Friday, 1 December 2017

बोस: डेड ऑर अलाइव्ह

'बोस: डेड ऑर अलाइव्ह'  (वेब सिरीज)                                                                                         

'बोस: डेड ऑर अलाइव्ह' ही सिरीज काही दिवसांपूर्वी अल्टबालाजीवर पाहिली. या विषयावर सिरीज येणार म्हटल्यावर उत्सुकता खूप ताणली गेली होती, त्यात राजकुमार रावसारखा मजबूत अभिनेता बोस साकारणार म्हटल्यावर तर ट्रेलरपासूनच वाट पाहत होतो. सिरीजच्या नावातूनच बोस यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानापेक्षा त्यांच्या मृत्यूबाबतचे गूढ उकलण्यास ही मालिका मदत करणारी असेल, त्यावर काहीसा प्रकाश टाकणारी असेल हे स्पष्ट संकेत मिळाले होते. या निमित्ताने काही माहीत नसलेल्या गोष्टी समोर येतील असे वाटले होते. प्रयत्न खरंच चांगला, कौतुकास्पद, पण कथा आणि मांडणीच्या दृष्टीने टू बी फ्रॅंक तितकीशी इम्प्रेसिव्ह वाटली नाही. अनुज धर लिखित 'इंडियाज बिगेस्ट कव्हरअप' या पुस्तकावर आधारित ही मालिका एकता कपूरच्या बालाजी प्रॉडक्शन्सने बनवली आहे. सांस बहू, करवा चौथ छाप मालिका करून मिळवलेला पैसा तिने उशिरा का होईना पण अशा वेगळ्या विषयावरच्या उत्तम सिरीजमध्ये घातला आणि थोडे पुण्य कमवून घेतलेय असं म्हणायला हरकत नाही. एखाद्याच्या मृत्यूबाबतचे भारतातले आजपर्यंतचे हे सर्वात मोठे गूढ.. तसा खूप व्हास्ट विषय पण २२ मिनिटांच्या नऊ भागांत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

ही सिरीज वेबवर येणार असल्याने (जिथे अजूनतरी सेन्सॉरशिप नाहीये) नेताजींच्या मृत्यूबाबत ज्या काही जरा खळबळजनक गोष्टी अलीकडे त्यांच्या फाईल्स रिओपन केल्याने उजेडात आल्या असतील त्यांना स्पर्श होईल असे वाटले होते. पण त्या आघाडीवर काहीसा अपेक्षाभंग होतो. वाद होऊ नये म्हणून घाबरत काही गोष्टींना tangent मारून त्या मुख्य वर्तुळाबाहेरच सोडल्यासारख्या वाटतात. नेताजींना वॉर क्रिमिनल ठरवण्यात नेहरूंनी बजावलेली भूमिका, नेताजींच्या कथित अपघाती मृत्यूनंतर त्यांची जर्मनीतील पत्नी एमिली यांना धमकावण्याचे काँग्रेसचे प्रकार, 'बोस इज नो मोर' या कागदावर सही करण्यासाठी त्यांच्यावर आणलेले प्रेशर वगैरे गोष्टी यात विस्ताराने येत नाहीत, ज्या याच पुस्तकाच्या अनुषंगाने मध्यंतरी विवेक मासिकातल्या एका लेखात वाचल्या होत्या. पण काही सीन्स खरंच उत्तम वठले आहेत. हिटलरशी भेट घेतल्यावर नेताजींनी तोतया हिटलर कसा ओळखला यावर 'A fake Hitler has an image to maintain, Real one does not care' असं नेताजींचं परफेक्ट कमी शब्दात हिटलरचा स्वभाव त्याच्यासमोरच त्याला सांगणारं धाडसी उत्तर, आणि तेथील भारतीय सैनिकांची फौज उभी केल्यावर नेताजींनी झेंडा फडकावून ओरिजिनल बंगाली जन गण मन म्हणणेहे प्रसंग खास

