Wednesday, 31 August 2011

कांय समजलांत !!!

कुणाला आवडावं म्हणून
लिहित नसतं कुणी,
कुणालातरी आपण आवडावं म्हणून
आपल्याला आवडत नसतं कुणी,
आपली निवड ' तिकडून ' होणारच नसेल,
...तर वेळीच अडवावी आपणच आपली आवड ,
त्यानंतरही मग न अडणारे आपले अश्रू
अडवायलाही येणार नसतं कुणी ...

1 comment:

  1. का माहित का आवडली मला तुझी हि कविता कारण मी हि अडवत असेन स्वतःच्याच मनाला..
    आपल्या मनातले कोणीतरी न सांगताच बोलले कि आजही अडवू शकत नाही स्वतःमधील प्रतिसादाला..

    ReplyDelete