Thursday, 31 December 2015

कसं सांगू पाडगावकर

** कसं सांगू पाडगावकर **

तुम्हीच ना हो सतत शिकवलंत      
खडतर काळातही आनंदानं कसं जगावं
तुम्हीच ना हो सतत दाखवलंत
दु:खातही कसं सुख शोधावं
या जन्माची या जगण्याची ओळखही करून दिलीत
आता डाव अर्ध्यावरती सोडून गेलात
कसं सांगू तुम्हाला आमचं काय गेलं

तुम्हीच ना हो भिंगापल्याडच्या जगाला लाजून हसवलंत
तुम्हीच ना हो भोलानाथाला हवामान अंदाज ऑफिसात चिकटवलंत
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं हेही सांगितलंत
आता आम्ही सलाम तरी कुणाला करायचा
कसं सांगू तुम्हाला आमचं काय गेलं

तुम्ही असता तर झाले असते आहेत याहून शब्द हे हसरे
तुम्ही असता तर रडले नसते शुक्रतारे अन् मंद ते वारे
अजून रंगली असती बोलगाणी अन् वात्रटिकाही
आता तुम्हाला निरोप तरी कसा द्यायचा कण्हत कण्हत की हसत हसत
कसं सांगू तुम्हाला आमचं काय गेलं

इतकं दिलंत इतकं दिलंत इतकं दिलंत तुम्ही आम्हाला
खरं सांगतो माणूस केलंत तुम्ही आम्हाला
कसं सांगू तुम्हाला आमचं काय गेलं
कसं सांगू तुम्हाला आमचं काय गेलं



श्री श्री सलमान खान निर्दोष सुटल्यावर

श्री श्री सलमान खान निर्दोष सुटलेच शेवटी. आहे, देव अल्ला कोण म्हणाल तो आहे हे नक्की. पण फार उलटसुलट प्रतिक्रिया येतायत यावर. अर्थात एक मात्र खरं, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कायच्या काय दृढ व्हायला या निकालाने मदतच झाली असे म्हणावे लागेल. मुळातच ह्या परोपकारी सोज्वळ अशा बीइंग ह्युमन टाइप व्यक्तिमत्वावर 'सदोष मनुष्यवध' असा काही हिणकस आरोप होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतंच, अहो खरंच, काळविटाची शप्पथ!! उगाच बिचाऱ्या खानसाहेबाना तब्बल तेरा वर्ष मन:स्ताप दिला राव. असं कुठं आसतं का? आजचा कोर्टाचा हा निर्णय योग्य सहिष्णू असाच आहे. पण ज्यांनी ही तक्रार नोंदवली होती, त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर कमालच दिसतो बाकी. म्हणे सलमान दारू पिऊन गाडी वेगात चालवत आला आणि ह्याला चिरडल, बाकी तिघेचौघे जखमी वगैरे सिनारिओ क्रिएट केला.

पहिली गोष्ट, मुळातच सलमान आणि दारू हे विरुद्धार्थी शब्द आहेत, पहा त्याचे पाणीदार डोळे आणि सतेज कांती याचा पुरावा आहेत. त्यामुळे तो दारू पिऊन गाडी चालवणं शक्यच नाही. तरी समजा कुणी त्याच्या नकळत त्याला त्याच्या नेहमीच्या ताकातून पाजलीच असेल तरी चूक त्या झोपलेल्या बेकरी  कामगारांचीच आहे. म्हणे आम्ही फुटपाथवर झोपलो होतो. अरे फुटपाथ ही चालण्याची जागा आहे लेको, झोपण्याची नाही. आता ते टिपिकल संत सलमानविरोधक म्हणतील की मग ती काय कार चालवायची जागा आहे काय.. अरे बाळानो, फार तर काय, गाडीची चाकंच तर गेली असतील ना त्या फुटपाथवरून, जाऊदेत की मग, आमचं लॉजिक असं सांगत की चाकं म्हणजे गाडीचे पायच असतात आणि फुटपाथ हा पायांसाठीच असतो, नाही का? पण तुम्ही तर अख्खेच्या अख्खे तुमचे भुईला भार असे देह आडवे तिडवे कसेही पसरून अस्ताव्यस्तपणे झोपला होतात तिथे, त्याचं काय. नॉनसेन्स.. अजागळ कुठले.. सलमानदादा, सॉरी, सलमानभाई या देशाचे सुजाण आणि जागरूक टाइप नागरिक आहेत, ते कर वगैरे भरतात, ज्यातून तो रस्ता आणि फुटपाथ तयार झाला होता. तुम्ही भरता का कर..आयतोबे, फुकटे लेकाचे. तेही सोडा, कदाचित तुम्ही तिथे झोपला नसालच. राईट, या देशात माणसाना ताशी १२०-१४० किमी वेगाने पळत पळत येऊन गाडीखाली आत्महत्या करण्याच्या स्टाईलपासून परावृत्त केले पाहिजे, नव्हे ही आता काळाचीच गरज होय. असे पळत येऊन लॅन्ड क्रूझरसारख्या आलिशान गाडीला धडक देतात म्हणजे काय.. उगाच त्या महागड्या गाडीचे नुकसान. फारच शेफारलेत लेकाचे. वर त्या देवमाणसावर खटलाही दाखल करतात.. वा रे वा.. बहोत खूब, तुमच्या चुकीची शिक्षा त्याला का म्हणून. चुकीला माफी नाही. 