इंग्रज अधिकाऱ्यांचा चमचा असलेला भारतीय शिपाई दरबारीलाल (नवीन कस्तुरीया) याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, त्याच्या आवाजातील निवेदनातून कथा उलगडत जाते. नेताजी या वादळाशी आपली पहिली भेट कशी एका जेलमध्ये झाली हे तो सांगतो. मग काँग्रेसी विचारधारा असताना नेताजींचा इंग्रजानाच 'खादी बेचो' हा प्रकार ब्रिटिशांना कसा चक्रावून जातो हे दिसते. आणि पुढे गांधीजींशी मतभेद झाल्यावर नेताजींचा प्रवास कसा 'खादी ते खाकी' होतो हेही समजते. सुरुवातीच्या काळात जेलमध्ये असताना बोस यांना एक दुसरा कैदीयहां कैसे आये? - कोकेन, ड्रग्ज, नही? तो फिर गांधी?' असं विचारतो, त्यावर तरुण सुभाष म्हणतो - 'गांधीजी'.. यातून त्यांचा गांधींविषयी असलेला आदर दिसतो. विदेशातून आल्यावर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बोस निवडून आल्यावरही बोसांच्या परवानगीशिवाय नेहरूंनी बोलावलेली काँग्रेसची बैठक पाहून संयमित संतापलेले, नेहरूंशी एकेरीत बोलणारे बोस दिसतात. कितीही टॉर्चर केलं तरी कॉन्फिडेन्शियल माहिती फोडणारे आझाद हिंद सेनेचे भक्कम मनोबलाचे सैनिक दिसतात. भारताला स्वतंत्र करण्यासाठी परदेशी सैन्याची मदत घेत चालून येण्याचा विचार करणारे बोस हे देशद्रोही आहेत आणि गरज पडली तर त्यांच्यावर तलवार घेऊन जाणारा पहिला माणूस मी असेन असे शेकडो लोकांसमोर भाषणात बोलणारे 'अहिंसावादी' नेहरू दिसतात. 'आय ऑल्वेज गेट अवे' हा डायलॉग राजकुमार रावच्या तोंडी - वेळा दिलाय. पण बोस त्यांच्याच घरी ते नजरकैदेत असताना वेषांतर करून सुटका कशी करून घेतात हा प्रसंग जरा बालिशच घेतलाय.  'बोस' हे एपिसोड्सच्या शेवटी क्रेडिट्सना लागणारे वेगवान गाणे ऐकायला मस्त.  



त्या कथित विमान अपघातानंतरही बोस संपले यावर अजिबात विश्वास ठेवणारा आणि आणखी इन्व्हेस्टीगेट करत वेळ वाया घालवत बसू नको असे आदेश मिळूनही पर्सनली खरे काय ते खणून काढायचेच म्हणून आपले प्रयत्न सुरु ठेवणारा ऑफिसर स्टॅनली हा एडवर्ड सोनेनब्लिकने मस्त साकारलाय. आपल्या लोकांनी ह्याला फिरंगी म्हणून चांगलाच वापरून घ्यायचं ठरवलेलं दिसतंय. 'इनसाइड एज' या आयपीएलसारख्या स्पर्धेतले फिक्सिंग वगैरे दाखवणाऱ्या अमेझॉन सिरीजमध्येही हा हमिश मॅककॉल या विदेशी क्रिकेटरच्या रूपात दिसतो. कपिल शर्माच्या आगामी 'फिरंगी'मध्येही हा फिरंगीच आहे. 'नीरजा'मध्येही फिरंगीच होता. 'बोस'मध्ये छाप पडून जातो हे नक्की. पण एमिली शेंकेल साकारणारी एना अडोर मात्र अगदीच माठ, किंवा साधारण म्हणू हवं तर, पण उसे कुछ बऱ्यापैकी पण जम्या नही है. शेवटच्या भागात विवाहित म्हणून कपाळावर टिकली लावल्यावर अड़ोरेबल दिसते एवढंच.

