ही कहाणी आहे एका राष्ट्राची
मी रहात असलेल्या महान देशाची
तो होता छावणी ब्रिटीश,मुघल,डचांची
४७ ला झाली पहाट त्याच्या आजादीची..
आकाराने देश लईच मोठा
लोकसंख्येने तर लईलईच मोठा
बैल निपजतात जेथे यूपी - बिहारात
नि गोठा वाढतो सहिष्णू महाराष्ट्रात ...
कीड देशाला प्रचंड लागली
वाट सहजच तत्त्वांची लागली
घोटाळे करून नेत्यांची खाज नाही भागली
भ्रष्टाचाराची तोफ अभिमानाने डागली ...
बाई इटली सोडून आली
सत्तेची किटली दिल्लीत बसली
साठ वर्षे पक्षाने सूत्रे हलवली
इमानी समाजाची गुणसूत्रे पळवली...
सवय पुढे मग झाली याचीच
आज ना उद्या होती होणार गोचीच ..
एक दिवस मग असा आला - कोणी कुणाला ओळखत नाही
निरक्षर बेकारी गलिच्छ रोगराई व्यसनी तरुणाई बोंब बारमाही
समाज हलकट - निद्रिस्त रहा
नेते नालायक - खातच रहा
सिनेमे लोचट - सेन्सॉर आडवा
क्रिकेट खेचक - वर्ल्डकप आठवा
चाललंय आपलं चालूदे
देश मातीत जाऊदे
मला पोटभर खाऊदे
गरीब भुकेने मरूदे...
लाख कोटी शब्द विसरले
पेटी खोका जिभेवर रुळले
आरक्षण - डोनेशन बहुत झाले
शिक्षणसम्राटच डॉन झाले
स्विस ब्यांकेत खातं 'आदर्श' ठरलंय
जाईल तिथे खाणं तत्त्वच जडलंय
भ्रष्ट पैशाने 'टेबलाखालून' पछाडलंय
ओवाळून सत्तेचा लिंबू राज्याराज्यात झपाटलंय
सगळीकडेच झाला अंधार
अखेर दोन डोळ्यांत फुलला अंगार
ही बदलली पाहिजे सिस्टीम भंगार
मिळूदे स्वच्छ निरोगी सरकार ...
हजारांत एखाद्यालाच एवढं सगळं जाणवलं
त्या हजारांत एकाचं नाव अण्णा हजारे निघालं
बसला गडी करायला उपोषण प्राणांतिक बिणान्तिक
जाणीवा जागृत झाल्या तुमच्या आमच्या सामाजिक बिमाजिक
सोबत ते डेंजर विकीलीक्स काढायचं उकरून टूजी - थ्रीजी
देशही म्हणाला अण्णांना - 'व्हॉट एन आयडीया सरजी ! '
सरकारला दिसल्या ' हजारे ख्वाहिशे ऐसी '
त्यांच्या नियमांची झाली ऐशी कि तैशी
एक झाले सगळे एकदम
फुस्स झालं शासन बेरहम
लोकपाल विधेयक जिंकून गेलं
लिंबूपाणी घेत उपोषण सोडलं
च्यानेल पेपर्सनी बरंच कमावलं
सिस्टीमनं बेअरींग डेअरींग गमावलं
शांत शांत ...
वाटलं..आता सगळं सुधारलं.. जिण वधारलं
काल स्वप्नात आले बोस,टिळक,आगरकर,सावरकर
विचारलं त्यांना "दादा,खुश ना ? सारं बदललं ना लवकर ?"
खाड्कन मग कानाखाली बसली
वर चार शब्द ऐकवून गेली
"होय बाळा, जरा बदललेलं दिसतंय हे तात्पुरतं,
जसं जेवणात लोणचं तोंडी लावण्यापुरतं
उद्या सर्व पुन्हा 'जैसे थे' होईल
'वो भी क्या दिन थे' म्हणत जिंदगी जाईल
स्वप्नात आलोय म्हणजे तू झोपलाच आहेस
पुढचा अण्णा बसेपर्यंत झोपेतच राहशील "
... ताड्कन उठलो आरशात पाहिलं
मी नाही समाज दिसला
आरती प्रेयर नमाज पाहिला
कुठूनसा मागून आवाज आला,
'जागे व्हा,विचार बदला,देश बदला
नाहीतर सोडा नाद नि सरळ 'देशच बदला'
पुढचा अण्णा आत्ताच अदला - बदला
प्रत्येकाने उठा नि घ्या हक्काने बदला
प्रत्येकाने उठा नि घ्या हक्काने बदला '
मी रहात असलेल्या महान देशाची
तो होता छावणी ब्रिटीश,मुघल,डचांची
४७ ला झाली पहाट त्याच्या आजादीची..
