिले गेले मजकडून.. हन्त हन्त) तर हा असामान्य गायक आपल्या हृदयस्पर्शी आवाजातून व्यक्त करतो  हे स्पष्ट जाणवते. 

किती उदात्त विचार! मराठीत हे महाशय गाणी कंपोझ करत नाहीत. अरेरे, मराठी भाषेचे आणि रसिकांचे हे केवढे नुकसान. तरी समजा, पुढेमागे जर या गानपानसम्राटास मराठीत rap करायचे झालेच तर ते करताना त्यांनी आमच्या या पुढील रचनेचा जरूर विचार करावा. कदाचित त्यांच्याइतके भारी दर्जेदार जमले नसेल, पण न पिताही तोडकेमोडके सुचले हे काय कमी आहे...

प्या बिंदास अन व्हा मदहोश
व्हा बेहोष नि करा जल्लोष,
भीती नाही कुणाच्या बापाची
आम्ही पितो आमच्या पैशाची,
फिरूदे बार आणि तोलही जाऊदे
अवघा रंग एकचि होऊदे,
स्कॉच असो व्हिस्की, रम असो शाम्पन
मित्रांनो माझ्या तुमच्यासाठी कायपण, 
ढोसा खुश्शाल रे सोडा लाज
सगळ्या रोगांवर रामबाण इलाज,
रिचवा दारू उधळूदे वारू
अरे विसरा पारू, या एकेक पेग मारू,
कारण चार बाटल्या व्होडका हेचि काम माझं रोजचं..
.
छे, नाही हो, नाहीच. ती नशिली मजा आणि तो यथेच्छ माज यात दुरान्वयेही  नाही. खूपच थिटे पडतो आपण ह्यांच्या काव्यप्रतिभेसमोर हे मोठ्या मनाने (म्हणजे थर्टी नव्हे, तर नाइनटीच्या मापाने) मान्य केलेच पाहिजे. 'कुछ जम्या नही गड्या' हा तुमचा प्रांजळ नि रोखठोक अभिप्रायही पोचला आणि तुम्ही मुरडलेली नाकेही दिसली. असो, रोज साबण घासघासून अंघोळ केली म्हणून कावळा राजहंस थोडाच होतो. असो, तर हे होते आजचे अप्रतिम एकमेवाद्वितीय गीत. पुन्हा पाहू असेच आणखी एखादे  गीत. तोपर्यंत ‘चार बाटल्या व्होडका, हेचि काम माझं रोजचं...’

ता. क.:  मध्यंतरी टीव्हीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात ख्यातनाम शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आले होते. तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की सध्याच्या या हनी सिंग इरा आणि या अशा चार बोतल गाण्यांविषयी तुमचे मत काय, तर ते प्रांजळपणे वदले की ‘काय वाटायचं त्यात, असेल ते त्याचे रोजचे काम’... वा वा, पहा सिंगसाब द ग्रेट यांची दिनचर्या किती लोकप्रिय आहे. अक्चुअली याचा (त्यांच्या गाण्यांचा सिनेमाच्या कथेशी चुकूनही नसतो तसाच) इथे काहीही संबंध नाही, पण सहज आठवले म्हणून सांगितले.

अर्थात समजा अशी चार बोतल गाणी चार दिवस टिकणारीच असतात असे जर कुणी म्हणाले तर मात्र तो कितीही खरे बोलत असला तरी आजची तरुणाई त्याचे ऐकून घेणार नाही हे मात्र त्याहून खरे.

(प)रागदारी 1

बेशरमी की हाईट

(राग: स्वैराचार हाच शिष्टाचार)

नमस्कार, हिंदी चित्रपटसृष्टीची आजवरची वाटचाल जर नीट अभ्यासली तर असे दिसून येते की इंडस्ट्रीच्या यशाचा मोठा भाग चित्रपटांमधील गाण्यांनीही व्यापला आहे. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये म्युझिक लॉन्चला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे ते यामुळेच. '(प)रागदारी’ या सदर सदरातून निरनिराळ्या अनोख्या रागांमधील गाणी नव्याने समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. याद्वारे आजच्या काळातील नवनवीन प्रचंड दर्जेदार, कायच्या काय असामान्य आणि अतिक्रिएटिव्ह अशा गीतांचे आपण रसग्रहण करणार आहोत. आम्हाला खात्री आहे की या गाण्यांमधून तुम्हालाही या शब्दांची न कळलेली ‘दुसरी बाजू’, किंबहुना न कळलेली महतीच आम्ही समजावून देऊ शकू. संगीत क्षेत्रात कार्यरत असणारे आजचेही कलावंत किती प्रतिभावान आहेत याचाही तुम्हास भस्सकन प्रत्यय येईल.

