** मी, मोबाईलचोर आणि रात्रीचं
वांद्रे स्टेशन ** - पराग पुजारी
व्वा बघता बघता
धडा मिळून आज
एक महिना झाला
की.. ३० ऑकटोबर
२०१७ - ऑफिसहून निघून संध्याकाळी
उशिरा एका मीटिंगसाठी
एका चॅनेलच्या ऑफिसात
गेलो होतो लोअर
परेलला, तिथे फार
उशीर झाला. मग
बाहेर आलो, जेवलो..
रिटर्न ठाण्याला यायला निघालो.
लोकल वांद्रे स्टेशनला
थांबली.. वेळ रात्री
पावणेबारा - बारा.. एका मित्राशी
व्हाट्सअँप चॅट करत
होतो. विंडो सीटवर
होतो, माझ्या सीटवर
कुणी नव्हतं बाजूला..
रात्री इतकी उशिराची
वेळ, सो डब्यातच
फक्त ७-८ जण होते.
ज्या विंडो सीटवर
बसलो होतो त्या
माझ्या सीटला मागे लागूनच
त्या डब्याचा एन्ट्रन्स
होता, आणि मोबाईल
मला वाटतं अशा
पद्धतीने माझ्या हातात डोळ्यासमोर
होता की खिडकीतून
बाहेरच्यांना दिसू शकेल.
टाईप करत होतो..
तेव्हा आपली पकड
जराशी ढिली असते..
(मी मोबाईल एकाच
हातात धरून टाईप
करतो, दोन्ही हातात
मोबाईल धरून टाईप
करायची सवय नाही)
आय गेस, इनफ
वातावरण निर्मिती झालीये.. आता
मुद्द्याला हात घालत
मुख्य घटनेकडे येतो..
(नंबर का बदलला
या प्रश्नावर दोघा-तिघांना हे संदर्भासहित
स्पष्टीकरण सांगावं लागलेलं तसं..
पण इतरांसाठी हे
नवीन..)
तर लोकल जस्ट
सुरु झाली इतक्यात
माझ्या हातातला मोबाईल मागून
जोरात हिसकावला गेला.
काय झालं ते
लगेच कळून मी
'एsss' म्हणून जोरात ओरडलो,
तो तेवढ्यात पळत
उडी मारून बाहेरही
पडला होता.. पण
लांब पायांचा पुरेपूर
उपयोग करून घेत
मी अडीचतीन ढांगात
ती सीट पार
करून वळून येत
तेवढे अंतर पार
केले आणि त्याच्या
पाठोपाठ उडी मारत
बाहेर पडलो. गाडी
एव्हाना बऱ्यापैकी वेगात सुरु
झालेली जाणवली नव्हती, त्या
फोर्समुळे आणि वळून
उलट्या दिशेने बाहेर पडल्याने
दोघेही प्लॅटफॉर्मवर जोरात पडलो. मी
त्याच्यापुढे काही अंतरावर
पडलो.. माझा चष्मा
पुढे काही फुटांवर
उडून पडला.. तरी
तो पुढे पळत
गेला असता तर
त्याचा पाय धरून
त्याला पकडू शकलो
असतोच. पण लगेच
चार-पाच जण
आले, मला चष्मा
उचलून दिला, 'भाईसाब
आपका चष्मा गिर
गया, आप ठीक
तो है, लगा
तो नहीं' वगैरे
सुरु झालं. त्यांच्या
थोबडयावरूनच ओळखलं की हे
त्याचेच साथीदार आहेत आणि
त्याला मागच्या मागे पळून
जायला मदत व्हावी
म्हणून मला बोलण्यात
गुंतवून ठेवायला आलेत. 'मैं
ठीक हूं, तुम
उन्हीमेसे हो, उसको
ढुंढो वो कहां
गया'... 'अरे क्या
साब आप भी,
हमने तो आपको
चष्मा उठाके दिया,
आपको मदद की'
वगैरे.. अर्थात तेवढ्यात तो
चोर अपेक्षेप्रमाणे पळून
गेला. अशावेळी नेहमीप्रमाणे
काही बघे असतात
ते होतेच, ते
प्रसंग बघून एन्जॉय
करून घरी गेले.
नंतर एक हिंदी
भाषक माझ्याच वयाचा
मुलगा आला मदतीला,
माझी विचारपूस केली.