त्याचे लग्न कधी होणार हा गेली कित्येक वर्षे राष्ट्रीय प्रश्न आहे, म्हणजेच तो स्वत: एक राष्ट्रीय संपत्ती आहे. वेगाने पळत येऊन धडक देत स्वत:च्या तसेच दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करणे हे चार्जेस लावून त्यांच्यावरच खटला चालवला पाहिजे. तुमच्या फडतूस जीवाची किंमत एका सुपरस्टारची तेरा मन:स्तापाची वर्षे कशी असू शकते? इतकी वर्षे ही टांगती तलवार (केस विरळ होत चाललेल्या) डोक्यावर राहिल्याने एका निष्पाप स्त्री जीवाचं आयुष्य का आपल्याबरोबर फरपटत न्या असा उदात्त विचार करून त्या सद्गृहस्थाने आजवर लग्नही केले नाही आणि आपले कौमार्यही जपले. होय, त्याची व्हर्जीनिटी अजून अबाधित आहे असे आम्ही या या कानांनी ऐकले, जेव्हा जोहरांच्या करणला त्याने डोळ्यात डोळे घालून ते उत्तर दिले. कित्ती निरागस! बोला, त्याच्या या नुकसानाला जबाबदार कोण? अरे त्याचे बाकीचे दोन स्पर्धक आणि वादापासून सतत दूर राहणारे खान सरोगसी वगैरे करून मल्टीपलवेळा अब्बूजान होतायत, मग यालाही वाटत असेलच ना की १२५ कोटींच्या या लाजाळू देशात आपलेही काही कॉनट्रीब्युशन असावे, पण लक्षात कॉन घेतो? 

चला हेही जाउद्या, पण ते जंगल.. तिथे ते हम साथ साथ है म्हणत भटकणारे काळविटस.. हां तेच तेच बेशिस्त वेडीवाकडी शिंगंवाले, त्या मूर्ख काळविटांचही तेच.. बेवडी कुठली. आला आयुष्याचा कंटाळा म्हणून पळवली बिचाऱ्याची बंदूक आणि त्याचे फिंगरप्रिंट्स तसेच ठेवून हुशारीने स्वत:च्याच शिंगाने गोळी झाडून घेतली स्वत:वर.. कपटी कुठले.. आणि दोष ह्याच्यावर, केस ह्याच्यावर.. कुठं फेडाल हे पाप क्रूर काळविटानो, तुम्हाला काही लाज. तुमच्या दारूच्या व्यसनापायी तुम्ही कर्जबाजारी झालात आणि सुटका म्हणून हा मार्ग अवलंबलात हे सरळ सत्य आता सलमानने कितीही टाहो फोडून सांगितले तरी या देशातील असहिष्णू जनतेला खरे वाटेल काय? ते काही नाही, त्या निरुपयोगी आणि वेड्यावाकड्या शिंगधारी काळवीट जमातीवर बंदी आलीच पाहिजे, किमान त्या संबंधित काळविटाच्या वारसांवर तरी खटला दाखल व्हायलाच हवा. काही ना काही कडक शिक्षा किंवा कठोर कारवाई व्हायलाच हवी. फार लाड चाललेत हल्ली प्राणी लोकांचे.