आज आपण आजूबाजूस पाहतो की जग किती झपाट्याने बदलत चालले आहे. मग सध्या 'आमच्या काळी असं नव्हतं हो' हा डायलॉग अधिकाधिक वेळा, ठिकाणी, प्रसंगी आणि वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींकडून ऐकू येत असल्यास त्यात नवल ते काय! आजकालच्या तरुण पिढीचेच घ्या ना - या पिढीवर घरातून नव्हे तर बाहेरून संस्कार होतात. प्रसारमाध्यमे, भोवतालचे जग, प्रगत तंत्रज्ञान यांनी केलेले संस्कार आणि त्यातून शिकायला मिळणाऱ्या कलाच ते पटकन अवगत करतात. म्हणजे काय हेच आज आपण थोडक्यात सविस्तरली पाहणार आहोत. 

तर आज आपण रसग्रहणासाठी निवडलेले पहिले गाणे आहे - 'मैं तेरा हिरो' या सिनेमातील आणि 'स्वैराचार हाच शिष्टाचार' या रागातील 'बेशरमी की हाईट'. साजिद वाजिद यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत गायलेआहे बेन्नी दयाल आणि शाल्मली खोलगडे यांनी. तर लिहिले आहे कुमार यांनी.



इमानदारी की बीमारी
छोड दे आजा, दौड के आजा
ओ करे दिल तुझको इन्व्हाईट
हो सारी नाईट बेशरमीकी हाईट

वा वा वा, कविवर्य म्हणतात की इमानदारी की बीमारीम्हणजेच प्रामाणिकपणा हा एक प्रकारचा आजारचआहे. खरेच आहे की, पटत नसेल तर प्रेमात पडूनआणि घरी खरे बोलून प्रेयसी वा प्रियकराला भेटायलाबाहेर जाऊ पाहणाऱ्यांना विचारा. म्हणूनच या काव्यात असा सल्ला देण्यात आला आहे की प्रियकराला भेटायला जाताना प्रेयसीने हे उगाच असले ओनेस्टीचे चोचले पुरवू नयेत. हे असले नसते भलतेसलते संस्कार आणि मूल्ये फॉलो करत बसली वेडी, तर भेट नाही झाली की किती सलते ते कळेल मग तिला. खरेच हेभलते अवघड असते.

उलट या जालीम बेरहम दुनियेची जराही चिंता न करताधावत धावत अपुल्या साजणाला (कितवा ते डझन्टम्याटर, पण शक्यतो पहिलाच) भेटायला जावे. कारण साजणाचे दिल साजणीला आर्त साद घालते आहे. तरतिनेही त्यास अनिवार्य प्रतिसाद देऊन पुढचा मागचा विचार न करता त्याच्या अनिवार ओढीने त्याचे दर्शनघेण्यास जावे. शक्यतो रात्री जावे, त्यातच जीवनातीलखरे थ्रिल सामावले आहे. आणि मग काय सारी रात्रभर मनसोक्त धिंगाणा घालावा. कोण माई का लाल त्याविषयी अधिक काही माहितीच्या अधिकाराखाली विचारणार आहे नाहीतरी? म्हणून आला क्षण एन्जॉय करावा आणि लाजलज्जा वगैरे अश्मयुगीन काळातील आउटडेटेड स्वभाव अलंकार सोडून प्रियकरासोबत रममाण व्हावे, अद्वैत साधावे. जगापासून लपूनछपून असे तादात्म्य पावण्यातील आनंद काही वेगळाच. तो या नश्वर भूतलावर सर्वांनाच घेता येत नाही.