आता पहिली गोष्ट
माझं सिमकार्ड ब्लॉक
करायचं होतं, त्यासाठी त्याने
त्याचा फोन दिला
कॉल करायला. अशावेळी
कस्टमर केअरला फोन लागेल
ते एअरटेल कसले..
मग त्याच्या फोनवरून
रूममेटला फोन करून
सांगितलं कार्ड ब्लॉक कर,
ते त्यानं केलं
(रूममेटचा नंबर इमर्जन्सीसाठी
माझ्याकडच्या ऑफिसकार्डवर होता.) त्या
अनोळखी मुलाचे अनेक आभार..
माणुसकी आहे.. सचित झा
नाव त्याचं, चंदीगड.
त्याने त्याचेही असे काही
अनुभव सांगितले चंदीगड
शहरातले, बेंगलोर एअरपोर्टवरचे वगैरे.
अशावेळी असं काही
ऐकताना थोडक्यात आपण एकटेच
उल्लू नाही बनत
ही जाणीव उभारी
देणारी असते कदाचित.
आमच्या ऑफिसातल्याही एकाचा मोबाईल असाच
पण लोकलच्या गर्दीत
मारला गेला होता,
एकीचा तर कानाला
लावलेला - फोनवर बोलत असताना
गेलाय.
एव्हाना लक्षात आलं होतं
की आता ती
सगळी टोळीच पसार
झालीये (नाव माझं
पराग आणि परागंदा
हे होतात, नॉन्सेन्स)
आणि आपल्या पायात
चप्पल नाहीये, जोरात
आपटलो तेव्हा ती
बिचारीही पायातून साथ सोडून
गेली होती. मग
सरफरोशमधल्या अमीर खानप्रमाणे
जरा आठवून पाहिलं
तर ती त्या
प्लॅटफॉर्मवरच पडलेली असायला हवी
होती, मग जिथे
आम्ही पडलो तिथे
पाहिलं. काही खुणा,
ओरखडे दिसले, पण
चप्पल नाही.. खाली
ट्रॅकवरही नाही.. त्यांनी तीही
पळवली.. किती चिंधीचोर
असावं माणसांनी. मग
पुढच्या लोकलने मिलिंद सोमणसारखा
अनवाणी जात दादर,
तिथून ठाणे, मग
रिक्षा पकडून रूमवर असा
दीड वाजता पोचलो.
रूममेटचा फोन घेऊन
आधी फेसबुक आणि
जीमेलचा पासवर्ड चेंज केला.
कारण फोनला स्क्रीनलॉक
असलं तरी चोरला
गेला तेव्हा तो
चालू स्थितीत होता,
सो अशी उच्च
प्रतीची छपरी पोरं
आपल्या काँटॅक्ट्समधल्या मुलींना नाही ते
फोटो, व्हिडीओ नेटवरून
घेऊन पाठवणे, अश्लील
मेसेज करणे, नको
तिथे कुणाला टॅग
करणे असे उद्योग
करू शकतात हे
आपण पाहतो, वाचतोच.
रूममेटने नंबर ब्लॉक
करण्याआधी माझ्या नंबरवर कॉल
केला होता, तेव्हा
रिंग झाली म्हणाला,
म्हणजे त्या चोरांनी
काही लगेच तो
स्विचऑफ केला नव्हता.
पुन्हा लगेच कॉल
केल्यावर मात्र स्विचऑफ आला.
नंबर बदलला आता
माझ्या नंबरचं सर्कल महाराष्ट्र
सर्कल - ते मुंबईपेक्षा
वेगळं म्हणून एअरटेल
गॅलरीत चकरा मारून
उपयोग झाला नाही,
मुंबईबाहेरच्या एरटेल गॅलरीत करावं
लागेल म्हणे (हे
त्या गॅलरीत मला
तिसऱ्या खेपेत सांगितलं गेलं)..
कस्टमर केअरकडूनही काही होत
नाहीये.
अंडरकरंट: त्या मुलाने
- सचितने तरी त्यातूनही
काही पॉझिटिव्ह काढून
मला सांगितलं की
'चलो भाई, फिर
भी ठीक है..
सिर्फ मोबाईलही तो
गया.. क्योंकी मैने
उपरसे उतरते वक्त
देखा तुम चिल्लाये,
फिर बाहर आके
दोनो गिरे.. लेकिन
तुम जहां गिरे
वहांसे एक दो
इंचसे ट्रेन गयी..
