Monday, 28 November 2011

हरभजन @ कौन बनेगा करोडपती ..

हा एपिसोड खरोखर शूट झाला आहे...हरभजन टीममधून  शूट झाल्यावर त्वरित...हरभजनच्या पंख्यांनी हे वाचू नये प्लीज....
तर एके दिवशी काय झाले...हरभजन  गेला कौन बनेगा  करोडपती' मध्ये खेळायला (काय करणार,तसंही सध्या काही काम नाही...चार पैसे मिळवायचे तर इकडे तिकडे जाऊन 'येस सर' म्हणत प्रेझेंटी लावली पाहिजे ना !)  अमिताभ बच्चन नेहमीच्या रुबाबात समोर बसलेले...हॉट सीट वर येऊन बसला भज्जी...

अमिताभ : आणि आता आपल्या सोबत आहे हरभजन सिंग ...एकेकाळचा टर्मिनेटर ऑफ टीम इंडिया ! भज्जी...एकूण १३ प्रश्न आहेत,४ पर्याय..आणि एकही लाईफलाईन नाही तुला..कारण तुझी लाईफलाईन तर भारतीय क्रिकेट निवड समितीकडे आहे.आणि हो,तू गेम क्विट ही करू शकत नाहीस,तुला संपूर्ण गेम खेळावाच लागेल.. पण तुला तुझा मनचाहा पडाव कुठ हवाय ते बोल...
भज्जी : अरे वा..ते मी ठरवायचं असतं? ते ते माझ्या हातात आहे का?
अमिताभ : मग काय...हे काय तुझं टीम मधलं स्थान आहे काय तुझ्या हातात नसायला...बोल बाळा.
भज्जी : पहिला प्रश्न ...कारण ५००० सुद्धा खूप आहेत सध्या माझ्यासाठी...तेवढे तरी नक्की मिळूदेत ..जय वाहे गुरु !

अमिताभ : ठीक आहे..तर पहिला प्रश्न - आजघडीला या जगत सर्वात दु;खी.फ्रस्ट्रेटेड,निराश,हताश,हतबल असा कोण मनुष्य आहे? -- पर्याय आहेत..हरभजन सिंग, भज्जी, टर्मिनेटर-वन्स अपॉन अ टाईम, वरील सर्व ?
भज्जी : वरील सर्व.

अमिताभ : सही जवाब...आता तू कमीत कमी ५००० तरी घेऊन जाऊ शकशील.पुढचा प्रश्न, यापैकी कोण सध्या तुझा सर्वात मोठा शत्रू आहे? --  प्रग्यान ओझा,अमित शर्मा, पियुष चावला,आर.अश्विन ?
भज्जी : आर. अश्विन...

अमिताभ : बरोब्बर..तू जिंकलेस १०००० ! तिसरा प्रश्न..'यापैकी कुणाला तू कधीच माफ करणार नाहीस?' --  आंड्र्यू सायमंड्स , एस.श्रीशांत, गीता बसरा, आर. अश्विन ?
भज्जी :  अश्विन .

अमिताभ : करेक्ट...चौथा प्रश्न..' यापैकी कोणत्या खेळाडूला सर्वात आधी भारत रत्न  दिला पाहिजे?' -- सचिन तेंडुलकर, ध्यानचंद, अभिनव बिंद्रा, आर. अश्विन ?
भज्जी : वेल..बाकी तिघे ग्रेट आहेतच..त्यानाही मिळावं अशी इच्छा आहेच. पण सर्वात आधी मात्र अश्विनच ..कारण माझ्यासारख्या अव्वल,जागतिक दर्जाच्या,गुणवान,अफलातून ,सामना एकहाती फिरवणा-या,अनेक सामने जिंकून दिलेल्या फिरकी खेळाडूला बाहेर करून माझी जागा मिळवणे हे महाकठीण  काम..ते त्याने करून दाखवलंय..त्यामुळे अश्विनच ! लॉक करा.

