Wednesday, 29 June 2011

श्रीगणेशा

ब्लॉग...
मी ब्लॉग सुरु केलाय ...खरंतर  आय एम एकदमच नवीन इंटू धिस बरं का !
सो..नेहमी ..नियमित लिहिनच असंही काही नाही..
पण बाकीचे लिहितात..म्हणून आपणही खरडाव काहीतरी..असंही नाही.
थोडक्यात काय..जेव्हा काही लिहिण्यासारखं असेल..तेव्हाच येथे भर पडेल.
अगेन..जेव्हा जेव्हा काही लिहिण्यासारखं असेल,तेव्हा तेव्हा ते मी इथेच लिहावं असं थोडंच आहे.
इंटरनेटवरून  कोणता शब्द,वाक्य,लेख,कविता कसं कुठे जाईल काही सांगता येते का भाऊ/ताई  (एज अप्लीकेबल  :P)
म्हणून अस्मादिक जरा खबरदारी घेतील एवढंच...
वाचणारे किती असतील माहीत नाही....त्यावर प्रतिक्रिया देणारे तर त्याहून कमी..दिलीच तरीही ''मित्राने लिहिलंय,तर नावं कशी ठेवणार? लिहू - 'छान आहे' म्हणून"...
वगैरे प्रकार होणार नाहीत कशावरून...
मग यातून माझी लेखक म्हणून जडण-घडण सुनिश्चित दिशेने आणि योग्य प्रकारेच होईल हे तरी कशावरून ??
छे !! खूपच प्रश्न बाबा..
जाऊदेच...
काय म्हणालात?
फॉलो करायलाच पाहिजे का?
नाही हो..असा नियम थोडाच असतो...
आपण गांधीवादी नाही..सावरकरवादी आहे म्हटलं.."याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याविना"
ओके...इट्स इनफ ना..तसंपण  आधीच दोन पोस्ट्स 'मार्गी' लावल्यात...आणि मग त्यानंतर  हा 'पहिल्यावहिल्या' पोस्टचा प्रपंच पाहिजेच कशाला? उगीच औपचारिकता...
असो...
चला...आटोपतं घेतो..
इथं काही कागद वाचवणे किंवा शाई वाचवणे हाही हेतू नाही..:P
की-बोर्डवरच्या कीजसुद्धा झिजत भिजत  नाहीत बरं ! (पावसात थोडाच बसलोय,पीजे होता..हसू नका)

भेटत राहूच अधून मधून... 
टेक केअर ...कीप रीडिंग ...कीप रॉकिंग :)






No comments:

Post a Comment