तो सोचो. और
उसको तुमने ऑलमोस्ट
पकडा था वोभी
देखा, लेकिन पकड
भी लेते तो
क्या होता.. इनके
पास तो ब्लेड,
चाकू कुछ ना
कुछ रहताही है
ऐसे वक्तपर यूज
करने के लिये..
वो तुम्हे गलेपे,
हाथपे मारते और
भाग जाते.. हमें
तो दस सेकंड्स
के बाद वो
सेन्सेशन होता है
खून आने के
बाद.' हे ऐकून
चक्रावलो. हे असं
होईलच असं नाही,
पण ती पोरं
पाहता असं काही
असेलही त्यांच्याकडे.. पण डोकं
ट्रेनपासून थोडक्यात बचावलं हे
मात्र खरं होतं,
तिथल्या अजूनही एकाने सांगितलं
हे मला आणि
मीही ती जागा,
ते मार्क्स पाहिल्यावर
जाणवलं.
पुढची ट्रेन इतक्यात नव्हती,
डावा गुडघा जरासा
डिसलोकेट झाल्यासारखा वाटत होता,
लंगडत चालताना मग
कळा येऊ लागल्या.
तिथल्याच बेंचवर बसलो. सचित
तरी मी काही
खाल्लंय का विचारत
होता, चहा कॉफी
तरी घे म्हणत
होता.. मीच दोघांसाठी
तिथे कॉफी घेतली.
मग एक पोलीस
तिकडून येताना दिसला, त्याला
सांगितलं. त्यावर 'प्लॅटफॉर्म नंबर
एकवर चौकी आहे,
उद्या येऊन कम्प्लेंट
करा.. IMEI नंबर घेऊन
या' असं तो
ढिम्मपणे म्हणाला आणि गेला..
आणि लोक धोनीला
निर्विकार म्हणतात.
डाव्या अंगावर पडलो होतो.
रक्त जरासंच आलं
(आहेच किती अंगात!),
दोन चार किरकोळ
जखमा झाल्या.. पण
पाय, गुडघे, कंबर,
हाताला मुका मार
जबर लागला होता.
रूमवर जाऊन स्प्रे
मारला, पण पुढे
२-३ दिवसात
पाय टम्म सुजला.
डावं पाऊल लोक
रग्बीचा बॉल म्हणून
काढून नेतील इतका
सुजला. तसाच पुढे
ऑफिसला जात राहिल्याने
- तेही आता बूट
घालून - पाय अजून
आवळला गेला, प्लस
लोकलमध्ये सर्वांगाला मजबूत मसाज
असतोच, आपण माणूस
आहोत की ताक
घुसळायची रवी काही
कळत नाही. घराशेजारी
राहणारी लहान पोरं
चित्रं रंगवताना काळा निळा
रंग हवा असेल
तर माझ्या पावलावर
ब्रश फिरवून नेतील
असं वाटायला लागलं.
मलमफिलम लावून उपयोग होईना.
मग इंजेक्शन गोळ्या
घेऊन आणि डॉक्टरांनी
सांगितल्यानुसार पायाला अँकल लावून
झोपणे वगैरे उपाय
करून हळूहळू बरा
झालो. त्याना फ्रॅक्चरची
शंका होती, गरज
पडलायस एक्सरे काढू म्हणाले,
पण ती वेळ
आली नाही.
मोबाईल गेल्याचं फार काही
नाही, काँटॅक्ट्स काय
जीमेलला सिंक असतात
ते मिळालेच परत..
पण जरासं दुःख
म्हणजे नोट्समध्ये काही लिखाण,
काही स्क्रिप्ट्सचे पॉईंट्स
वगैरे होते, असो..
बराचसा बॅकअप होताच ड्राइव्ह
किंवा ड्राफ्ट्समध्ये सेव्ह
केलेला. मोबाईल महागडा मी
कधीच घेत नाही.
दोन वर्षात पाच
हजार पूर्ण वसूल
झाले होते आणि
आताशा स्क्रॅचेसही पडलेले.
या निमित्ताने नवीन
घेतला साधारण त्याच
किमतीचा.. (पण नवीन
घ्यायचा म्हणून वांद्रे स्टेशनवर
रात्री बाराला जाऊ नका)..
