*मी हरविंदर पवार बोलतोय.....*
दिनांक २४ नोव्हेंबर २०११ ...पवारांवर 'हल्ला' झाला. ('हल्ला'..हा शब्द
तीनवेळा वेगवेगळ्या दिशेने चेह-यावर चित्रविचित्र भाव आणून म्हणा
पटकन...एखाद्या डेली सोपसाठी विचार करण्यात येईल -- हां, तर एका नाजूक
सरदारजीने प्रेमाने मारलेली एक हलकीशी चापट म्हणजे हल्ला ?...छे छे..काय हे
मिडीयावाले,उगाच राईचा कावळा आणि पराचा पर्वत करतात.) कुण्या हरविंदर सिंग
नामक शूरवीराने (याला समानार्थी शब्द म्हणून चानेलवाल्यानी 'भ्याड';'माथेफिरू'
असे काहीतरी पापभिरू शब्द वापरलेत..ते सोडा भिडू..माझच ऐका..आय मीन - वाचा.)
होय..माझ्याकडे जरा आतल्या गोटातल्या न्यूज आहेत...त्या मी देतोय...कुण्णा
कुण्णाला म्हणून सांगायच्या नाहीत बर का! प्लोमिश ?...वाचा तर मग !
सर्वप्रथम ... मी गेलो भेटायला अजित पवारांना...
अजित : काय झु-या ...कसा आहेस..काय म्हणतोस?
मी : ठीक आहे...माझीच कृपा.
अजित : तुझी रे कशी...अशावेळी आपलीच कृपा असं उद्देशून म्हणावं आमच्यासारख्या
नेत्यांना..सत्ता आहे आमच्या हातात..अजिबात म्यानर्स म्हणून नाहीत हा
तुला..असा कसा रे तू..पण तू जर माझा सच्चा कार्यकर्ता झालास तर मी या ठिकाणी
असे आश्वासन देऊ इच्छितो की तू नक्कीच एक चांगला,सुजाण आणि कर्तबगार असा
नागरिक. . .
मी : गट्टी फू करीन हां परत बोर करायला लागलात तर...
अजित: अरे नको रे बाबा...असे नको करू.बोल आज कसं काय येणं झालं गरीबाकड ?
मी : ते काय ते...तुमच्या काकांवर कोणी हात टाकला म्हणे..
अजित: टाकला नाही रे ..उगारला म्हण...'टाकला' चा अर्थ वेगळा होतो..
मी : हां..ते नॉलेज तुम्हांला जरा जास्तच नाही का..विसरलोच..हसताय काय तुमच्या
काकांसारखे..आय मीन निर्लज्जासारखे..बोट काढा आधी ते नाकावरच..आणि उगारला तर
माझा मामा राहतो हॉ. असो तर कोण तो हरविंदरसिंग,त्याने काकांना थोबाडीत मारली
म्हणे..
अजित: म्हणे काय म्हणे..अरे मारलीच...पण आम्ही त्या अजाण नादान फड्तुसाला
मोठ्या मनाने माफ केलंय.
मग काय..बोलणंच खुंटलं..निघालो तडक सुप्रिया सुळेन्कडे . (असल्याना आपण
दादा,ताई,अक्का,माई,तात्या वगैरे म्हणून आपल्या जिभेची शान घालवत नाही
हां..सांगूनशान ठिवतो आधीच)
मी: हाय...व्होट्स अप?
सुप्रिया: सीलिंग पंखा आणि कोळ्याची २ जाळी,स्लाबचा फिक्कट पिवळा रंग..
मी: मंद...व्होट्स अप म्हणजे असं वर मान करून बघून नाही उत्तर द्यायचं...
तिकडे पिताश्रींवर हल्लाबिल्ला झालाय ना...काय मग..कसं वाटतंय आता?
सुप्रिया: हा हा ते होय..ते काही नाही रे...निवळेल सगळ..व्यर्थ हल्लागुल्ला
कशाला त्याचा एवढा ...जॉर्ज बुश, पी.चिदंबरमना तर चप्पल मारलेली की...उगाच
प्रसिद्धी मिळवायला काहीबाही करतात हे लोक.
मी: नाहीतर काय...उगाच थोबाडीत वगैरे खातात अनोळखी माणसाकडून..
सुप्रिया: तेच की...अरे परू...तसं नाही रे..तू कुणाच्या बाजूने आहेस..मी त्या
हरविंदर का फर्विन्दारच बोलतेय..काय गरज होती त्याला असं करायची...मेला वेडाच
आहे झालं. दिला सोडून...सुखरामाना काय मारतो...बाबांना काय मारतो..जळल मेलं
लक्षण ते!