मग पुढे जे होईल त्यास निसर्ग जबाबदार. बेशरम व्हा,निर्लज्ज व्हा आणि जीवनाचा पुरेपूर आनंद लुटा. हेआयुष्य तुमचे आहे, यावर फक्त तुमचा हक्क आहे, त्यातकाय घडावे काय नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्ततुमचा आहे, कुणाला कधी कुठे भेटावे हेही तुम्हीचठरवले पाहिजे, कुणाचाही मुलाहिजा बाळगू नका, अरे कोण आई कोण बाप, होत असतील डोक्याला ताप तरव्हा बेशरम निघा सुसाट, व्हा सैराट असा खोल संदेश देणारे हे गीत अप्रतिमच. आईवडिलांनी मुलांवर केलेले व्यर्थ संस्कार मुळातच भंगार असतात, तसल्या घाणेरड्या जोखडातअडकू नये. नम्र, आज्ञाधारक असणे ही शरमेची बाबआहे. निर्लज्जम सदा सुखी ही उक्ती लोकांना केवळ माहीत असते पण तीवर दे दणादण अंमलदेखील करावा असे यातून सुचविण्यात आले आहे.       

इक तू.. इक मैं.. और हो डीम डीम ये लाईट
हो सारी नाईट बेशरमीकी हाईट

लाईट्स डीम डीम होऊदेत म्हणजेच मंद व्हावेत अशी अपेक्षाही पुढे व्यक्त करण्यात आली आहे. काळबदलला तरी प्रेम चिरंतन असते, आधुनिक काळातही ते फक्त माध्यम बदलते, भावना नाही हे यातून कवीला सुचवायचे आहे. नाहीतर तुम्हीच सांगा - "सखी मंदझाल्या तारका, आता तरी येशील का"  आणि "दौड केआजा, हो डीम डीम ये लाईट" यात तत्त्वत: काय फरक आहे? काळाबरोबर पावले टाकत अभिव्यक्तीचे माध्यम भले बदलले असेल जरूर, तरी त्यामागील प्रेमाचीभावना तर तीच आहे ना, हे महत्त्वाचे. आशय शेम टूशेमच ना! करेक्ट, ही शेम अर्थात लाज तेवढी सोडली पाहिजे, बाकी काही नाही. त्याशिवाय बेशरमी की हाईट प्रत्यक्षात कशी बरे येणार, सुफळ संपूर्ण कशी बरेहोणार? आंग्लाळलेल्या तरुणाईस जोरदार प्रोत्साहन द्यायचे असल्याने कवीकडून शब्द हुशारीने गुंफण्यात आले आहेत (कर्मणि प्रयोग).

"लूक प्राणेश्वरी, तू तशीही दिवेलागणीची वेळ उलटून गेल्यावरच येणार आहेस, तर मग जाऊदेत ना सारे दिवे विझून. त्यांची कशाला अडचण. लोडशेडींगची इतकी भयानक समस्या आज सामान्य जनतेला भेडसावत असताना आपण आणखी दिवे जाळणे योग्य वाटत नाहीप्रिये. शेवटी काही झाले तरी आपण या समाजाचे काही देणे लागतो यार, होता होईल तितकी मदत केली पाहिजे मेरे प्यार", अशा उदात्त भावनेतून देण्यात आलेला संदेश केवळ विलक्षणच.    

अरे बिगडा हू मैं यू
थोडा तू भी बिगड जा
अरे आगे बढू मैं
थोडा तू भी आगे बढ जा

यापुढे नायक नायिकेस म्हणितो की ‘हे प्राणसखे, मी तरबिघडलोच आहे. माझ्यासोबत तूही बिघड’. माणसाची जडणघडण होणे किती महत्त्वाचे आहे हे यातून मनावर ठसवले गेले आहे. 'आम्ही घडलो एकदाचे, तुम्ही बीघडा' ह्या अर्थाने हे असावे. म्हणजेच तुम्हीसुद्धा घडा,स्वत:ला घडवा. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हाचअर्थ यातून निघत नाही काय? 'मी आवश्यक ते कष्ट घेतआहे, त्यासाठी इनफ पुढाकार घेत आहे, तर तूही चार पावले पुढे टाक आणि माझी साथ दे.' वा वा वा, ह्यालाम्हणावे आपल्यासोबत जोडीदाराच्याही प्रगतीचा, करियरचा विचार करणे, त्यालाही प्रोत्साहित करण्यातला आनंद मिळवावा तो असा.