अमिताभ : ओके..लॉक अश्विनला तर करता नाही येणार..तो तर आता सुसाट सुटला आहे..विकेटपण  घेतोय,शतकपण करतोय,आता रे तू काय करशील? आणि जे जे काय स्वत:बद्दल बोललास बोजड अवजड विशेषणे लावून...तो सगळा तुझा गैरसमज आहे बाळा. उगाच आमची फिरकी घेऊ नकोस. पण तुझं उत्तर लॉक केलंय..आणि ते बरोबर आहे..ग्रेट..आता पाचवा प्रश्न..'रिकाम्या जागा भरा.समज तबेल्यात एक घोडा आहे..तर हे वाक्य पूर्ण कर. - ______ तबेला. -- घोडा अंदर, हॉर्स इनसाइड ,वारू आत , अश्विन ?
भज्जी : अश्विन..कारण स्पेलिंग ashw  in  असे होते ना ..म्हणजेच ती रिकामी जागा.

अमिताभ : सही उत्तर ! जशी तुझी संघातील जागा त्याने भरून काढली तशीच...ग्रेट ! सहावा प्रश्न १,६०,००० साठी..' नेहमीप्रमाणे भारतीय टीमला 'त्याने'च जिंकून दिले,तर यापैकी काय म्हणावं लागेल?'  -- अश्विनी ये ना,  ऐश बच्चन, अष्टविनायक, अश्विन नायक ?
भज्जी : अश्विन नायक..सध्या तरी तोच नायक आहे संघाचा..तोच टोचतोय मला सारखा...तोच तोच तोच !

अमिताभ : बिलकुल सही जवाब..आता सातवा प्रश्न. 'ज्याच्यावर सूर्य आणि चंद्र हे दोघेही प्रसन्न आहेत असा तो कोण? बहुव्रीही समास आहे नीट लक्षात घे..' --  सनमून, हनिमून,आचंद्रसूर्य नांदो, अश्विन ?
भज्जी : अश्विन...कारण त्याचे नावच 'रवी चंद्रन ' आहे हो..त्यामुळे तोच तोच तोच.

अमिताभ : हेही बरोबर आहे..जिंकलास तू ३,२०,०००. आता आठवा प्रश्न..नीट ऐक, ' एकदा अभिषेक आणि ऐश्वर्या क्यारम खेळत होते..यू नो क्यारम ना, अश्विन मस्त टाकतो बघ क्यारम बॉल. .जो तुला जन्मात जमणार नाही..हा,तर ऐक..खेळात ऐश्वर्या जिंकली तार यापैकी मी काय म्हणेन ? ' --  अभी जीत , सून जिंकली रे, पोरगा परत फ्लॉप, अश्विन
भज्जी : अश्विन..कारण स्पेलिंग ash win असे होते ना !

अमिताभ :  अचूक आहे रे,आता नववा प्रश्न, अगदी सोपा 'भाद्रपद्च्या नंतर आणि कार्तिकच्या आधी कोणता महिना येतो?' -- नववा महिना, मेरा नाम हिना, अधिक महिना, अश्विन ?
भज्जी : नववा प्रश्न आहे म्हणून नववा महिना असं काही नसतं ओ,अंधश्रद्धा आहे सगळी ... उत्तर आहे अश्विन...

अमिताभ : ग्रेट..तू जिंकलास १२,५०,००० ! आता दहावा प्रश्न...'समज एक दिवस सूर्य नि चंद्र दोघेही ना उगवता  संपावर गेले तर  या अफाट विश्वाचा कारभार सांभाळून तो सुरळीत चालवू शकेल असा
या जगातील एकमेवाद्वितीय महापुरुष कोण?' --  रजनी कान्ट, पॉवरफुल शरद पवार, चंद्र मी सूर्य मी पत्रिकेतला मंगळपण मी, अश्विन ?
भज्जी : अश्विनच हो परत...म्हटलंच आहे - 'रविचंद्र  न  अश्विन'...म्हणजे रवी-चंद्र नसले तरीही अश्विन आहे ना..