मी: होय..तुम्ही पवार कुटुंबीय सोडून सगळे वेडेच की...सा-या 'बारा' गावची
'मती' तुम्हालाच नाही का! धान्य आहे..सॉरी..धान्य नव्हे..ते
कृषिमंत्र्यांकडे...धन्य म्हणायचय मला..निघतो..टेक केअर !
वाटेत यशवंत सिन्हा भेटले...
मी: काय हो...खुशीत दिसताय..जाणतो बरं आम्ही सगळं. परवाच म्हणालात की 'देशात
महागाई इतकी वाढत आहे की उद्या जर कुणा आम आदमीने हिंसक मार्ग अवलंबला तर
आम्हास आश्चर्य वाटणार नाही '...आणि आज हे असं....योगायोगच ना?
सिन्हा: नाहीतर काय रे...पण आमचा काही हात नाही बर यामागे,आमचं तर कमळ
आहे.....तेच ओरडून सांगतोय जगाला माझ्या स्टेटमेंटचा काही संबंध जोडू नका
म्हणून..कुठे कर्णा मिळतो का बघ सेकण्ड ह्यांड...आवाज बसलाय आता माझा. आम जनता
तुम्ही..एवढी महागाई...भ्रष्टाचार पाहून गप्प का बसाल...चालायचंच. जातो
पुजारी..,बाय ...अडवाणींनी बोलावलंय हेल्मेट घालून..गेलं पाहिजे.
हेपण गेले निघून...मग दिसले सर्वांचे लाडके आर.आर.पाटील.
मी : अहो ते शरद पवारांना...
आर.आर. : कळलं ते...
मी: मग तुमची प्रतिक्रिया...आणि प्लीज मराठीतच बोला हं...तुमचं हिंदी जगजाहीर
आहे.
आर.आर. : प्रतिक्रिया काय देणार आता...काय बोलावं ते सुचत नाही अशा ज्या काय
मोजक्या वेळा येतात माझ्यावर - वर्षातल्या ३६५ दिवशी..तेव्हा जे बोलतो तेच
बोलतो...हिंदीतच बोलू दे रे...शेवटी मुंबईत राहतो म्हटलं मी..हा बोलतो हां..एक
दोन साडे माडे त्रिफळा , ''ऐसे बडे बडे शहरो में ऐसे छोटे छोटे हाद्से तो होते
रहते है "
ये तो हद से गुजर गये असे मनात म्हणत मी पुढे गेलो..तर दिसले लोकपालवाले
किसन हजारे. (सांगितलं ना...अण्णा,नाना,काकामिका काही म्हणत नाही मी कुणाला)
मी: मौनव्रत सोडलंय ना...उपोषणपण नाही ना..मग बोलाल का,जे घडलंय त्यावर काही?
हजारे: एकच का मारली...अजून जरा...
मी: (शक्य तितके डोळे मोठे करत आणि आ वासत) काय?
हजारे: (सावरून घेत ) पण पराग, लोकशाहीत असं होणे ही खेदजनक गोष्ट आहे..या
गोष्टीमागचा खरा जनक कोण ते आता शोधून काढलं पाहिजे..शोधूदेत बापडे..मी आपला
जातो..काय त्या बेदी,केजरीवाल,भूषणनी घोळ घातला नाही ना परत यावर काहीतरी
बडबडून, ते मलाच पाहिलं पाहिजे रे बाबा...
गेले की हेपण लगेच...आणि येताना दिसले राज ठाकरे.
मी : जय महाराष्ट्र...मला कुसुमाग्रजांच्या सगळ्या कविता पाठ
आहेत...शिवाजीमहाराज की.. असं कुणी कधीही म्हणालं तरी आपसूक माझ्या तोंडातून
'जय' येतं,,,मी राहतो त्या इमारतीचे नाव मराठीत लिहिलेले आहे..मी मराठी
माध्यमाच्या शाळेतच शिकलेलो आहे..मी मराठी मुलीशीच लग्न करणार आहे.. मी....
राज: बास बास....फार पुढे गेलास...लग्नाला बोलाव म्हणजे झालं...अभिमान वाटतो
तुझ्यासारख्या मराठी तरुणांचा..आता मुद्द्यावर ये.