राहता राहिला त्या ड्रायव्हर रवींद्र पाटीलचा प्रश्न.. म्हणे त्याच्या आत्म्याला काय वाटत असेल. अरे तुला सांगितलंच कुणी होत अशा ऑटो ड्रिव्हन गाडीत बसायला? टेक्नोलॉजी कळत नाही आणि बसला लगेच गाडीत. हो, गाडी जर सलमान चालवत नव्हता तर ती आपोआपच धावत असणार त्या रात्री, तसच मेकेनिझम होतं त्या गाडीचं. तुझी साक्ष ग्राह्य धरली गेली नाही म्हणून तुझे काही पाठीराखे गळे  काढतायत, उद्या तुझ्या आत्म्याला प्लांचेटवरही बोलवायला कमी करणार नाहीत हे लोक.. पण तू काही दाभोलकर नाहीस ना तुझ्या मृत्युमागच सत्य शोधायला प्लांचेट वगैरे अत्याधुनिक एक्युरेट मेथड्स अमलात आणायला.

असो, या पर्टीक्युलर निर्णयामुळे कुणाच्या मनात 'सल' तसाच राहिला असेल, तर कुठे कुणाचा 'मान' वाढला असेल. पण न्यायव्यवस्थेचा विजय असो. 



   

भेसाळीभेट

भेसाळीभेट                                                                                       
                         
गोष्ट फार जुनी नाही, अगदी परवापरवाचीच म्हणजे दोन लेखक प्रसिद्ध निर्मातेदिग्दर्शक भेसाळीना भेटायला गेले तेव्हाची गोष्ट…
लेखक नमस्कार सरआम्ही सिनेमासाठी एक कथा घेऊन आलो होतो आपल्याकडेआठवतंय ना?
भेसाळीकोणती कथामाझ्याकडे रोज पन्नास कथा येत असतात.
लेखक  : असतील सरपण आमची कथा एका खूप मोठ्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वावर आधारित होतीखूप अभ्यास करून आम्ही ती लिहिलीयतुम्ही वाचलीत का ती?
भेसाळीअसेलपण अशा टाईपच्या ज्या कथा माझ्याकडे येतातत्यातल्या ज्यांच्यावर सिनेमेटिक लिबर्टी घेता येईल अशाच कथांचा मी विचार करतो.              
लेखक पण अशी लिबर्टी घेताना तुम्हाला कायच्या काय दिसतं सरत्याचं कायमहाभारतातल्या ‘संजयाच्या’ दिव्यदृष्टीलाही मागे टाकेल अशी तुमची सिनेमेटिक दिव्य दृष्टी काय काय ‘लीला’ घडवेल सांगता येत नाहीआणि काय म्हणालात सरतुम्ही विचार करता?
भेसाळीहोम्हणजे असं  दाखवावं तरी लागतं.. हे क्षेत्रच असं आहे ना.. म्हणजे समहाऊ तुम्ही विचारवंत आहात असं एकदा लोकांना पटलं की भाव वधारतो तुमचाअसोकथा कोणती होती?
लेखक  : क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज गोब्राह्मण प्रतिपालक राजाधिराज छत्रपति श्री शिवाजी महाराज यांच्यावरची होती
भेसाळीअरे बाबाएक कोणती तरी सांगही कितीजणांची नावे घेतोस एकदम.. एक कोणतं तरी व्यक्तिमत्त्व निवड आणि सांगएवढे शब्द कशाला?
लेखक  : सर ही एकच व्यक्ती आहेआणि शब्द म्हणाल तरकितीही शब्द वापरले तरी ते त्यात मावत नाहीतत्यांचं कर्तृत्वच तसं आहे.. (अभिमानाने ) शिवाजी महाराज !!
भेसाळीअच्छा.. सिवाजी
दोघे लेखक: (अभिमानाने मोठ्या खणखणीत आवाजातशिवाजी
भेसाळीहां तेच ते.. शिवाजीओकेहां आठवलं.  सी.. मी  कथा वाचलीपण फार flat जातेय रे ती.  ड्रामा नाही आणि काही भव्यदिव्यझगमगते मोठे सेट्स दाखवायला स्कोप नाही फारसा