आज नियत थोडी होने दे खराबसी
दिखने लगी है इन हवाओ मैं शराबसी

नायिकेच्या मते, हे उद्दिष्ट सत्कारणी लागण्यासाठी आज नियत थोडीफार खराब झाली तरी हरकत नाही, होऊदे खर्च लफडं आहे घरचं. शेवटी कामगिरी फत्ते होणे महत्त्वाचे. ही अवघी हवाच तिला आता जादुई भासू लागली आहे, मद्याचा अंमल जाणवू लागला आहे. या बेहोशीत आपणही सामील होऊ असे ती प्रियकरास विनवत आहे. .

सारी की सारी है जो खुमारी
आ दोनो पी ले लम्हे नशीले
करे हमको ये बडा एक्साईट
हो सारी नाईट बेशरमी की हाईट

हा माहोल सारखा सारखा मिळत नाही. ही नशा, ही मजा पुरेपूर अनुभवली पाहिजे. हे धुंद वातावरणआपणास आता आणखीनच बेधुंद करू लागले आहे. ही सारी रात्र  निर्लज्जपणा साजरी करण्यासाठी आपणचआपल्याला अलॉट केली आहे, तर तिचा पूर्ण आस्वाद घेऊ, सॉल्लीड सैराट होऊ नि फुल झिंगाट होउन धुडगुस घालू, हे म्हणणेही सिच्युएशनला धरून रास्तच.
दिल ये गायब होगया है अपनी जगह से
जो भी हुआ है वो हुआ है तेरी वजह से

हे हृदय आपल्या जागेवरून कुठेतरी गायब झाले आहे.आपली एखादी गोष्ट हरवली असेल, सापडत नसेल वा नजरचुकीने मिसप्लेस झाली असेल तर आपण किती भांबावून जातो. 'स्व'ची यथायोग्य जाणीव असल्यास स्वत:च्या हलगर्जीपणाला आणि दैववादी असल्यास नशिबाला दूषणे देऊ लागतो, पण येथे असे सुचविण्यात आले आहे की आपल्या हृदयाची केस मात्र जर वेगळीअसते. इतर गोष्टींच्या बाबतीत आपण हवालदिल होतो,पण हृदय अर्थात दिल या बाबतीत आपण संबंधितव्यक्तीला दोष देऊ शकतो. हृदय चोरीस जाणे ही एकमेव चोरी अशी आहे की ह्यात चोर महान वाटू लागतो, तो आपल्या आयुष्यात आला म्हणून आपणच स्वत:ला इन वन ऑर अनादर वे भाग्यवान समजू लागतो. तेव्हा त्या व्यक्तीचा अनादर न करताही तिला हे सांगण्याचे स्किल डेव्हलप केले पाहिजे. ते ऐकून तिलाही स्वत:बद्दल भारीवाटले पाहिजे राव.

लेनी है सांसे मुझे अब तेरे साथ में
कहीं भी लेजा हाथ लेके तेरे हाथ में

पुढे तर पहा, नायिकेचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्पष्टपणेदिसून येतो. ती म्हणते मला माझे उरलेले श्वासदेखीलआता तुझ्यासोबतच घ्यावयाचे आहेत माझ्या राजा. ये,आणिक माझा हात हातात घेऊन मजला कुठेही घेऊनजा. इथे मात्र काही चळवळे लोक असा आरोप करूशकतात की ही तर शुद्ध छळवणूक झाली. या पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुष जाईल त्यामागे स्त्रीनेदेखील गप मान खाली घालून जायचे हे कुठवर चालणार? आज एकविसाव्या शतकातही हेच होणार का राव? काय वाटेल तृप्ती देसाईला? पण नायक नायिका पुरोगामी असल्याने अशी शंका घेऊ नये.ते सज्ञान असून त्यांचा निर्णय ते घेऊ शकतातच की, किमान तेवढे स्वातंत्र्य तरी त्यांना द्या.