मी : अहो...आज ते घड्याळवाले ...त्यांना कोणीतरी दिल्लीत दिली गालावर ठेवून...
राज: चांगलं झालं की मग..तुमच्यासारखे तरुण रोज स्वप्नात काय वेगळं करतात
मग...फरक एवढाच की तुमचे हात फक्त शिवशिवतात...पण त्या हरविंदरने ते करून
दाखवलं...लाज वाटते राजे लाज वाटते...हे शुभकार्य एखाद्या मराठी युवकाने का
नाही केलं !! हन्त हन्त...आणि श्रीमुखात भडकावायचीच होती तर मनमोहनसिंगापासून
सुरुवात का नाही केली..पंजाबात तरी कुठे भ्रष्टाचारमुक्त सरकार आहे ?
असो...मला जायला पाहिजे...पेपर्स तयार करायचेत उमेदवारांसाठी...स्वस्थ बसून
नाही चालणार...
मी: ठीक आहे...बरोबर आहे तुमचं.
राज : ते तर नेहमीच असतं...जाता जाता एकच सांगतो..लग्न कर म्हणे..पण मुलांना
मात्र मराठी माध्यमाच्या शाळेतच घालायचं...नाहीतर तुझी काही खैर नाही...लक्ष
आहेच माझं तुझ्यावर...अरे,एक सांगू का..मी जन्मलो ना,तेव्हाही आवर्जून मराठीतच
रडलो होतो माहितेय का तुला...आता तुझ्यापासून काय लपवायचे रे पग्या...म्हणून
सांगितलं. निघतो...गर्वच नव्हे तर यथार्थ आणि यथेचछ माज बाळग मराठी असल्याचा..
जय महाराष्ट्र !!
काय रुबाब,काय माज,काय आत्मविश्वास!!!....पण थक्क व्हायला पण पुरेसा वेळ
मिळाला नाही मला...कारण समोरून चक्क चक्क सचिन तेंडुलकर येताना
दिसला...आयला..टेस्ट चालू आहे तिकडे हिंदुस्थान - पश्चिम इंडिजची(राज अजून फार
लांब गेले नव्हते हो अजून...म्हणून ) आणि हा इथे काय करतोय...आता मला राहुल
द्रविडच कितीही आवडत असला तरी सचिन कुणी परका का आहे...त्याला जसा विनोद, तसा
मी...
मी : अरे सचिन...तू?
सचिन : अरे पराग ..तू?
मी: चल..परत हेच म्हणूया नावांची अदलाबदल करून..म्हणजे पुढच्या वेळी त्या
केडबरीच्या जाहिरातीत आपल्या दोघांना घेतील...
सचिन : व्होट एन आयडिया...ओके ! स्टार्ट... मी असा परत तिथून चालत येतो...तो
खांद्यावरचा आदिदासचा लोगो दिसत होता ना रे नीट मगाशी...टेन्शनच आम्हाला
नेहमी...आलोच.
मी: अरे थांब...जाऊदे ते ...आणि मी एयरटेल वापरतो...त्यामुळे विषयच मिटला..मला
सांग..तू इथे कसा? आणि तुझं ते महाशतक. . .
सचिन: अरे नको रे बाबा पुन्हा आठवण ...टेन्शन येते परत...शेवटी मीही माणूसच
ना. अरे ते पवारांवर कुणी हल्ला...
मी: हायला सचिन..हे माहिताय तुला ? मला वाटलं कसोटीत तू बिझी आणि ते
'महाशतक'चे प्रेशर...त्यात न्यूज पोचली नसेल तुला.
सचिन : अरे असं कसं प-या...पवार आयसीसीचे अध्यक्ष होते...आमच्याच क्षेत्रातले
ना..माहिती ठेवावी लागते यार. पण थोबाडीत आज खाल्ली...आय मीन...बसली हे एका
अर्थी बरंच झालं म्हणायचं.
मी : हायला सचिन...हे काय बोलतोस तू?
सचिन : अरे ऐकून तर घे...गैरसमज नकोय प्लीज... हे बघ., मी आज ६७ वर नाबाद
राहिलोय...उद्या प्रोब्याबली सेन्चुरी ठोकेनच असं वाटतंय मला..आणि दिवस अखेर
६०+ स्कोर करून नाबाद राहिल्यावर मी गेल्या सलग ७ डावात दुस-या दिवशी येऊन १००
केलंय,आणि कारकिर्दीत तर असं १४ पैकी ११ वेळा केलंय...