तो मोबाईल विकून
त्यांना असे कितीसे
मिळणार असं म्हणालो
तेव्हा सचित म्हणाला,
'ऐसे लोगों को
क्या फरक पडता
है भाई, साले
ड्रग्ज वग्ज करते
रहते है, सौ
दोसौ रुपये भी
मिलजाये तो बहोत
होते है इनके
लिये, ऐसेही पैसा
जमा करते है'..
(पेहरावावरून, बोलण्यावरून समजत होतं
की ती टोळी
शांतताप्रिय धर्माची होती, १८-२० वर्षांची
पोरं.. त्या भागात
जोरात करियर करत
कार्यरत आहेत म्हणे
यांच्या व्यसनी टोळ्या, पोलिसानेही
आधी तेच विचारून
कन्फर्म करून घेतलं)
आणि या नॉर्थच्या
सचितला तर त्यांच्याबद्दल
विशेष राग.. त्यावर
तो जे जे
बोलला ते जाऊदे,
पण वांद्रे स्टेशनच्या
परिसरात रात्रीच्या वेळी सतर्क
रहा इतकंच.
असो.. जे झालं
ते काही फार
अडव्हेंचर वगैरे नाही की
मला लगेच 'खतरों
के खिलाडी' मध्ये
बोलावतील. इतकी मोठी
पोस्ट फक्त यासाठी
की तात्पर्य म्हणून
काय खबरदारी घ्याल
ते सांगावं:
* रात्रीच्या
वेळी मागे एंट्रन्स
असेल अशा सीटवर
शक्यतो बसू नका,
अर्थात डब्याच्या एंट्रीला पाठमोरे
बसणे टाळा. ट्रेन
असो वा बस..
एन्ट्रीजवळ बसलेला असाल तर
एक्स्ट्रा सावधान रहा.
* शर्टच्या
खिशात मोबाईल, पैसे
वगैरे ठेवून ट्रेनमध्ये
झोपू नका, लोकल
थांबली की आत
येऊन बिनधास्त वरच्या
वर पळवून नेतात
(परवाच अशी बातमीही
वाचली मटाला)
* मुलींनी विशेष काळजी घ्यावी
- तुमची ओढणी, केस वगैरे
मागच्या मागे त्या
ग्रिलला आवळतील आणि हातातून
वस्तू, गळ्यातून चेन काढून
नेतील.. (लेडीज डब्यात एक
पोलीस असतो तसा
पण तरीही काळजी
घ्या, पोलीस असतानाही
काय काय होतं
ते आपण वाचतोच)
* आजकाल स्क्रीनलॉक असतंच.. पण
जीमेल, फेसबुक, फोटो गॅलरी,
यूट्यूब, व्हॉट्सअप, महत्त्वाची अँप्स,
डॉक्युमेंट्सनाही लॉक ठेवा
- किमान अशावेळी प्रवास करताना
तरी.
* खिडकीतून
मोबाईल किंवा कोणतीही किमती
चीज बाहेरच्यांना दिसू
देऊ नका. ही
नको त्यात 'मेक
इन इंडिया' करणारी
टोळकी आधी निरीक्षण
करतात आणि अगदी
गाडी सुटताना येऊन
हिसकावून नेतात, वयस्क असाल
किंवा तुमच्या मूव्हमेंट्स
फास्ट नसतील तर
तुम्ही पटकन बाहेरही
येऊ शकत नाही.
बाहेर आलात तरी
साथीदार असतातच त्यांचे, वेगाने
पडणे वा लागणे
हे त्यांनी गृहीतच
धरलेले असते, आपण नाही.
सनी देओल असाल
तर नुसता पाय
आपटूनही ट्रेन थांबवू शकता
आणि मग त्या
चोरांना पिळून वाळत घालू
शकता, पण आपण
सामान्य असतो.
येस,धडा मिळून आज एक
महिना झालाय. मुंबईत
साडेपाच वर्षं राहतोय, पण
असा झटका पहिल्यांदाच
बसला.. बट व्हॉटेव्हर
- आय स्टील लव्ह
मुंबई.. यू नो
- ऐसे बडे बडे
शहरों में ऐसी
छोटी छोटी बातें.
. .
चला वाटल्यास शेअर करा..
अवेअरनेस वाढावा इतकाच हेतू..
बी सेफ.
No comments:
Post a Comment