लेखक  : सरराज्याभिषेक आहे ना शेवटी
भेसाळीतीच तर गोची आहेतो शेवटी आहे ना.. हां सुरुवातीला तो दाखवून flashback चा एक पर्याय आहे तसापण ते जरा ऑड वाटतंयमलाच खटकतंय.
लेखक  : अरे वा सरतुम्हालाही काही गोष्टी ऑड वाटतातखटकतात?
भेसाळीम्हणजे काय मित्रा.. या सिनेसृष्टीतला एक संवेदनशील का काय म्हणतात तसला दिग्दर्शक आहे मीआणि हम दिल दे चुके सनमदेवदासने बक्कळ पैसा मिळवून दिला म्हणून आता निर्माताही आहे मीमाझ्यातला निर्माता तर डबल संवेदनशील आहे यू नो...
लेखक  : हो तर सरतुम्ही तर संवेदनशीलतेचे आजवरचे सारे निकषव्याख्यामापदंड बदलूनच टाकलेततसं कर्तृत्वच आहे तुमचं.. हे कोण नाकारेल?
भेसाळीओहअरे ऑकवर्ड होतंयकिती कौतुक करशील..
लेखक  : (चमकूनकौतुकमीकधी?
भेसाळीअरे तू आत्ता ते.. जाऊदे तू पडलास लेखक.. मदहोश प्रतिभाशाली असता तुम्ही लेखक लोक.. सहज सुंदर कौतुक करून जाता आणि विसरून जातागुड.. असोतर मी काय म्हणतो.. तुमची कथा तशी चांगली आहे..पण..
लेखक  : 'आमचीकथासर तो इतिहास आहे.
भेसाळीव्होटेव्हर.. सिनेमाच्या भाषेत बोलत असतो मी नेहमीकळलंतर ऐकसिनेमा करण्याच्या दृष्टीने कथेत काही मायनर बदल करावे लागतील.
लेखक  : सर तुमचे मायनर बदल म्हणजे मेजर शब्द फिका पडेल असे असतात.. असं  मी नाही पण कित्येक जण म्हणतातसो असं ऐकून आहेम्हणजे असं बघाड्रामारोमान्सएक्शनहॉररसस्पेन्स थ्रिलरकॉमेडी वगैरे जोनर्स असतात सिनेमांचे हे सर्वाना माहीत आहेचपण बाजीराव मस्तानीमधले बरेच प्रसंग हास्यास्पद ठरल्याने तुम्ही त्याद्वारे 'हॉरिबल हिस्टोरिक कॉमेडीहा एक नवीनच जोनर आणलाय असंही काहींचं मत आहे.
भेसाळीआपण लक्ष नाही रे द्यायचं.. जे म्हणतात त्यांना काही कळतं का सिनेमातलंआपण पिक्चर बनवायचापैसा कमवायचाइतिहास काय लोकांना शाळेत इतिहासाची पुस्तकंबिस्तकं वाचूनपण कळलेला असतोच कीमग आपण तेच बोरिंग काय सांगायचं पुन्हा.. जरा रंजक करून दाखवायला नकोअरे माउली बालनबाई काय म्हणतातफिल्मे सिर्फ तीन चीजो की वजह से चलती हैएन्टरटेनमेंटएन्टरटेनमेंट आणि तिसरं काय बरं तेविसरलो बघ
लेखक  : ते असू दे सर काहीही..पण मूळ इतिहासात बदल म्हणजे..
भेसाळीअरे घाबरू नकोस.. फार काही नाहीपण लोकांना समजेल असं आजच्या कालानुरूप.. म्हणजे असं बघ.. अं हांविशाळगडावर पोचल्यावर तोफांचा आवाजऐवजी आपण बाजीप्रभुना शिवाजींनी व्होट्सअपवर पिंग केलं असं  दाखवूयाशिवाजी महाराजअफझल खान भेटीवेळी आधी त्यांनी भांगडा केला असं दाखवूराजांबरोबर आलेल्या जिवा महालाने आधी पाहुण्यांना प्रतापगडाची सविस्तर माहिती दिली आणि सय्यद बंडा आणि अफझल खान ती नीट लक्षपूर्वक ऐकताहेत असं  दाखवू.. शामियाना भव्यदिव्य उभा करूतो साधा शामियाना वाटता कामा नयेअरे काही झाल तरी तिथे अफझल वध ही ऐतिहासिक घटना आपण घडवायची आहे.