मी : परत एकदा ह ह हायला सचिन...एवढं कसं रे आठवत तुला ? काय मेमरी...व्वा !!
सचिन :नाही रे...मलाही मघाशीच कळलं हे आज तक वरून...असो. तर उद्या
शतक...नव्हे,महाशतक केले की मिडीयाच सगळा फोकस माझ्यावर...आज केले असते तर
अर्धा मिडिया गेला असता ना पवारांकडे...सो...आय मीन..यू नो...
मी : हायला सचिन..कुणाला काय तर कुणाला काय....चांगलाय चांगलाय.. कर महाशतक.
हार्दिक शुभेच्छा.
सचिन : धन्यवाद...जातो रे, बाय. माही धोनी आणि डंकन फ्लेचर येतील शोधत नाहीतर.
आणि तो गेलाही...मला वाटलं..चला,संपले आता सगळे...आता कोणी भेटणार नाही. .जावं
शांत घरी..तर तेवढ्यात कुठल्याशा कोप-यातून एक हुंदका ऐकू आला...मला आधी वाटलं
भास झाला असेल..पुढे गेलो..तर परत कानात...मग बघूयाच म्हटलं ..तर तिथे कोणीतरी
एक माणूस गुडघ्यात डोकं खुपसून बसलेला..हा रडत का असेल ? राष्ट्रवादीचा
कार्यकर्ता असेल का? जवळ गेलो....हातानी धरून उठवलं..
मी : काय रे,कोण तू ? कोणत्या गावचा ? आणि असा रडतोस का ?
तो : मला काही नाव-गाव नाही...फक्त आम आदमी म्हणा..आणि फक्त लढ म्हणा.
मी: बर..पण झालं काय? बोल तर खरं...
तो : आयला त्या पवारला एक मस्त हाणली आज त्या सरदारन... कलेजा खुश झाला...पण
कानाखाली लावली याचेच भांडवल नुसते चहूकडे...का लावली याचे त्याने जे कारण
दिले त्याबाबत कोणी चकार शब्द काढत नाहीये अजून...इथे रोज मरतोय आम्ही या
महागाईने..बोंबला...महागाई,भ्रष्टाचार,बेरोजगारी,काळा
पैसा,भारनियमन,निरक्षरता...एक ना अनेक... या समस्या सोडवू असे कुणी म्हणत
नाहीये नेता कुठला एवढ होऊनही,काय तर म्हणे 'पवार मोठ्या मनाचे,माफ केलं
त्याला,उदो उदो त्या पवारचा आणि त्याच्या पॉवरचा,साले काका-पुतणे आवाहन करतायत
जनतेला शांत रहा,जाळपोळ नको,बंद नको,संप नको...आणि नंतर हळूच फोन करून म्हणतील
गोटात "हे काय,त्या भागात सगळ आनंदी कसं काय,दंगल नाही,दुकाने उघडी
आहेत..तोडफोड नाही..झोपलात काय...लागा कामाला.." ह्यांच्या तर.... वर काय,
तर तो म्हणे माथेफिरू होता...अरे तो तर मला 'डोंबिवली फास्ट'मधला माधव आपटे
वाटला..' एक अण्णा हजारे निर्माण नाही झाला तरी चालेल..पण असे हजारो हरविंदर
पाहिजेत...आणि काय हा मीडिया पण..ऐश्वर्याचं बाळ दिसतं यांना...आमच्या
पोटातला जाळ नाही दिसत...थूत तिच्या आयला...कसं होणार या देशाचं...
तो बरंच काही बोलत राहिला नंतर असं काय काय...पण मला काही ऐकूच आलं नाही..कान
ऐकायला अधीर होते खरतर,पण मन बधीर झालय ना,संवेदना तर बोथट १९४७ पासूनच
झाल्यात देशाच्या...
मान खाली घालून आलो घरी...टीव्ही लावलेला...'पवारने कहा की...','इंतजार होगया
खत्म,सचिन करेंगे अब महाशतक अपने घरेलू मैदान में ', 'पाहूया आपण उद्धवजी काय
म्हणताहेत या थप्पड प्रकरणावर ..','तर कशी स्थिती आहे आत्ता सांगली आणि
कोल्हापूरमध्ये ?...','भ्याड पवारांवर हल्ला झाला आहे...माफ करा,पवारांवर
भ्याड हल्ला झाला आहे ',' थप्पड से डर नही लगता साब,सरदार से लगता
है"......................
अखंड रे बाबा.....
--- पराग पुजारी.