आता ही सिरीज आपल्या खांद्यावर ओढून नेलेल्या दोन अवलियांबद्दल थोडंसं... आधी प्रचंड शंका होती, की ह्याsss.. हा बारीक राजकुमार राव बोस कसा वाटेल.. आवराच.. पण दुसऱ्यांना आवरण्याचं कामच हा माणूस आपल्या अभिनयातून कायम करत आलाय. येस, बोस यांच्या भूमिकेतला राजकुमार राव हा हिरा आहेच राव. या रोलसाठी त्याने कष्टाने खास वजन वाढवलं. मेकअपमधून त्याचा चेहरा नेताजींच्या जास्तीत जास्त जवळ जाणारा केलाय. मालिकेच्या  मेकअप आणि आर्ट डिरेक्शन डिपार्टमेंटचे खास कौतुक. राजकुमार हीच काय त्याची प्रत्येक भूमिका त्या त्या वेळी अक्षरश: जगतो. कालच त्याचा 'न्यूटन' पाहिला, जो भारताकडून यावेळी ऑस्करसाठी पाठवला जातोय. काय पो चे आणि क्वीनमधला राजकुमार पाहून हा इतका भारी असेल असं वाटलं नव्हतं किंवा हा पुढे कितपत मजल मारेल याबद्दल शंकाच होती, बरेचदा तोंडातल्या तोंडात जलद बोलल्याने त्याचे काही संवाद नीट पोचत नाहीत. पण 'उडान'चा दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने इतका हुशार की त्याने राजकुमारला फार बोलावेच लागणार नाही असा 'ट्रॅप्ड' हा एक वेगळाच प्रयोग केला, तो जरी मर्यादित प्रमाणात यशस्वी झाला तरी हे नाणं खणखणीत वाजलं. एक माणूस संपर्काची साधने नसणाऱ्या एका ठिकाणी एकटा अडकतो हा प्रकार हॉलिवूडमध्ये खूप हिट होतो (कास्ट अवे, मार्शियन) अशा सिनेमात डायलॉग्ज फार नसतात, तो माणूस जगण्यासाठी काय काय करतो ते 'बघायचं' असतं, पण बडबड्या नाटकावर पोसलेल्या आपल्या प्रेक्षकांना संवादप्रधान सिनेमेच लागतात, अर्थात हळूहळू ही मानसिकता बदलतेय हे चांगलंय. 'अलिगढ'मध्ये मनोज वाजपेयीभोवती फिरणारी स्टोरी असूनही राजकुमारने केलेला सबॅस्टियन पत्रकार तितकाच भाव खाऊन जातो. 'शाहिद' बघायचा बाकी आहे, पण तोही भारीच आहे असं ऐकून आहे. रा रा हे राजमान्य राजेश्रीसाठी लावतात, तसा हा अभिनयात असल्यानेच त्याचे नावाचे इनिशियल रा रा असावे.

दुसरा नवीन कस्तुरीया. याचा दरबारी लाल कसा आहेइंग्रजांसाठी काम करावं लागतंय तर नाईलाजाने करू, आणि त्यातूनच जास्तीत जास्त आपल्या माणसांना जपू अशी होती. त्यांच्याविरोधात उभे ठाकण्याची आपल्यात ताकद नाही ही जाणीव असलेली व्यक्तिरेखा, पण तरीही आपल्या लोकांना किमान आपल्यामुळे फार त्रास होऊ नये असा पवित्रा. ब्रिटिशांचा चमचा, त्याच वेळी बोसांबद्दल वाटणारी काळजी, ते आणखी गोत्यात येऊ नयेत म्हणून त्यांना त्यांच्या हेतूंपासून कधीकधी परावृत्त करायचा प्रयत्न, त्यांचा पाठलाग करतानाचा भोळेपणा वगैरे अभिनयातले सर्व पदर त्याने अलगद उलगडलेत. नवीन हा ताकदीचा कलाकार आहे, त्याला आणखी नवीन नवीन रोल्स मिळाले पाहिजेत. कस्तुरीयाला टीव्हीएफच्या पिचर्समुळे अमाप प्रसिद्धी मिळाली, जितू आणि त्याने एकामागोमाग एक जबरदस्त रोल्स करत टीव्हीएफला कुठल्या कुठे नेऊन ठेवलं. IMDb च्या जागतिक टॉप १०० नव्हे तर टॉप २५० मालिकांमध्येही भारताच्या दोनच आहेत, एक पिचर्स (४०) आणि दुसरी साराभाई (५३).