अमिताभ : अरे वा..हुशार आहेस..हेदेखील बरोबर उत्तर आहे. आता प्रश्न अकरावा...ज्या अकरामध्येही तुला आता घेत नाहीत..असा अकरा आकडा तुझ्या खास आवडीचा असेल ना..तर प्रश्न आहे, ' यापैकी तुझा आदर्श आणि गुरु कोण?' -- शेन वॉर्न,अनिल कुंबळे, मुथय्या मुरलीधरन, अश्विन ?
भज्जी : अश्विनच हो परत एकदा...बाकीचे तिघे महान आहेतच..पण सिनियर फिरकी गोलंदाजाला बाहेर करून आपण संघात कायमस्वरूपी स्थान मिळवावे यासाठी मी जे माझ्या कारकिर्दीत अखंड प्रयत्न नेहमी केले..हो,बरोबर अनिल कुंबळेच...पण ते मला काही जमलं नाही..अश्विनने मात्र मला बाहेर केलंय..त्यामुळे तोच तोच तोच !

अमिताभ : अरे वा..हेसुद्धा योग्य उत्तर आहे की रे ..आणि अशा प्रकारे आता तू जिंकले आहेस तब्बल पन्नास लाख रुपये ! पुढचा प्रश्न, बारावा, ज्या नंबरचाही खेळाडू म्हणून तुला सध्या संघात कोणी घेत नाही- पाणी नेवून देणे,ग्लोव्हज,बेंट,पॅड नेऊन देणे वगैरे कामे करणारा रे.. असो...तर प्रश्न नीट ऐक..अचूक उत्तर दिलेस तर तू जिंकू शकशील तब्बल एक करोड रुपये..'तू भारतीय क्रिकेट संघात कमबेंक कधी करणार ?' -- आणखी वर्षभरात, दोन वर्षांनी, ४ वर्षांनी, अश्विनचा नातू टीमचा कर्णधार म्हणून निवृत्त झाल्यावर ?
भज्जी : अश्विनचा नातू टीमचा कर्णधार म्हणून निवृत्त झाल्यावर.................त्या आधी तर काही स्कोप नावाचा प्रकारच नाही ना माझ्यासाठी..