है जवानी, करे शैतानी
इस उमर में, दिल के सफर में
क्या राँग है, क्या है राईट

अरे तरुण वय आहे, थोडा चावटपणा, वात्रटपणाचालणारच. आत्ता नाही तर काय म्हातारपणी उटपटांग हरकती करणार? तेव्हा तर लोक अजून बोंबा मारतील - ' शी, काय हे, शोभतं का हे असलं या वयात. जनाची नाही मनाची तरी?' त्यापेक्षा आत्ताच जरा मजामस्ती केली तर काय बिघडलं. म्हातारपणी एन्जॉय करूच की काठी हातात, कवळी तोंडात आणि पोक थकल्या पाठीत, कळ गुडघ्यातल्या वाटीत. पण आत्ता काय? हाच तो क्षण हीच ती वेळ, करू एन्जॉय घालू धिंगाणा.  काय चूक काय बरोबर हा फडतूस विचार करण्याची ही वेळ नव्हेच मुळी.

संपूर्ण काव्य नीट पहा, इन्व्हाईट, एक्साईट, राईट, लाईट आणि हाईट - वाह, पहा यमकही काय अफलातून सहजगत्या जुळवले आहे. असे अजिबातच वाटत नाहीकी ते ओढून ताणून जुळवण्यात आले आहे. कवीची अलौकिक प्रतिभा!

असो, तर ह्या जवानीत आत्ता फक्त मजा मारू, उद्याकाय ते भोगू. हा जबर आत्मविश्वास, येणाऱ्यापरिस्थितीला सामोरे जायला एनीटाइम तयार असणेअशा गोष्टी शिकवणारे हे गीत अमूल्यच म्हटले पाहिजे.

तर हे होते आजचे क्वालिटी सॉंग. लवकरच असेच आणखी एखादे क्वालिटी सॉंग पाहू आणि जगण्याचा आनंद द्विगुणीत करू. तोपर्यंत गाठा उंची निर्लज्जतेची, त्यासाठी जी तोड मेहनत करा, झटका आळस गाठा कळस... अरे बघताय काय, सामील व्हा... होऊन जाऊदे बेशरमी की हाईट...

आपली परंपराच आहे ज्या खेळाडूंकडून मेडलची अपेक्षा असतेत्यांच्यापेक्षा दुसरेच कुणी ऑलिम्पिकला आपल्याला मेडल्स जिंकून देत आलेत९६ च्या अटलांटा ऑलिम्पिकला पेस नवखा होतातो ब्रॉन्झ जिंकून आलाआणि तेही एकेरीत२००० सिडनी - मल्लेश्वरी वेटलिफ्टिंगमध्ये ब्रॉन्झ मेडलच वजन पेलून आली (आणि दुर्दैवाने पुढच्या काळात आपला कुणी आदर्श ठेवू नये याचीही तजवीज तिने उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी सापडून करून ठेवली२००४ अथेन्समध्ये मिलिटरीमन आणि आत्ताचा खासदार राज्यवर्धनसिंग राठोडने सिल्व्हर जिंकलंतो डबल ट्रॅप हा नेमबाजीचा प्रकारच बघताना जाम आवडला होता.  २००८ बीजिंगला अभिनव बिंद्राने तर डायरेकट गोल्ड मेडलच जिंकलं२०१२ लंडनला विजयकुमारगगन नारंग हे पुन्हा शूटिंगमध्ये चमकले तर सुशीलकुमारयोगेश्वर दत्त कुस्तीत जिंकलेसायना आणि मेरी कोमनेही मेडल जिंकून भारताला एकूण सहा मेडल्स मिळवून देत षटकार मारला. यावेळीही हीच परंपरा राखत ज्या फारशा लाईमलाईट मध्ये नव्हत्या, त्या सिंधू सिल्व्हर मेडल आणि साक्षी मलिक ब्रॉन्झ मेडल जिंकून आल्या. 