सिरीजची ट्रीटमेंट आणि लूक जरा स्टायलिश आहे. 'नेताजी को पकडना मुश्किलही नही, नामुमकिन है' हे सांगणाऱ्या पुढील ओळी सिरीजमध्ये बॅकग्राऊंडला ऐकू येत राहतात
Bose…  His actions were faster than thought
Bose…  They’d look for him where he was not
Bose…  Incapable of being caught
Bose…  His lines were sharp and theirs would blot

‘बोस’ म्हणजे फक्त एक स्पीकर कंपनी नाही हे माहीत असणाऱ्या सर्वानी जरूर बघा - 'बोस: डेड ऑर अलाइव्ह' - अल्टबालाजी अँप किंवा वेबसाईटवर.

मी, मोबाईलचोर आणि रात्रीचं वांद्रे स्टेशन

** मी, मोबाईलचोर आणि रात्रीचं वांद्रे स्टेशन **     -  पराग पुजारी

व्वा बघता बघता धडा मिळून आज एक महिना झाला की.. ३० ऑकटोबर २०१७ - ऑफिसहून निघून संध्याकाळी उशिरा एका मीटिंगसाठी एका चॅनेलच्या ऑफिसात गेलो होतो लोअर परेलला, तिथे फार उशीर झाला. मग बाहेर आलो, जेवलो.. रिटर्न ठाण्याला यायला निघालो. लोकल वांद्रे स्टेशनला थांबली.. वेळ रात्री पावणेबारा - बारा.. एका मित्राशी व्हाट्सअँप चॅट करत होतो. विंडो सीटवर होतो, माझ्या सीटवर कुणी नव्हतं बाजूला.. रात्री इतकी उशिराची वेळ, सो डब्यातच फक्त - जण होते. ज्या विंडो सीटवर बसलो होतो त्या माझ्या सीटला मागे लागूनच त्या डब्याचा एन्ट्रन्स होता, आणि मोबाईल मला वाटतं अशा पद्धतीने माझ्या हातात डोळ्यासमोर होता की खिडकीतून बाहेरच्यांना दिसू शकेल. टाईप करत होतो.. तेव्हा आपली पकड जराशी ढिली असते.. (मी मोबाईल एकाच हातात धरून टाईप करतो, दोन्ही हातात मोबाईल धरून टाईप करायची सवय नाही) आय गेस, इनफ वातावरण निर्मिती झालीये.. आता मुद्द्याला हात घालत मुख्य घटनेकडे येतो.. (नंबर का बदलला या प्रश्नावर दोघा-तिघांना हे संदर्भासहित स्पष्टीकरण सांगावं लागलेलं तसं.. पण इतरांसाठी हे नवीन..)

तर लोकल जस्ट सुरु झाली इतक्यात माझ्या हातातला मोबाईल मागून जोरात हिसकावला गेला. काय झालं ते लगेच कळून मी 'sss' म्हणून जोरात ओरडलो, तो तेवढ्यात पळत उडी मारून बाहेरही पडला होता.. पण लांब पायांचा पुरेपूर उपयोग करून घेत मी अडीचतीन ढांगात ती सीट पार करून वळून येत तेवढे अंतर पार केले आणि त्याच्या पाठोपाठ उडी मारत बाहेर पडलो. गाडी एव्हाना बऱ्यापैकी वेगात सुरु झालेली जाणवली नव्हती, त्या फोर्समुळे आणि वळून उलट्या दिशेने बाहेर पडल्याने दोघेही प्लॅटफॉर्मवर जोरात पडलो. मी त्याच्यापुढे काही अंतरावर पडलो.. माझा चष्मा पुढे काही फुटांवर उडून पडला.. तरी तो पुढे पळत गेला असता तर त्याचा पाय धरून त्याला पकडू शकलो असतोच. पण लगेच चार-पाच जण आले, मला चष्मा उचलून दिला, 'भाईसाब आपका चष्मा गिर गया, आप ठीक तो है, लगा तो नहीं' वगैरे सुरु झालं. त्यांच्या थोबडयावरूनच ओळखलं की हे त्याचेच साथीदार आहेत आणि त्याला मागच्या मागे पळून जायला मदत व्हावी म्हणून मला बोलण्यात गुंतवून ठेवायला आलेत. 'मैं ठीक हूं, तुम उन्हीमेसे हो, उसको ढुंढो वो कहां गया'... 'अरे क्या साब आप भी, हमने तो आपको चष्मा उठाके दिया, आपको मदद की' वगैरे.. अर्थात तेवढ्यात तो चोर अपेक्षेप्रमाणे पळून गेला. अशावेळी नेहमीप्रमाणे काही बघे असतात ते होतेच, ते प्रसंग बघून एन्जॉय करून घरी गेले. नंतर एक हिंदी भाषक माझ्याच वयाचा मुलगा आला मदतीला, माझी विचारपूस केली. आता पहिली गोष्ट माझं सिमकार्ड ब्लॉक करायचं होतं, त्यासाठी त्याने त्याचा फोन दिला कॉल करायला. अशावेळी कस्टमर केअरला फोन लागेल ते एअरटेल कसले.. मग त्याच्या फोनवरून रूममेटला फोन करून सांगितलं कार्ड ब्लॉक कर, ते त्यानं केलं (रूममेटचा नंबर इमर्जन्सीसाठी माझ्याकडच्या ऑफिसकार्डवर होता.) त्या अनोळखी मुलाचे अनेक आभार.. माणुसकी आहे.. सचित झा नाव त्याचं, चंदीगड. त्याने त्याचेही असे काही अनुभव सांगितले चंदीगड शहरातले, बेंगलोर एअरपोर्टवरचे वगैरे. अशावेळी असं काही ऐकताना थोडक्यात आपण एकटेच उल्लू नाही बनत ही जाणीव उभारी देणारी असते कदाचित. आमच्या ऑफिसातल्याही एकाचा मोबाईल असाच पण लोकलच्या गर्दीत मारला गेला होता, एकीचा तर कानाला लावलेला - फोनवर बोलत असताना गेलाय.