आकाराने देश लईच मोठा
लोकसंख्येने तर लईलईच मोठा
बैल निपजतात जेथे यूपी - बिहारात
नि गोठा वाढतो सहिष्णू महाराष्ट्रात ...
कीड देशाला प्रचंड लागली
वाट सहजच तत्त्वांची लागली
घोटाळे करून नेत्यांची खाज नाही भागली
भ्रष्टाचाराची तोफ अभिमानाने डागली ...
बाई इटली सोडून आली
सत्तेची किटली दिल्लीत बसली
साठ वर्षे पक्षाने सूत्रे हलवली
इमानी समाजाची गुणसूत्रे पळवली...
सवय पुढे मग झाली याचीच
आज ना उद्या होती होणार गोचीच ..
एक दिवस मग असा आला - कोणी कुणाला ओळखत नाही
निरक्षर बेकारी गलिच्छ रोगराई व्यसनी तरुणाई बोंब बारमाही
समाज हलकट - निद्रिस्त रहा
नेते नालायक - खातच रहा
सिनेमे लोचट - सेन्सॉर आडवा
क्रिकेट खेचक - वर्ल्डकप आठवा
चाललंय आपलं चालूदे
देश मातीत जाऊदे
मला पोटभर खाऊदे
गरीब भुकेने मरूदे...
लाख कोटी शब्द विसरले
पेटी खोका जिभेवर रुळले
आरक्षण - डोनेशन बहुत झाले
शिक्षणसम्राटच डॉन झाले
स्विस ब्यांकेत खातं 'आदर्श' ठरलंय
जाईल तिथे खाणं तत्त्वच जडलंय
भ्रष्ट पैशाने 'टेबलाखालून' पछाडलंय
ओवाळून सत्तेचा लिंबू राज्याराज्यात झपाटलंय
सगळीकडेच झाला अंधार
अखेर दोन डोळ्यांत फुलला अंगार
ही बदलली पाहिजे सिस्टीम भंगार
मिळूदे स्वच्छ निरोगी सरकार ...
हजारांत एखाद्यालाच एवढं सगळं जाणवलं
त्या हजारांत एकाचं नाव अण्णा हजारे निघालं
बसला गडी करायला उपोषण प्राणांतिक बिणान्तिक
जाणीवा जागृत झाल्या तुमच्या आमच्या सामाजिक बिमाजिक
सोबत ते डेंजर विकीलीक्स काढायचं उकरून टूजी - थ्रीजी
देशही म्हणाला अण्णांना - 'व्हॉट एन आयडीया सरजी ! '
सरकारला दिसल्या ' हजारे ख्वाहिशे ऐसी '
त्यांच्या नियमांची झाली ऐशी कि तैशी
एक झाले सगळे एकदम
फुस्स झालं शासन बेरहम
लोकपाल विधेयक जिंकून गेलं
लिंबूपाणी घेत उपोषण सोडलं
च्यानेल पेपर्सनी बरंच कमावलं
सिस्टीमनं बेअरींग डेअरींग गमावलं
शांत शांत ...
वाटलं..आता सगळं सुधारलं.. जिण वधारलं
काल स्वप्नात आले बोस,टिळक,आगरकर,सावरकर
विचारलं त्यांना "दादा,खुश ना ? सारं बदललं ना लवकर ?"
खाड्कन मग कानाखाली बसली
वर चार शब्द ऐकवून गेली
"होय बाळा, जरा बदललेलं दिसतंय हे तात्पुरतं,
जसं जेवणात लोणचं तोंडी लावण्यापुरतं
उद्या सर्व पुन्हा 'जैसे थे' होईल
'वो भी क्या दिन थे' म्हणत जिंदगी जाईल
स्वप्नात आलोय म्हणजे तू झोपलाच आहेस
पुढचा अण्णा बसेपर्यंत झोपेतच राहशील "
... ताड्कन उठलो आरशात पाहिलं
मी नाही समाज दिसला
आरती प्रेयर नमाज पाहिला
कुठूनसा मागून आवाज आला,
'जागे व्हा,विचार बदला,देश बदला
नाहीतर सोडा नाद नि सरळ 'देशच बदला'
पुढचा अण्णा आत्ताच अदला - बदला
प्रत्येकाने उठा नि घ्या हक्काने बदला
प्रत्येकाने उठा नि घ्या हक्काने बदला '
ekkk number............
ReplyDeleteThank you RT...........:)
ReplyDelete