अमिताभ : अभिनंदन........तू जिंकला आहेस एक करोड रुपये...वा वा वा..हार्दिक अभिनंदन...आता पुढचा आणि अंतिम प्रश्न ,तेरावा प्रश्न, संघातील तुझ्या स्थानाचा एव्हाना तेरावा झालाच आहे..आता या तेराव्यावर लक्ष केंद्रित कर...अचूक उत्तर तुला मिळवून देईल तब्बल पाच करोड रुपये...तय्यार?..तर प्रश्न आहे की...'तू क्रिकेटमध्ये शेवटची विकेट कधी घेतली होतीस?' - कॉलेजात असताना,
शाळेत असताना, जन्मलास तेव्हा, मागच्या जन्मी ?
भज्जी : ओ..कसला अवघड प्रश्न...नाही येत बघा उत्तर ..काय आठवतच नाय तर.........
अमिताभ : नाही नाही..असं नाही..उत्तर दिलंच पाहिजे तुला..अरे टीम सिलेक्टर्सना  तुला ते सांगता आलं पाहिजे ना-पुन्हा संघात यायचं असेल तर? स्मरणशक्तीला ताण दे आणि सांग बाळा..आणि फार वेळ घेऊ नकोस  हं, विकेट घ्यायला घेतोस तेवढा तर अजिबातच घेऊ नकोस बरं का..सांग आता .
भज्जी : (खूप खूप खूप विचार करून,बराच वेळ पगडी खाजवून..कारण पगडीच्या आत काही नाहीच ना )  मागच्या जन्मी !
अमिताभ : ओह ..
भज्जी : काय झालं सर..चुकलं का..जाऊ का ? माझे ते ५००० तरी द्या..निघतो मी..तुम्हांला भेटून बरं वाटलं !
अमिताभ : नाही बेवकूफ....काय हे कुणीपण येतं आणि पाच करोड जिंकून जातं असं म्हणायची वेळ आलीये आता तुझ्यामुळ...अरे भुरट्या,तू जिंकला आहेस तब्बल पाच करोड रुपये. अभिनंदन...तू या जन्मात एकही विकेट घेतली नाहीस त्याबद्दल..
भज्जी : आं ?
अमिताभ :  काही नाही काही नाही..काय हे..लायकी काय,जिंकतो किती! छे !! असो..तर आज तुला पाच करोडचा चेक देण्यासाठी इथे आली आहे एक खास व्यक्ती..टाळ्यांच्या काद्काडतात स्वागत करूया..(हरभजन सवयीप्रमाणे नखे खात उत्सुकतेने डोळ्यात प्राण अन्णून पाहू लागतो).........दि  ग्रेटेस्ट मिरेंकल ऑफ इंडियन क्रिकेट टीम एव्हर ...प्लीज वेलकम -- मिस्टर रविचंद्रन अश्विन !!!
(सर्वजण टाळ्या वाजवू लागतात..अमिताभ  अश्विनशी गप्पांमध्ये गुंग होतो..त्याला सांगू लागतो मीच तो दिवार,शोले,जंजीर,डॉन, अभिमान,बागबान,पा मध्ये काम केलेला इसम वगैरे..सगळे प्रेक्षक पटापट येऊन अश्विनची स्वाक्षरी मिळवण्यासाठी एकच गर्दी करतात..इकडे पाच करोड जिंकलेल्या हरभजनला कोणीच विचारात नाही...तो हिरमुसलेला..मनातून तुफान चरफडत असलेला,पण तितकाच हतबल..सर्व केंमेरेही  अश्विनवर रोखलेले...हरभजनचा घोर अपमान..त्याला हे सहन होत नाही...तो हळूच एका कोप-यातून निघून जाऊ  लागतो,ते अमिताभ पाहतो.)
अमिताभ : इस्टोप भज्जी...(मग हां लपंडाव नाही,करोडपतीचा सेट आहे  हे लक्षात येऊन ) स्टोप भज्जी...
(भज्जी थांबतो..बाणेदारपणे समोर येतो आणि म्हणतो..एक ऐतिहासिक डायलॉग..)

भज्जी : जीव गेला तरी चालेल ...पण या दुष्ट अश्विनच्या हातून हे बक्षीसच काय, पाणीसुद्धा घेणार नाही..
('वाह..वाह..,क्या डायलॉग मारा है..फिरसे बोलो ' असे प्रेक्षक म्हणतात...पण त्यावर तर सरदारजी भज्जी आणखीनच भडकतो..)
भज्जी: तुम्हांला चेष्टा वाटतेय..मला खरंच नकोयत हे पाच करोड रुपये..आता मी पुन्हा टीम मध्ये येऊनच  पाच करोड रुपये माझ्या खेळातून मिळवेन...ही इथली अशी भीक नकोय..जाता जाता एकच अमितजी..तुमचाच डायलॉग मारून जातो,पण तो या परमदुष्ट अश्विनला उद्देशून..."आज खुश तो बहोत होगे तुम..हांयी....."

आणि एवढे बोलून तो निघून गेला....सगळेच पुरेसे थक्क झाले ...खरंच गेला हो...खोटं नाही बोलत..अश्विन शप्पथ..
आता तर असंही कानावर आलंय की अमिताभच्या एबीकॉर्पतर्फे या पाच करोडमधून हरभजन-अश्विन यांच्यावर हिंदी सिनेमा तयार होणार आहे..आणि या दोन्ही प्रमुख पात्रांसाठी योग्य कलाकारांचा शोध सुरू आहे....

-- पराग पुजारी.

No comments:

Post a Comment