एव्हाना लक्षात आलं होतं की आता ती सगळी टोळीच पसार झालीये (नाव माझं पराग आणि परागंदा हे होतात, नॉन्सेन्स) आणि आपल्या पायात चप्पल नाहीये, जोरात आपटलो तेव्हा ती बिचारीही पायातून साथ सोडून गेली होती. मग सरफरोशमधल्या अमीर खानप्रमाणे जरा आठवून पाहिलं तर ती त्या प्लॅटफॉर्मवरच पडलेली असायला हवी होती, मग जिथे आम्ही पडलो तिथे पाहिलं. काही खुणा, ओरखडे दिसले, पण चप्पल नाही.. खाली ट्रॅकवरही नाही.. त्यांनी तीही पळवली.. किती चिंधीचोर असावं माणसांनी. मग पुढच्या लोकलने मिलिंद सोमणसारखा अनवाणी जात दादर, तिथून ठाणे, मग रिक्षा पकडून रूमवर असा दीड वाजता पोचलो. रूममेटचा फोन घेऊन आधी फेसबुक आणि जीमेलचा पासवर्ड चेंज केला. कारण फोनला स्क्रीनलॉक असलं तरी चोरला गेला तेव्हा तो चालू स्थितीत होता, सो अशी उच्च प्रतीची छपरी पोरं आपल्या काँटॅक्ट्समधल्या मुलींना नाही ते फोटो, व्हिडीओ नेटवरून घेऊन पाठवणे, अश्लील मेसेज करणे, नको तिथे कुणाला टॅग करणे असे उद्योग करू शकतात हे आपण पाहतो, वाचतोच. रूममेटने नंबर ब्लॉक करण्याआधी माझ्या नंबरवर कॉल केला होता, तेव्हा रिंग झाली म्हणाला, म्हणजे त्या चोरांनी काही लगेच तो स्विचऑफ केला नव्हता. पुन्हा लगेच कॉल केल्यावर मात्र स्विचऑफ आला. नंबर बदलला आता माझ्या नंबरचं सर्कल महाराष्ट्र सर्कल - ते मुंबईपेक्षा वेगळं म्हणून एअरटेल गॅलरीत चकरा मारून उपयोग झाला नाही, मुंबईबाहेरच्या एरटेल गॅलरीत करावं लागेल म्हणे (हे त्या गॅलरीत मला तिसऱ्या खेपेत सांगितलं गेलं).. कस्टमर केअरकडूनही काही होत नाहीये.  