दिनांक २४ नोव्हेंबर २०११ ...पवारांवर 'हल्ला' झाला. ('हल्ला'..हा शब्द
तीनवेळा वेगवेगळ्या दिशेने चेह-यावर चित्रविचित्र भाव आणून म्हणा
पटकन...एखाद्या डेली सोपसाठी विचार करण्यात येईल -- हां, तर एका नाजूक
सरदारजीने प्रेमाने मारलेली एक हलकीशी चापट म्हणजे हल्ला ?...छे छे..काय हे
मिडीयावाले,उगाच राईचा कावळा आणि पराचा पर्वत करतात.) कुण्या हरविंदर सिंग
नामक शूरवीराने (याला समानार्थी शब्द म्हणून चानेलवाल्यानी 'भ्याड';'माथेफिरू'
असे काहीतरी पापभिरू शब्द वापरलेत..ते सोडा भिडू..माझच ऐका..आय मीन - वाचा.)
होय..माझ्याकडे जरा आतल्या गोटातल्या न्यूज आहेत...त्या मी देतोय...कुण्णा
कुण्णाला म्हणून सांगायच्या नाहीत बर का! प्लोमिश ?...वाचा तर मग !
सर्वप्रथम ... मी गेलो भेटायला अजित पवारांना...
अजित : काय झु-या ...कसा आहेस..काय म्हणतोस?
मी : ठीक आहे...माझीच कृपा.
अजित : तुझी रे कशी...अशावेळी आपलीच कृपा असं उद्देशून म्हणावं आमच्यासारख्या
नेत्यांना..सत्ता आहे आमच्या हातात..अजिबात म्यानर्स म्हणून नाहीत हा
तुला..असा कसा रे तू..पण तू जर माझा सच्चा कार्यकर्ता झालास तर मी या ठिकाणी
असे आश्वासन देऊ इच्छितो की तू नक्कीच एक चांगला,सुजाण आणि कर्तबगार असा
नागरिक. . .
मी : गट्टी फू करीन हां परत बोर करायला लागलात तर...
अजित: अरे नको रे बाबा...असे नको करू.बोल आज कसं काय येणं झालं गरीबाकड ?
मी : ते काय ते...तुमच्या काकांवर कोणी हात टाकला म्हणे..
अजित: टाकला नाही रे ..उगारला म्हण...'टाकला' चा अर्थ वेगळा होतो..
मी : हां..ते नॉलेज तुम्हांला जरा जास्तच नाही का..विसरलोच..हसताय काय तुमच्या
काकांसारखे..आय मीन निर्लज्जासारखे..बोट काढा आधी ते नाकावरच..आणि उगारला तर
माझा मामा राहतो हॉ. असो तर कोण तो हरविंदरसिंग,त्याने काकांना थोबाडीत मारली
म्हणे..
अजित: म्हणे काय म्हणे..अरे मारलीच...पण आम्ही त्या अजाण नादान फड्तुसाला
मोठ्या मनाने माफ केलंय.
मग काय..बोलणंच खुंटलं..निघालो तडक सुप्रिया सुळेन्कडे . (असल्याना आपण
दादा,ताई,अक्का,माई,तात्या वगैरे म्हणून आपल्या जिभेची शान घालवत नाही
हां..सांगूनशान ठिवतो आधीच)
मी: हाय...व्होट्स अप?
सुप्रिया: सीलिंग पंखा आणि कोळ्याची २ जाळी,स्लाबचा फिक्कट पिवळा रंग..
मी: मंद...व्होट्स अप म्हणजे असं वर मान करून बघून नाही उत्तर द्यायचं...
तिकडे पिताश्रींवर हल्लाबिल्ला झालाय ना...काय मग..कसं वाटतंय आता?
सुप्रिया: हा हा ते होय..ते काही नाही रे...निवळेल सगळ..व्यर्थ हल्लागुल्ला
कशाला त्याचा एवढा ...जॉर्ज बुश, पी.चिदंबरमना तर चप्पल मारलेली की...उगाच
प्रसिद्धी मिळवायला काहीबाही करतात हे लोक.
मी: नाहीतर काय...उगाच थोबाडीत वगैरे खातात अनोळखी माणसाकडून..
सुप्रिया: तेच की...अरे परू...तसं नाही रे..तू कुणाच्या बाजूने आहेस..मी त्या
हरविंदर का फर्विन्दारच बोलतेय..काय गरज होती त्याला असं करायची...मेला वेडाच
आहे झालं. दिला सोडून...सुखरामाना काय मारतो...बाबांना काय मारतो..जळल मेलं
लक्षण ते!