लेखक  : ऐतिहासिक घटना 'आपण घडवायचीआहेआणि जिवा महाला काही टूरीस्ट गाईड नव्हता सर
भेसाळीनसूदे रेपण प्रेक्षकानाही गडाची माहिती कळली पाहिजे की नाहीसिनेमा बघून त्या निमित्ताने गडावर टूरिझम वाढलं तर... कर विचार.. बिझनेस माइंडेड रहावं लागतं रेते पर्सेंटच मी बोलून घेईन मग त्यांच्याशीमग काय.. आणि तो शामियान्याचा सेट कसा भारी आलिशान करून घ्यायचा ते तू माझ्यावर सोडमस्त ब्रांडेड पडदेगाद्या वगैरे वापरू.  बाय  वेयात कुठेच गाण्याला जागा मिळत नाहीये.
लेखक  : एखादं स्फूर्तीगीतशौर्यगीत करू ना थीम सॉंग म्हणून..
भेसाळीतसं नव्हे रेम्हणजे तेही 'जमलं तरघेऊचपण मुख्य म्हणजे काही रोमेंटिकआणि त्याहूनही मुख्य म्हणजे डान्सला वावच्या वाव देणारी गाणी हवीत आपल्यालाकाय समजलासमला एक सांगातुमच्या मतेराजांना एकूण बायका किती होत्या?
लेखक  : मतेती काय त्यांची जन्मतारीख आहे का.. वेगवेगळी मते देऊन - तारखा ठरवायला?
भेसाळीअरेच्चा हो की रेभारी मुद्दा काढलास बघतुम्हाला काय वाटत आपण त्यांचा जन्म तिथीनुसारवाल्या तारखेचा दाखवायचा की सरकार दरबारी असलेल्या तारखेप्रमाणे?
लेखक  : जी खरी आहे ती..
भेसाळीअरे आता ते कोण ठरवत बसणार खरी आणि खोटी.. ते आपणच ठरवायचंआपण सिनेमा करतोय तर तेही आपल्याच हातात असत वेड्या
लेखक  : (झटका बसतोकायशिवाजी कधी जन्मले हे दाखवण?
भेसाळीअर्थात.. ते ठरवू आपणआमच्या न्यूमरोलोजीस्टशी बोलून घेतो मीसिनेमा हिट होण्यासाठी कोणती बर्थडेट सुटेबल आहे ते विचारून घेतो.
लेखक  : पण त्यांनी दोन्हीपैकी कोणतीच योग्य नाही असं सांगितलं तर?
भेसाळीतर काय गुरुजी सांगतील ती डेट ठरवू..
लेखक  : (चमकूनकाय?
भेसाळीमक्कायअरे मी भेसाळी आहे विसरलास.. एवढी भेसळ चालते माझ्या प्रोडक्टमध्ये..
लेखक  : प्रोडक्टअहो पण दोन तारखा ऑलरेडी असताना आणखी एक म्हणजे आणखी गोंधळ होईल अशी भीती वाटतीये मलाप्रोडक्टची एक्सपायरी डेट सिनेमा रिलीजआय मीन प्रोडक्ट लॉंन्च  होण्याआधीच आणतील मग..
भेसाळीकसं होणार रे तुमचं असं घाबरत बसलात तरलेखकान कस बिनधास्त असलं पाहिजेआणि मी तर दिग्दर्शक आहेसिनेमे बनवतोमग तेवढी सिनेमेटीक लिबर्टी घेतली तर काय बिघडलं?
लेखक  : (वैतागूनघेतलीय का तुम्ही?
भेसाळीखूपदाअरे देवदासमध्ये मी पारो आणि चंद्र्मुखीला एकत्र नाचवलंलिबर्टी कायखूपदा घेतलीय मी.
लेखक  : नाही ते म्हणालो नाही मी.. घेतलीय का विचारलअसे काय काहीही बरळताय.. आय मीन बोलताय?
भेसाळीहा हा हागुड जोक. (युरेका युरेका आनंदानेअरे ऐकआयडिया.. असं  करू.. ते महापुरुष होते म्हणून दोनदा जन्मले असं  दाखवू.. काय म्हणतोसगोंधळ वगैरे करून घेऊ नकोस रे मित्राचारशे वर्षे झाली लोकांचा अजून गोंधळ आहेच ना -या तारखेबद्दलमग आपण अजून थोडा वाढवला तर काय बिघडलंविचार करावा लागेल जरा याबद्दलपण एवढा वेळ नाही रेस्क्रिप्ट लेव्हलला एवढा वेळ घालवत बसलो तर सेट डिझाईन आणि कोरिओग्राफर्स मीटिंग कधी करू मीमाझ्या सिनेमासाठी ती सर्वात महत्त्वाची कामे असतात राजाकथाबिथा काय होत राहील आपण करू तशी