अंडरकरंट: त्या मुलाने - सचितने तरी त्यातूनही काही पॉझिटिव्ह काढून मला सांगितलं की 'चलो भाई, फिर भी ठीक है.. सिर्फ मोबाईलही तो गया.. क्योंकी मैने उपरसे उतरते वक्त देखा तुम चिल्लाये, फिर बाहर आके दोनो गिरे.. लेकिन तुम जहां गिरे वहांसे एक दो इंचसे ट्रेन गयी.. तो सोचो. और उसको तुमने ऑलमोस्ट पकडा था वोभी देखा, लेकिन पकड भी लेते तो क्या होता.. इनके पास तो ब्लेड, चाकू कुछ ना कुछ रहताही है ऐसे वक्तपर यूज करने के लिये.. वो तुम्हे गलेपे, हाथपे मारते और भाग जाते.. हमें तो दस सेकंड्स के बाद वो सेन्सेशन होता है खून आने के बाद.' हे ऐकून चक्रावलो. हे असं होईलच असं नाही, पण ती पोरं पाहता असं काही असेलही त्यांच्याकडे.. पण डोकं ट्रेनपासून थोडक्यात बचावलं हे मात्र खरं होतं, तिथल्या अजूनही एकाने सांगितलं हे मला आणि मीही ती जागा, ते मार्क्स पाहिल्यावर जाणवलं.

पुढची ट्रेन इतक्यात नव्हती, डावा गुडघा जरासा डिसलोकेट झाल्यासारखा वाटत होता, लंगडत चालताना मग कळा येऊ लागल्या. तिथल्याच बेंचवर बसलो. सचित तरी मी काही खाल्लंय का विचारत होता, चहा कॉफी तरी घे म्हणत होता.. मीच दोघांसाठी तिथे कॉफी घेतली. मग एक पोलीस तिकडून येताना दिसला, त्याला सांगितलं. त्यावर 'प्लॅटफॉर्म नंबर एकवर चौकी आहे, उद्या येऊन कम्प्लेंट करा.. IMEI नंबर घेऊन या' असं तो ढिम्मपणे म्हणाला आणि गेला.. आणि लोक धोनीला निर्विकार म्हणतात

डाव्या अंगावर पडलो होतो. रक्त जरासंच आलं (आहेच किती अंगात!), दोन चार किरकोळ जखमा झाल्या.. पण पाय, गुडघे, कंबर, हाताला मुका मार जबर लागला होता. रूमवर जाऊन स्प्रे मारला, पण पुढे - दिवसात पाय टम्म सुजला. डावं पाऊल लोक रग्बीचा बॉल म्हणून काढून नेतील इतका सुजला. तसाच पुढे ऑफिसला जात राहिल्याने - तेही आता बूट घालून - पाय अजून आवळला गेला, प्लस लोकलमध्ये सर्वांगाला मजबूत मसाज असतोच, आपण माणूस आहोत की ताक घुसळायची रवी काही कळत नाही. घराशेजारी राहणारी लहान पोरं चित्रं रंगवताना काळा निळा रंग हवा असेल तर माझ्या पावलावर ब्रश फिरवून नेतील असं वाटायला लागलं. मलमफिलम लावून उपयोग होईना. मग इंजेक्शन गोळ्या घेऊन आणि डॉक्टरांनी सांगितल्यानुसार पायाला अँकल लावून झोपणे वगैरे उपाय करून हळूहळू बरा झालो. त्याना फ्रॅक्चरची शंका होती, गरज पडलायस एक्सरे काढू म्हणाले, पण ती वेळ आली नाही.