   
 यावेळीही  नेहवालअभिनव बिंद्रा,  सानिया मिर्झा -  बोपन्ना यांच्याकडे डोळे लागून राहिले होतेपण स्पर्धा सुरु होण्यापूर्वी टेस्ट इव्हेन्टमध्ये दीपा कर्माकरने कमला करून दाखवलीती करमरकर नसून कर्माकर आहे हे आपल्या प्रिंट मीडियाला समजायच्या आत तिची  फायनल फेरीही झाली नि त्यातही शानदार प्रदर्शन करत ती चौथी आलीखरंतर तिचा परफॉर्मन्स झाला तोपर्यंत ती सिल्व्हर मेडलची दावेदार झाली होतीपण तिच्यानंतर जिम्नॅस्टिक्स खेळातील स्वित्झर्लंडची वर्ल्ड नम्बर  आणि मग अमेरिकेची नम्बर सध्याची वर्ल्ड चॅम्पियन यांनी अतिकमाल करून दाखवल्याने दीपाचे पदक हुकलेचौथा नम्बर या ऑलिम्पिकला सुटत नाही असं  काहीसं  तोपर्यंत वाटू लागलेलं होतकारण दीपाच्या आधी बीजिंग ऑलिम्पिकचा गोल्ड मेडलिस्ट अभिनव बिंद्राही त्याच्या आवडत्या हातखंडा १० मीटर एअर रायफलमध्ये उत्तेजनार्थ आलालास्ट शॉटच्या आधी त्याची रायफल तुटल्यानेही अर्थात त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला असणारचपण मेडल तर हुकले ते हुकलेच नाभर म्हणून गगन नारंगही बाहेर पडलागेल्या सलग तीन ऑलिम्पिकमध्ये हक्काने मेडल मिळवून देणाऱ्या शूटिंग मध्येच भारताची ही वाताहत आणि बाकी काही खेळात तर क्वालीफाय होण्यापासून सुरुवात

ब्रॉन्झ हुकण्याच्या आपल्या हॅट्ट्रिकमधल्या दुसऱ्या बॉलवर 
आपले टेनिस आउट झाले.  मिश्र दुहेरीत अँडी मरेसारख्याच्या जोडीला हरवल्यावर पुढे ब्रॉंझ मेडलसाठी झालेल्या सामन्यात मिर्झाबोपन्ना जोडीने दोन सरळ सेट्समध्येच रॅकेट टेकलीहॉकीत ३६ वर्षांनी आपण क्वार्टर फायनलला गेलोआणि - ने लीड घेऊनही बेल्जीयमला नंतर  गोल करू दिलेस्पर्धेत तोवर २७ पैकी फक्त  पेनल्टी कॉर्नर्स गोलमध्ये कन्व्हर्ट करण्यात आलेले यश (!) त्या सामन्यातही सुरूच राहिले आणि हॉकी टीम बाहेर पडलीदीपिका कुमारीच्या आर्चरी टीमने 'इकडून वाऱ्याचा वेग होतावगैरे कारणे देत गाशा गुंडाळलाआणि त्यांना हरवणारे महिला मंडळ म्हणाले की 'आमच्या गेमची वेळ पाहता वारा असणार हे गृहीत धरूनच आम्ही सराव  केलाम्हणून जिंकलो'.

बॅडमिंटनमध्ये श्रीकांत बाहेर पडला असला तरी त्याने क्वार्टरमध्ये या खेळातला सध्याचा बापमाणूस लिन डॅनला जबरी फाईट दिली होतीपूर्वी ऑलिम्पिक मेडल जिंकलेल्या योगेश्वर दत्तची कुस्ती यावेळी अगदी शेवटच्या टप्प्यात होती, पण तोही हरला.  

खरी कमाल केली ती साक्षी मलिकनेरोहतक से रिओ तक हा तिचा प्रवास खरंच अचंबित करणारा आहेती नुसती ब्रॉन्झ मेडलच्या लढतीत टिकलीच नाही तर तिने पिछाडीवरून पुढे येत गेम जिंकलाकुस्ती संपायला केवळ तीन मिनिटं बाकी असतानाही ती - अशी मागे होतीआणि गेम संपला तेव्हा तिने स्कोरबोर्ड -  असा करत मेडल जिंकलं होतंहे खरंच कौतुकास्पदसायना नेहवाल आणि आपली पुरुष हॉकी टीम आघाडी घेऊनही शेवटी मॅच हरत असताना साक्षीने दाखवलेली जिगर इतर खेळाडूंना प्रेरणा देणारीच