लेखक  : आपण करू तशीम्हणजे ? अहो फिक्शन असेल तर ते ठीक आहेपण नॉन फिक्शन सब्जेक्ट असताना..
भेसाळीबाजीरावाला केलाच ना मी फिक्शनआणखी जरा जोर लावला तर शिवाजी पण जमेलते टेन्शन तुम्ही घेऊ नका रेतुम्ही फक्त नाच गाणी आणि मोठमोठे भव्यदिव्य सेट्स यांना फुल स्कोप राहील अशी स्क्रिप्ट लिहा.. बास.
लेखक  : अशी स्क्रिप्टपण सरआपल्याला महाराजांच्या लढायाकिल्ले वगैरे दाखवाव लागेलकिमान ते किल्ले तरी ओबडधोबड असतील ना सिनेमातखरे किल्ले तर तुम्ही आधीच नको म्हणताय.. मग सेट्स?
भेसाळीमक्काय.. अरे नुसतेच ते किल्लेदगडधोंडेवाळकं गवत दाखवून पिक्चर होतो होय माझा कधी.. काही भरजरी श्रीमंती थाटमाट नको काय?
लेखक  : सर पणत्या काळात दुष्काळ वगैरेही होतामहाराजांनी गरीबरंजल्यागांजल्यांना मदत केली होतीआता दुष्काळ कसा भरजरी दाखवणार तुम्ही? (दुस-या लेखकाला हळूच टाळी देत)
भेसाळी: Fantastic.. अरे मस्त क्ल्यू दिलासमदत.. आपण  राजांकडून गरिबांना मोठमोठे श्रीमंती नजराणे तबकातून भेट मिळतायत असे दाखवू.. मज्जा येईलफुल धमालआणि काय बरं करता येईलअरे हांमघाचा विषय बाजूलाच राहिला.. सांग महाराजांची लग्ने किती.. म्हणजे मल्टीपल पत्न्या होत्या का त्यांना?
लेखक  : आठ
भेसाळी: (कायच्या काय आनंदानेएक्क नंबरआठी जणींचा एकत्र डान्स दाखवून्यूमरोलोजीस्टशी बोलून घेतोत्या काळात आठवड्याचे खरच आठ दिवस होते असं काही दाखवता येईल का बघूया.. म्हणजे राजे रोज एकीसोबत नाचायचे असं आपल्याला दाखवता. .
लेखक  : काय राजे नाचताना दाखवणार?
भेसाळीत्यात काय बिघडल.. मल्हारीवर नाचत बाजीरावाने वाट लावलीच की नाहीअरे हे बघशिवाजीराजे युद्धातडावपेचात वगैरे निपुण होते हे लोकांना माहिती आहेच.. आपण नवीन काय दाखवणार मगम्हणून नृत्यनिपुण राजे दाखवू.. ठरलं तर - आठी जणीसोबत डान्स
लेखक  : ते पाहून लोकांच्या कपाळावर आठी येईल त्याचं काय.. लोक आपल्यालाच गनिमी कावा करून धरतील
भेसाळीकाय भावा कावाबिवा घेऊन बसलास.. ऐकअजून एक आठवलं.. ते लिहिलय ना एके ठिकाणी..तो  कोण तो.. गड आला पण सिंह का काय ते..
लेखक  : तानाजी
भेसाळीहां तानाजीमेमरी चांगली आहे हा तुमची.. गुडतर तो जो काय प्रकार आहे ना कथेत की तो म्हणतो आधी लगीन कोंकणा सेनचंमग माझ्या. .
लेखक  अहो तसं  नाहीये ते.. आधी लगीन कोंढाण्याचंमग माझ्या रायबाचं असं म्हणतात तानाजी मालुसरे.