मोबाईल गेल्याचं फार काही नाही, काँटॅक्ट्स काय जीमेलला सिंक असतात ते मिळालेच परत.. पण जरासं दुःख म्हणजे नोट्समध्ये काही लिखाण, काही स्क्रिप्ट्सचे पॉईंट्स वगैरे होते, असो.. बराचसा बॅकअप होताच ड्राइव्ह किंवा ड्राफ्ट्समध्ये सेव्ह केलेला. मोबाईल महागडा मी कधीच घेत नाही. दोन वर्षात पाच हजार पूर्ण वसूल झाले होते आणि आताशा स्क्रॅचेसही पडलेले. या निमित्ताने नवीन घेतला साधारण त्याच किमतीचा.. (पण नवीन घ्यायचा म्हणून वांद्रे स्टेशनवर रात्री बाराला जाऊ नका).. तो मोबाईल विकून त्यांना असे कितीसे मिळणार असं म्हणालो तेव्हा सचित म्हणाला, 'ऐसे लोगों को क्या फरक पडता है भाई, साले ड्रग्ज वग्ज  करते रहते है, सौ दोसौ रुपये भी मिलजाये तो बहोत होते है इनके लिये, ऐसेही पैसा जमा करते है'.. (पेहरावावरून, बोलण्यावरून समजत होतं की ती टोळी शांतताप्रिय धर्माची होती, १८-२० वर्षांची पोरं.. त्या भागात जोरात करियर करत कार्यरत आहेत म्हणे यांच्या व्यसनी टोळ्या, पोलिसानेही आधी तेच विचारून कन्फर्म करून घेतलं) आणि या नॉर्थच्या सचितला तर त्यांच्याबद्दल विशेष राग.. त्यावर तो जे जे बोलला ते जाऊदे, पण वांद्रे स्टेशनच्या परिसरात रात्रीच्या वेळी सतर्क रहा इतकंच.

असो.. जे झालं ते काही फार अडव्हेंचर वगैरे नाही की मला लगेच 'खतरों के खिलाडी' मध्ये बोलावतील. इतकी मोठी पोस्ट फक्त यासाठी की तात्पर्य म्हणून काय खबरदारी घ्याल ते सांगावं:
* रात्रीच्या वेळी मागे एंट्रन्स असेल अशा सीटवर शक्यतो बसू नका, अर्थात डब्याच्या एंट्रीला पाठमोरे बसणे टाळा. ट्रेन असो वा बस.. एन्ट्रीजवळ बसलेला असाल तर एक्स्ट्रा सावधान रहा.
* शर्टच्या खिशात मोबाईल, पैसे वगैरे ठेवून ट्रेनमध्ये झोपू नका, लोकल थांबली की आत येऊन बिनधास्त वरच्या वर पळवून नेतात (परवाच अशी बातमीही वाचली मटाला)
* मुलींनी विशेष काळजी घ्यावी - तुमची ओढणी, केस वगैरे मागच्या मागे त्या ग्रिलला आवळतील आणि हातातून वस्तू, गळ्यातून चेन काढून नेतील.. (लेडीज डब्यात एक पोलीस असतो तसा पण तरीही काळजी घ्या, पोलीस असतानाही काय काय होतं ते आपण वाचतोच)
* आजकाल स्क्रीनलॉक असतंच.. पण जीमेल, फेसबुक, फोटो गॅलरी, यूट्यूब, व्हॉट्सअप, महत्त्वाची अँप्स, डॉक्युमेंट्सनाही लॉक ठेवा - किमान अशावेळी प्रवास करताना तरी.
* खिडकीतून मोबाईल किंवा कोणतीही किमती चीज बाहेरच्यांना दिसू देऊ नका. ही नको त्यात 'मेक इन इंडिया' करणारी टोळकी आधी निरीक्षण करतात आणि अगदी गाडी सुटताना येऊन हिसकावून नेतात, वयस्क असाल किंवा तुमच्या मूव्हमेंट्स फास्ट नसतील तर तुम्ही पटकन बाहेरही येऊ शकत नाही. बाहेर आलात तरी साथीदार असतातच त्यांचे, वेगाने पडणे वा लागणे हे त्यांनी गृहीतच धरलेले असते, आपण नाही. सनी देओल असाल तर नुसता पाय आपटूनही ट्रेन थांबवू शकता आणि मग त्या चोरांना पिळून वाळत घालू शकता, पण आपण सामान्य असतो.

येस,धडा मिळून आज एक महिना झालाय. मुंबईत साडेपाच वर्षं राहतोय, पण असा झटका पहिल्यांदाच बसला.. बट व्हॉटेव्हर - आय स्टील लव्ह मुंबई.. यू नो - ऐसे बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें. . .
चला वाटल्यास शेअर करा.. अवेअरनेस वाढावा इतकाच हेतू.. बी सेफ.