मी: होय..तुम्ही पवार कुटुंबीय सोडून सगळे वेडेच की...सा-या 'बारा' गावची
'मती' तुम्हालाच नाही का! धान्य आहे..सॉरी..धान्य नव्हे..ते
कृषिमंत्र्यांकडे...धन्य म्हणायचय मला..निघतो..टेक केअर !
वाटेत यशवंत सिन्हा भेटले...
मी: काय हो...खुशीत दिसताय..जाणतो बरं आम्ही सगळं. परवाच म्हणालात की 'देशात
महागाई इतकी वाढत आहे की उद्या जर कुणा आम आदमीने हिंसक मार्ग अवलंबला तर
आम्हास आश्चर्य वाटणार नाही '...आणि आज हे असं....योगायोगच ना?
सिन्हा: नाहीतर काय रे...पण आमचा काही हात नाही बर यामागे,आमचं तर कमळ
आहे.....तेच ओरडून सांगतोय जगाला माझ्या स्टेटमेंटचा काही संबंध जोडू नका
म्हणून..कुठे कर्णा मिळतो का बघ सेकण्ड ह्यांड...आवाज बसलाय आता माझा. आम जनता
तुम्ही..एवढी महागाई...भ्रष्टाचार पाहून गप्प का बसाल...चालायचंच. जातो
पुजारी..,बाय ...अडवाणींनी बोलावलंय हेल्मेट घालून..गेलं पाहिजे.
हेपण गेले निघून...मग दिसले सर्वांचे लाडके आर.आर.पाटील.
मी : अहो ते शरद पवारांना...
आर.आर. : कळलं ते...
मी: मग तुमची प्रतिक्रिया...आणि प्लीज मराठीतच बोला हं...तुमचं हिंदी जगजाहीर
आहे.
आर.आर. : प्रतिक्रिया काय देणार आता...काय बोलावं ते सुचत नाही अशा ज्या काय
मोजक्या वेळा येतात माझ्यावर - वर्षातल्या ३६५ दिवशी..तेव्हा जे बोलतो तेच
बोलतो...हिंदीतच बोलू दे रे...शेवटी मुंबईत राहतो म्हटलं मी..हा बोलतो हां..एक
दोन साडे माडे त्रिफळा , ''ऐसे बडे बडे शहरो में ऐसे छोटे छोटे हाद्से तो होते
रहते है "
ये तो हद से गुजर गये असे मनात म्हणत मी पुढे गेलो..तर दिसले लोकपालवाले
किसन हजारे. (सांगितलं ना...अण्णा,नाना,काकामिका काही म्हणत नाही मी कुणाला)
मी: मौनव्रत सोडलंय ना...उपोषणपण नाही ना..मग बोलाल का,जे घडलंय त्यावर काही?
हजारे: एकच का मारली...अजून जरा...
मी: (शक्य तितके डोळे मोठे करत आणि आ वासत) काय?
हजारे: (सावरून घेत ) पण पराग, लोकशाहीत असं होणे ही खेदजनक गोष्ट आहे..या
गोष्टीमागचा खरा जनक कोण ते आता शोधून काढलं पाहिजे..शोधूदेत बापडे..मी आपला
जातो..काय त्या बेदी,केजरीवाल,भूषणनी घोळ घातला नाही ना परत यावर काहीतरी
बडबडून, ते मलाच पाहिलं पाहिजे रे बाबा...
गेले की हेपण लगेच...आणि येताना दिसले राज ठाकरे.
मी : जय महाराष्ट्र...मला कुसुमाग्रजांच्या सगळ्या कविता पाठ
आहेत...शिवाजीमहाराज की.. असं कुणी कधीही म्हणालं तरी आपसूक माझ्या तोंडातून
'जय' येतं,,,मी राहतो त्या इमारतीचे नाव मराठीत लिहिलेले आहे..मी मराठी
माध्यमाच्या शाळेतच शिकलेलो आहे..मी मराठी मुलीशीच लग्न करणार आहे.. मी....
राज: बास बास....फार पुढे गेलास...लग्नाला बोलाव म्हणजे झालं...अभिमान वाटतो
तुझ्यासारख्या मराठी तरुणांचा..आता मुद्द्यावर ये.
मी : अहो...आज ते घड्याळवाले ...त्यांना कोणीतरी दिल्लीत दिली गालावर ठेवून...