भेसाळीहां ते तेचऐक भारी सुचलंय एकते किल्ला जिंकला वगैरे दाखवूचपण आदल्या दिवशी तो रायबा आपल्या लग्नाचं स्वप्न पाहतोय असं दाखवूमस्त मोठाच्या मोठा सेटफुल सरबराईशाही थाट आणि अर्थात एक मस्त वेडिंग सॉंगझकास डान्स.. ड्रीम सिक्वेन्स असेल तोदुसऱ्या दिवशी एनिहाऊ त्या रायबाला कळणारच आहे आपलं लग्न तात्पुरत पोस्टपोन होतंयआधी लढायला जायचंय बाबांबरोबर वगैरेकोण कसा आक्षेप घेईल सांग आता..
लेखक  : धन्य आहात
भेसाळीतूच रे..तूचथेन्क्स.. आणि होते अफझलखान मीटिंगच्या वेळी काय ते वाघनखं वगैरे भयानक लिहिलय बाबा.. पेटावालेप्राणी संरक्षणवाले येतील वाघांची नखे कशी वापरली म्हणूनप्रोब्लेम होईल.. ते तसं नकोअसं करूराजांनी हंडग्लोव्ज घातले होते आणि एखाद्या छोट्या सुऱ्याने. .
लेखक अहो अहो ऐकाते सिम्बोलिक आहेवाघनखंते एक शस्त्र
भेसाळीअरे असं कसं.. आधीच वाघ कमी होत चाललेत देशातलेऐका जराआणि तो आग्र्याहून सुटका सीन आहे ना.. तो sssरा बदलूम्हणजे अशा शूरवीरानं असं लपून पेटीतून येणं वगैरे.. नाही रे नाही पटत..
लेखक  : अहो सरसगळ्याच गोष्टी ताकदीवर साध्य होत नाहीतशक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.  
भेसाळीती पुस्तकी वाक्य सांगू नको रे मलाबाहुबलीमध्ये त्या हिरोनं  शिवलिंग क्रेननं उचलून आणलं असं दाखवलं असत तर.. अरे भोळ्या माणसातो ते खांद्यावर घेऊन येतो तेच बघून लोक वेडे झाले नाऐक माझं बरोबर आहेनव्हे ते असतच म्हणा नेहमीमहाराज भर दरबारात औरंगजेबाला चेलेंज देऊन शंभूराजाला खांद्यावर घेऊन बाहेर पडतातआणि रिलीजच्या काही आठवडे आधी तो सीन यूट्यूबवर टाकूबघ त्या सीनला लाखो हिट्स मिळतात की नाही ते.. रोहित शेट्टीलाही कळूदेदुश्मनच्या इलाख्यात जाऊन काय फक्त तुझा एकट्याचा बाजीराव. .
लेखक  : (तोडतअहो सर त्याने कुठेबाजीरावही तुम्हीच केलात.. मल्हारी गाण्यावर नाचवलंतही
भेसाळीआं.. अरे  वेड्याअसा कसा रे तूअरे तो पेशवावाला बाजीराव नव्हेसिंघमवाला बाजीराव रेतो नाही का जयकांत शिखरेच्या इलाख्यात जाऊन वाघासारखा बोलून येतोतसा सीन आपण मुघल दरबारात करूइव्हन मी तर म्हणतोय तानाजीने पावनखिंड लढवली आणि बाजीप्रभूंनी सिंहगड लढवला असा दाखवावं.
लेखक : (तीनताड उडत)  काय?
भेसाळीहांभारी होईलतानाजी विचारांच्या खिंडीत सापडलाय -लढाई आधी की पोराचं लग्न आधी.. असा विचारांचा डायलेमा दाखवू त्याचा.  वॉवव्हॉट  ब्रिलियंट आयडियाकाहीतरी सूट होणारा डायलॉग लिहा तिथे त्याचा.
लेखक सर तुम्ही आम्हाला गोळी का घालत नाहीहे असं काही आपण दाखवत बसलो तर लोक काय करतील याचा अंदाज आहे का तुम्हालाआम्हाला नाही करायचा तुमच्यासोबत हा चित्रपट.. आम्ही जातो.
भेसाळीअरे थांबा थांबा.. ऐका तर खरं.. मी काय म्हणतो तो जो राजे आणि समर्थ रामदास भेटीचा प्रसंग आहेतो जरा मोडिफाय करून..
पण भेसाळी हे बोलत असतानाच दोघे लेखक ‘नाही नाही’ म्हणतगालफडावर हात मारून घेत त्यांच्या या भव्यदिव्य भरजरी भेसाळीभेटीचे भकास भग्नावशेष भंगारात टाकण्याच्या निर्धाराने निघून गेले