अशी प्रेरणा मिळाली की काय होतंतर एक ब्रॉन्झ खिशात येऊन २४ तासही उलटत नाहीततेवढ्यात अजून एका मेडलची आपल्यासाठी निश्चिती होते.. कारण पी व्ही सिंधूने सेमीफायनलमध्ये अपोनंटला अक्षरशलोळवलेलं असतंरँक १० ची सिंधू क्वार्टर आणि सेमीजमध्ये अनुक्रमे रँक  आणि रँक  ला हरवते हे  खूपच भारीपण तिची फायनल आणखी खडतर होती.. कारण टक्कर होती वर्ल्ड नंबर  कॅरोलिना मरीनशीही स्पेनची खेळाडू स्पेनमध्ये 'लेडी नदालम्हणून ओळखली जातेकारण दोघेही डावखुरेदोघांचाही खेळ प्रचंड फास्ट आणि प्रतिस्पर्ध्याला कायच्या काय दमवणारात्यांची एनर्जी शोषून मग त्यांना नमवणारादोघांनीही नंबर वनपद भूषवलंयबाकी खेळताना मरीन खेळते जास्त की किंचाळते जास्त हा पीएचडीचा विषय!   अर्थात हिलाच हरवून आपल्या सायनाने २०१४ ला ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होतीपण मग बदला घेत या मरीनने मागच्या वर्षीची ऑल इंग्लड ओपन सायनालाच फायनलला हरवून मारली होतीयावेळी सायनाकडून फार अपेक्षा असताना नेमके दुखापतीनी तिला बेजार केले आणि तिचा खेळ अपेक्षेप्रमाणे झाला नाहीत्यात मतभेद होऊन गोपीचंदसारख्या द्रोणाचार्य कोचपासून फारकत घेण्याचाही परिणाम अलीकडे तिच्या खेळावर दिसून येतोयतेच श्रीकांत आणि सिंधू मात्र अजूनही गोपीचंदचे शिष्य असल्याने ऑलिम्पिक गाजवत राहिले.


सायना आणि मेरी कोमसारखे आपले काही खेळाडू आपापल्या खेळात वर्ल्ड नम्बर वन होतातपण नेमके ऑलिम्पिकसारख्या बिगेस्ट प्लॅटफॉर्मवर मात्र सिल्व्हर किंवा ब्रॉन्झमध्ये समाधान मानतातयावेळी सिंधूचा फॉर्म पाहता तिला गोल्ड जिंकायचा भारीच चान्स आहेगेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये आपण आजवरची सर्वात जास्त म्हणजे सहा मेडल्स जिंकली होतीयावेळी तर १२० जणांचा संघ पाठवल्यावर अपेक्षा जास्त होत्यापण स्पर्धा संपत आली तरी खाते उघडलेच जात नव्हते.. ९२ च्या बार्सिलोना ऑलिम्पिकलाही असेच  शेवटचे आपण हात हलवत शून्य कमाईने परत आलो होतोपण नंतर प्रत्येकवेळी मेडल्स जिंकत आलोयआणि यंदा तर हुकमी एक्के एकेक करून बाहेर पडताना पाहून यावेळीही तेच होतंय की काय असं वाटू लागलं होतंमेडल्सची पाटी कोरी बघून शोभा डेसारख्यांना उगाच आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या (सिंधू फायनलला जाताच या बाईने सिंधू - सिल्व्हर प्रिन्सेस असं ट्विट टाकून आणखी शोभा करून घेतलीच आहेम्हणजे गोल्ड जिंकणारच नाही हा किती विश्वास!). पण जाऊदेएक स्त्रीच जसे दुसऱ्या स्त्रीचे दुःख समजून घेऊ शकते म्हणताततसेच एक स्त्रीच दुसरीला तोंडावरही पाडू शकते हे सिंधू आणि साक्षीने मेडल आणून सिद्ध केलंच.

टीपसुलतान सिनेमात हिरो ऑलिम्पिक मेडल जिंकून ३०० कोटी कमावतोतर अशी मोठी रक्कम अशा काही कष्टाळू टँलेन्टेड खेळाडूंना शोधून घडवण्यातपैलू  पाडण्यातत्यांना  सुविधा देण्यातही खर्च व्हावी ही आता काळाची गरज आहेतरच अशा मोठ्या स्पर्धा आल्या की सोशल मीडियावर फिरणारे जोक्स आणि शोभा डेसारख्यांची वटवट थांबेल

-- पराग