राज: चांगलं झालं की मग..तुमच्यासारखे तरुण रोज स्वप्नात काय वेगळं करतात
मग...फरक एवढाच की तुमचे हात फक्त शिवशिवतात...पण त्या हरविंदरने ते करून
दाखवलं...लाज वाटते राजे लाज वाटते...हे शुभकार्य एखाद्या मराठी युवकाने का
नाही केलं !! हन्त हन्त...आणि श्रीमुखात भडकावायचीच होती तर मनमोहनसिंगापासून
सुरुवात का नाही केली..पंजाबात तरी कुठे भ्रष्टाचारमुक्त सरकार आहे ?
असो...मला जायला पाहिजे...पेपर्स तयार करायचेत उमेदवारांसाठी...स्वस्थ बसून
नाही चालणार...
मी: ठीक आहे...बरोबर आहे तुमचं.
राज : ते तर नेहमीच असतं...जाता जाता एकच सांगतो..लग्न कर म्हणे..पण मुलांना
मात्र मराठी माध्यमाच्या शाळेतच घालायचं...नाहीतर तुझी काही खैर नाही...लक्ष
आहेच माझं तुझ्यावर...अरे,एक सांगू का..मी जन्मलो ना,तेव्हाही आवर्जून मराठीतच
रडलो होतो माहितेय का तुला...आता तुझ्यापासून काय लपवायचे रे पग्या...म्हणून
सांगितलं. निघतो...गर्वच नव्हे तर यथार्थ आणि यथेचछ माज बाळग मराठी असल्याचा..
जय महाराष्ट्र !!
काय रुबाब,काय माज,काय आत्मविश्वास!!!....पण थक्क व्हायला पण पुरेसा वेळ
मिळाला नाही मला...कारण समोरून चक्क चक्क सचिन तेंडुलकर येताना
दिसला...आयला..टेस्ट चालू आहे तिकडे हिंदुस्थान - पश्चिम इंडिजची(राज अजून फार
लांब गेले नव्हते हो अजून...म्हणून ) आणि हा इथे काय करतोय...आता मला राहुल
द्रविडच कितीही आवडत असला तरी सचिन कुणी परका का आहे...त्याला जसा विनोद, तसा
मी...
मी : अरे सचिन...तू?
सचिन : अरे पराग ..तू?
मी: चल..परत हेच म्हणूया नावांची अदलाबदल करून..म्हणजे पुढच्या वेळी त्या
केडबरीच्या जाहिरातीत आपल्या दोघांना घेतील...
सचिन : व्होट एन आयडिया...ओके ! स्टार्ट... मी असा परत तिथून चालत येतो...तो
खांद्यावरचा आदिदासचा लोगो दिसत होता ना रे नीट मगाशी...टेन्शनच आम्हाला
नेहमी...आलोच.
मी: अरे थांब...जाऊदे ते ...आणि मी एयरटेल वापरतो...त्यामुळे विषयच मिटला..मला
सांग..तू इथे कसा? आणि तुझं ते महाशतक. . .
सचिन: अरे नको रे बाबा पुन्हा आठवण ...टेन्शन येते परत...शेवटी मीही माणूसच
ना. अरे ते पवारांवर कुणी हल्ला...
मी: हायला सचिन..हे माहिताय तुला ? मला वाटलं कसोटीत तू बिझी आणि ते
'महाशतक'चे प्रेशर...त्यात न्यूज पोचली नसेल तुला.
सचिन : अरे असं कसं प-या...पवार आयसीसीचे अध्यक्ष होते...आमच्याच क्षेत्रातले
ना..माहिती ठेवावी लागते यार. पण थोबाडीत आज खाल्ली...आय मीन...बसली हे एका
अर्थी बरंच झालं म्हणायचं.
मी : हायला सचिन...हे काय बोलतोस तू?
सचिन : अरे ऐकून तर घे...गैरसमज नकोय प्लीज... हे बघ., मी आज ६७ वर नाबाद
राहिलोय...उद्या प्रोब्याबली सेन्चुरी ठोकेनच असं वाटतंय मला..आणि दिवस अखेर
६०+ स्कोर करून नाबाद राहिल्यावर मी गेल्या सलग ७ डावात दुस-या दिवशी येऊन १००
केलंय,आणि कारकिर्दीत तर असं १४ पैकी ११ वेळा केलंय...
मी : परत एकदा ह ह हायला सचिन...एवढं कसं रे आठवत तुला ? काय मेमरी...व्वा !!
सचिन :नाही रे...मलाही मघाशीच कळलं हे आज तक वरून...असो. तर उद्या
शतक...नव्हे,महाशतक केले की मिडीयाच सगळा फोकस माझ्यावर...आज केले असते तर
अर्धा मिडिया गेला असता ना पवारांकडे...सो...आय मीन..यू नो...
मी : हायला सचिन..कुणाला काय तर कुणाला काय....चांगलाय चांगलाय.. कर महाशतक.
हार्दिक शुभेच्छा.
सचिन : धन्यवाद...जातो रे, बाय. माही धोनी आणि डंकन फ्लेचर येतील शोधत नाहीतर.
आणि तो गेलाही...मला वाटलं..चला,संपले आता सगळे...आता कोणी भेटणार नाही. .जावं
शांत घरी..तर तेवढ्यात कुठल्याशा कोप-यातून एक हुंदका ऐकू आला...मला आधी वाटलं
भास झाला असेल..पुढे गेलो..तर परत कानात...मग बघूयाच म्हटलं ..तर तिथे कोणीतरी
एक माणूस गुडघ्यात डोकं खुपसून बसलेला..हा रडत का असेल ? राष्ट्रवादीचा
कार्यकर्ता असेल का? जवळ गेलो....हातानी धरून उठवलं..
मी : काय रे,कोण तू ? कोणत्या गावचा ? आणि असा रडतोस का ?
तो : मला काही नाव-गाव नाही...फक्त आम आदमी म्हणा..आणि फक्त लढ म्हणा.
मी: बर..पण झालं काय? बोल तर खरं...
तो : आयला त्या पवारला एक मस्त हाणली आज त्या सरदारन... कलेजा खुश झाला...पण
कानाखाली लावली याचेच भांडवल नुसते चहूकडे...का लावली याचे त्याने जे कारण
दिले त्याबाबत कोणी चकार शब्द काढत नाहीये अजून...इथे रोज मरतोय आम्ही या
महागाईने..बोंबला...महागाई,भ्रष्टाचार,बेरोजगारी,काळा
पैसा,भारनियमन,निरक्षरता...एक ना अनेक... या समस्या सोडवू असे कुणी म्हणत
नाहीये नेता कुठला एवढ होऊनही,काय तर म्हणे 'पवार मोठ्या मनाचे,माफ केलं
त्याला,उदो उदो त्या पवारचा आणि त्याच्या पॉवरचा,साले काका-पुतणे आवाहन करतायत
जनतेला शांत रहा,जाळपोळ नको,बंद नको,संप नको...आणि नंतर हळूच फोन करून म्हणतील
गोटात "हे काय,त्या भागात सगळ आनंदी कसं काय,दंगल नाही,दुकाने उघडी
आहेत..तोडफोड नाही..झोपलात काय...लागा कामाला.." ह्यांच्या तर.... वर काय,
तर तो म्हणे माथेफिरू होता...अरे तो तर मला 'डोंबिवली फास्ट'मधला माधव आपटे
वाटला..' एक अण्णा हजारे निर्माण नाही झाला तरी चालेल..पण असे हजारो हरविंदर
पाहिजेत...आणि काय हा मीडिया पण..ऐश्वर्याचं बाळ दिसतं यांना...आमच्या
पोटातला जाळ नाही दिसत...थूत तिच्या आयला...कसं होणार या देशाचं...
तो बरंच काही बोलत राहिला नंतर असं काय काय...पण मला काही ऐकूच आलं नाही..कान
ऐकायला अधीर होते खरतर,पण मन बधीर झालय ना,संवेदना तर बोथट १९४७ पासूनच
झाल्यात देशाच्या...
मान खाली घालून आलो घरी...टीव्ही लावलेला...'पवारने कहा की...','इंतजार होगया
खत्म,सचिन करेंगे अब महाशतक अपने घरेलू मैदान में ', 'पाहूया आपण उद्धवजी काय
म्हणताहेत या थप्पड प्रकरणावर ..','तर कशी स्थिती आहे आत्ता सांगली आणि
कोल्हापूरमध्ये ?...','भ्याड पवारांवर हल्ला झाला आहे...माफ करा,पवारांवर
भ्याड हल्ला झाला आहे ',' थप्पड से डर नही लगता साब,सरदार से लगता
है"......................
अखंड रे बाबा.....
--- पराग पुजारी.
No comments:
Post a Comment